शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, पारोळा या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र १९९१ नंतर खान्देशातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामु‌ळे येथून महाफेड (महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन)च्या परवडीला सुरुवात झाली. त्यानंतर २००० च्या जवळपास ही संस्था अवसायनात गेली आहे. त्यानंतर आतापर्यंत या संस्थेवर अवसायकच काम पाहत आहेत. सध्या धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक हेच या संस्थेचे अवसायक म्हणून काम पाहत आहेत.

महाफेडच्या १९८९ च्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मुरलीधर पवार यांनी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९९१ मध्ये स्व. धोंडू पाटील हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हातात या संस्थेची सूत्रे गेली. त्यांचे सहकारात वर्चस्व असल्याने त्यांनी या संस्थेचे कार्यालय धुळ्याला हलवले. तेल फॅक्टरीच्या आवारात हे कार्यालय होते. त्या वेळी सुभाष देवरे हे महाफेडचे अध्यक्ष बनले, तर २००१ मध्ये मनोहर त्रिभुवन यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत महाफेडवर अवसायकच आहे. विभागीय स्तरावर धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पणन महासंघाचे संचालक हे या संस्थेचे काम पाहतात. हल्ली धुळ्यात महाफेडची चार हेक्टर जमीन, दोन गोदामे, मुंबईमध्ये फ्लॅट आणि मालाड मुंबई येथेही मालमत्ता आहे.

का झाले दुर्लक्ष?

१९९१-९२ च्या सुमारास जळगावला असलेले विभागीय चेअरमनचे कार्यालय धुळ्यात हलविण्यात आले. त्यानंतर या संस्थेच्या परवडीला सुरुवात झाली. धुळे हे तेलबियांसाठी प्रसिद्ध असूनही तेथील राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील कापूस आणि जळगावच्या प्रसिद्ध होणाऱ्या केळीमुळे तेलबियांकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले.

काय झाले परिणाम?

महाफेड अस्तंगत झाल्याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भुईमूग उत्पादकांना गेल्या २० वर्षात त्याचा मोठा फटका बसला आहे. अजूनदेखील या उत्पादकांना सरकार दरबारी जाऊन त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देता आलेला नाही.

कोट - राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने जळगावचे कार्यालय धुळ्यात हलविले गेले आणि नंतर गटाच्या राजकारणात एक चांगली संस्था अस्तंगत पावली. आज जर ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असती तर तेलबियांनाही हमीभाव मिळाला असता. ही संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करू.

- संजय पवार, माजी संचालक, जळगाव जिल्हा बँक