शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, पारोळा या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र १९९१ नंतर खान्देशातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामु‌ळे येथून महाफेड (महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन)च्या परवडीला सुरुवात झाली. त्यानंतर २००० च्या जवळपास ही संस्था अवसायनात गेली आहे. त्यानंतर आतापर्यंत या संस्थेवर अवसायकच काम पाहत आहेत. सध्या धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक हेच या संस्थेचे अवसायक म्हणून काम पाहत आहेत.

महाफेडच्या १९८९ च्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मुरलीधर पवार यांनी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९९१ मध्ये स्व. धोंडू पाटील हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हातात या संस्थेची सूत्रे गेली. त्यांचे सहकारात वर्चस्व असल्याने त्यांनी या संस्थेचे कार्यालय धुळ्याला हलवले. तेल फॅक्टरीच्या आवारात हे कार्यालय होते. त्या वेळी सुभाष देवरे हे महाफेडचे अध्यक्ष बनले, तर २००१ मध्ये मनोहर त्रिभुवन यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत महाफेडवर अवसायकच आहे. विभागीय स्तरावर धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पणन महासंघाचे संचालक हे या संस्थेचे काम पाहतात. हल्ली धुळ्यात महाफेडची चार हेक्टर जमीन, दोन गोदामे, मुंबईमध्ये फ्लॅट आणि मालाड मुंबई येथेही मालमत्ता आहे.

का झाले दुर्लक्ष?

१९९१-९२ च्या सुमारास जळगावला असलेले विभागीय चेअरमनचे कार्यालय धुळ्यात हलविण्यात आले. त्यानंतर या संस्थेच्या परवडीला सुरुवात झाली. धुळे हे तेलबियांसाठी प्रसिद्ध असूनही तेथील राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील कापूस आणि जळगावच्या प्रसिद्ध होणाऱ्या केळीमुळे तेलबियांकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले.

काय झाले परिणाम?

महाफेड अस्तंगत झाल्याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भुईमूग उत्पादकांना गेल्या २० वर्षात त्याचा मोठा फटका बसला आहे. अजूनदेखील या उत्पादकांना सरकार दरबारी जाऊन त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देता आलेला नाही.

कोट - राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने जळगावचे कार्यालय धुळ्यात हलविले गेले आणि नंतर गटाच्या राजकारणात एक चांगली संस्था अस्तंगत पावली. आज जर ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असती तर तेलबियांनाही हमीभाव मिळाला असता. ही संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करू.

- संजय पवार, माजी संचालक, जळगाव जिल्हा बँक