शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडीने मराठा समाजाची फसवणूक केली : माजी मंत्री आ. गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महाविकास आघाडी सरकारने मराठा समाजाची घोर फसवणूक केली आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारची एकवाक्यता नसल्यानेच हे घडले आहे. सरकारमध्ये नियोजनाचा व समन्वयाचा अभाव होता, अशा शब्दांत भाजप नेते गिरीश महाजन यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

गिरीश महाजन हे बुधवारी दुपारी जळगावात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात असताना ते माध्यमांशी बोलत होते. मराठा आरक्षण आणि महाविकास आघाडीची भूमिका या विषयावर त्यांनी मतप्रदर्शन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही विधानसभेत कायदा केला होता. मागासवर्गीय आयोगही नेमला होता. सर्व तांत्रिक बाजू पूर्ण करून आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर मराठा आरक्षणाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्या ठिकाणी मराठा समाजाच्या बाजूने निकाल लागला. दुर्दैवाने सरकार बदलले. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात गेला. तेथे निर्णय बदलला आहे. सुरुवातीपासून या सरकारमध्ये एकवाक्यता नव्हती. तिन्ही पक्ष वेगवेगळ्या प्रकारे भांडत होते. त्यांचे नेते व मंत्री वेगवेगळी मते मांडत होती. हे आरक्षण होऊ नये असे सरकारमधल्या मंत्र्यांना वाटत होते. नियोजनाचा अभाव, समन्वयाचा अभाव असल्याने हे आरक्षण टिकले नाही. कोणाचे कोणाला काहीही माहिती नव्हते. तिन्ही पक्षांमधील विसंगती तसेच वादामुळे हे आरक्षण टिकवण्यात अपयश आले, असे गिरीश महाजन यांनी सांगितले.

सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण टिकले नाही

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. या सरकारमध्ये कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता. आरक्षणाच्या बाबतीत या सरकारमध्ये एकमत होते का, हा प्रश्न आहे. सर्व मंत्र्यांचे वक्तव्य तपासून पाहा, त्यावरून हे लक्षात येईल. कुणीही हा विषय गांभीर्याने घेतला नाही, म्हणून हा दुर्दैवी दिवस उगवला. आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही कायम सरकारसोबत होतो आणि आहोत. आमचे नेते चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांना मदतीचे आश्वासन दिले होते; पण जे काय करू ते आम्हीच करू, विरोधी पक्षाला सोबत घेणार नाही, ही सरकारची मानसिकता आणि आडमुठेपणा आरक्षणाला नडला, असेही गिरीश महाजन म्हणाले.