शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, पारोळा या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र १९९१ नंतर खान्देशातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामु‌ळे येथून महाफेड (महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन)च्या परवडीला सुरुवात झाली. त्यानंतर २००० च्या जवळपास ही संस्था अवसायनात गेली आहे. त्यानंतर आतापर्यंत या संस्थेवर अवसायकच काम पाहत आहेत. सध्या धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक हेच या संस्थेचे अवसायक म्हणून काम पाहत आहेत.

महाफेडच्या १९८९ च्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मुरलीधर पवार यांनी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९९१ मध्ये स्व. धोंडू पाटील हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हातात या संस्थेची सूत्रे गेली. त्यांचे सहकारात वर्चस्व असल्याने त्यांनी या संस्थेचे कार्यालय धुळ्याला हलवले. तेल फॅक्टरीच्या आवारात हे कार्यालय होते. त्या वेळी सुभाष देवरे हे महाफेडचे अध्यक्ष बनले, तर २००१ मध्ये मनोहर त्रिभुवन यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत महाफेडवर अवसायकच आहे. विभागीय स्तरावर धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पणन महासंघाचे संचालक हे या संस्थेचे काम पाहतात. हल्ली धुळ्यात महाफेडची चार हेक्टर जमीन, दोन गोदामे, मुंबईमध्ये फ्लॅट आणि मालाड मुंबई येथेही मालमत्ता आहे.

का झाले दुर्लक्ष?

१९९१-९२ च्या सुमारास जळगावला असलेले विभागीय चेअरमनचे कार्यालय धुळ्यात हलविण्यात आले. त्यानंतर या संस्थेच्या परवडीला सुरुवात झाली. धुळे हे तेलबियांसाठी प्रसिद्ध असूनही तेथील राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील कापूस आणि जळगावच्या प्रसिद्ध होणाऱ्या केळीमुळे तेलबियांकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले.

काय झाले परिणाम?

महाफेड अस्तंगत झाल्याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भुईमूग उत्पादकांना गेल्या २० वर्षात त्याचा मोठा फटका बसला आहे. अजूनदेखील या उत्पादकांना सरकार दरबारी जाऊन त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देता आलेला नाही.

कोट - राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने जळगावचे कार्यालय धुळ्यात हलविले गेले आणि नंतर गटाच्या राजकारणात एक चांगली संस्था अस्तंगत पावली. आज जर ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असती तर तेलबियांनाही हमीभाव मिळाला असता. ही संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करू.

- संजय पवार, माजी संचालक, जळगाव जिल्हा बँक