शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

राजकारण्यांच्या दुर्लक्षामुळे अस्त पावली महाफेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जळगाव जिल्हा एकेकाळी केळी आणि कापसाबरोबरच तेलबियांच्या उत्पादनात अग्रेसर होता. धुळे, अमळनेर, एरंडोल, चोपडा, पारोळा या भागात भुईमूग, करडई, सूर्यफूल यांची मोठ्या प्रमाणात लागवड होत होती. मात्र १९९१ नंतर खान्देशातील राजकारण्यांच्या दुर्लक्षामु‌ळे येथून महाफेड (महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन)च्या परवडीला सुरुवात झाली. त्यानंतर २००० च्या जवळपास ही संस्था अवसायनात गेली आहे. त्यानंतर आतापर्यंत या संस्थेवर अवसायकच काम पाहत आहेत. सध्या धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक हेच या संस्थेचे अवसायक म्हणून काम पाहत आहेत.

महाफेडच्या १९८९ च्या निवडणुकीत माजी आमदार सुरेशदादा जैन, माजी आमदार मुरलीधर पवार यांनी माजी खासदार ॲड. वसंतराव मोरे यांना अध्यक्ष करण्यात मोठी भूमिका बजावली होती. त्यानंतर १९९१ मध्ये स्व. धोंडू पाटील हे संस्थेचे अध्यक्ष होते. त्यानंतर माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हातात या संस्थेची सूत्रे गेली. त्यांचे सहकारात वर्चस्व असल्याने त्यांनी या संस्थेचे कार्यालय धुळ्याला हलवले. तेल फॅक्टरीच्या आवारात हे कार्यालय होते. त्या वेळी सुभाष देवरे हे महाफेडचे अध्यक्ष बनले, तर २००१ मध्ये मनोहर त्रिभुवन यांना अवसायक म्हणून नेमण्यात आले होते. त्यानंतर आतापर्यंत महाफेडवर अवसायकच आहे. विभागीय स्तरावर धुळ्याचे जिल्हा उपनिबंधक सहकार आणि पणन महासंघाचे संचालक हे या संस्थेचे काम पाहतात. हल्ली धुळ्यात महाफेडची चार हेक्टर जमीन, दोन गोदामे, मुंबईमध्ये फ्लॅट आणि मालाड मुंबई येथेही मालमत्ता आहे.

का झाले दुर्लक्ष?

१९९१-९२ च्या सुमारास जळगावला असलेले विभागीय चेअरमनचे कार्यालय धुळ्यात हलविण्यात आले. त्यानंतर या संस्थेच्या परवडीला सुरुवात झाली. धुळे हे तेलबियांसाठी प्रसिद्ध असूनही तेथील राजकारण्यांनी याकडे दुर्लक्ष केले. खान्देशातील कापूस आणि जळगावच्या प्रसिद्ध होणाऱ्या केळीमुळे तेलबियांकडे राजकारण्यांनी दुर्लक्ष केले.

काय झाले परिणाम?

महाफेड अस्तंगत झाल्याने जळगाव आणि धुळे जिल्ह्यात भुईमूग उत्पादकांना गेल्या २० वर्षात त्याचा मोठा फटका बसला आहे. अजूनदेखील या उत्पादकांना सरकार दरबारी जाऊन त्यांच्या मालाला हमीभाव मिळवून देता आलेला नाही.

कोट - राजकारण्यांनी दुर्लक्ष केल्याने जळगावचे कार्यालय धुळ्यात हलविले गेले आणि नंतर गटाच्या राजकारणात एक चांगली संस्था अस्तंगत पावली. आज जर ही संस्था पूर्ण क्षमतेने कार्यरत असती तर तेलबियांनाही हमीभाव मिळाला असता. ही संस्था पुन्हा ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी प्रयत्न करू.

- संजय पवार, माजी संचालक, जळगाव जिल्हा बँक