शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती : वरणगावचे पोलीस प्रशिक्षण केंद्र २४ वर्षात कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 23:30 IST

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत भूमिपूजन झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणी कागदी घोड्यावरच रंगत आहे.

ठळक मुद्देप्रकल्प कृतीत उतरवणे गरजेचेलोकप्रतिनिधींचा संताप अन्‌ आंदोलनाचा इशारा

मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : राज्यात पाच वेळा सरकार बदलले, परंतु अद्याप वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत भूमिपूजन झालेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र उभारणी कागदी घोड्यावरच रंगत आहे. प्रशिक्षण केंद्र आकारास येण्याचे तर सोडा महाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कारकिर्दीत जूनमध्ये ते नगर जिल्ह्यात हलविण्यात आले, सर्वच पक्षातून संतप्त भावना व्यक्त झाल्या आणि तीन महिन्यांनंतर कागदावरच ते मूळ स्थानी परतले.एखादा प्रकल्प मंजुरी, जमीन हस्तांतरण, कोनशीला अनावरण, भूमिपूजन, आर्थिक मंजुरी अशा विविध प्रशासकीय कामकाजातून पार पडल्यानंतरही प्रत्यक्षात कृतीत किंबहुना अस्तित्वात दिसून येत नसल्याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी लगत उभारले जाणारे पोलीस प्रशिक्षण केंद्र होय. १९९५ मध्ये मंजुरी, १६० एकर जमिनीचे अधिग्रहण, १९९९ मध्ये तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे व पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे यांच्या हस्ते भूमिपूजन,२०१५ मध्ये तत्कालीन मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी १०० कोटीची तरतूद मंजुरीचे आश्वासन, त्यानंतर २०१९ मध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्राचे स्वरूप बदलून राज्य राखीव सुरक्षा बल केंद स्थापना होणे नव्हे तर पदे भरण्यासही मंजुरी मिळाली. अशात जमीन अधिग्रहण व भूमिपूजन कोनशीला वगळता बाकी सर्व फक्त कागदावरच अशी वाटचाल गेल्या २४ वर्षात झाली. विद्यमान महाविकास आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कारकिर्दीत जून महिन्यात हे प्रशिक्षण केंद्र नगर जिल्ह्यातील जामखेड येथे हलविले गेल्याचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटरवरून लक्षात आले आणि जिल्हयातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी आणि नागरिक यांना गेल्या २४ वर्षापासून आकारात आल्याचे स्वप्नवत असलेले हे केंद्र गमविल्याची संतप्त भावना पुढे आली. हा प्रकल्प आणण्याचे श्रेय माजी मंत्री खडसे यांचेच. आज राष्ट्रवादीत असलेले खडसे जून महिन्यात भाजपात होते. सत्ताधाऱ्यांनी नगर जिल्ह्यात होणारे स्थलांतर थांबवून दाखवावे, असे आव्हान दिले. शिवसेनेतर्फे आमदार चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीसोबत जिल्हा बंद पुकारण्याचा इशारा दिला. काँगेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप लोकप्रतिनिधीतर्फे संताप व्यक्त झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाठपुरावा केला आणि हा प्रकल्प पुन्हा परतला; अर्थात तोही कागदावरच.महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीत नगर - जळगाव जिल्ह्या दरम्यान खान्देशी भाषेत डावला झालेल्या या प्रकल्पाला आता कृतीत उतरविण्याची खरी गरज आहे.

टॅग्स :GovernmentसरकारMuktainagarमुक्ताईनगर