शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

महानगरी ७ तास, गीतांजली ३ तास लेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:12 IST

गैरसोय : पावसामुळे दुसऱ्या दिवशीही मुंबईकडून येणाऱ्या गाड्या रखडल्या जळगाव : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी ...

गैरसोय : पावसामुळे दुसऱ्या दिवशीही मुंबईकडून येणाऱ्या गाड्या रखडल्या

जळगाव : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रविवारी काही गाड्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्या विलंबाने धावल्या. तर सोमवारी पुन्हा पावसामुळे मुंबईकडून येणाऱ्या महानगरी ७ तास, गीतांजली ३ तास, काशी ३ या महत्त्वाच्या गाड्या विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या आठवड्यात घेण्यात आलेल्या दोन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द आणि सुरू असलेल्या गाड्याही विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले. त्यानंतर आता पुन्हा पावसामुळे रेल्वे प्रशासनातर्फे गाड्या विलंबाने सोडण्यात येत असल्याने प्रवाशांना सोमवारी चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वे प्रशासनाने पावसाचे कारणाने रविवारी रात्री मुंबईतून सुटणाऱ्या अनेक गाड्या सोमवारी सकाळी सोडल्या. परिणामी या सर्व गाड्या आपल्या निर्धारित वेळेनुसार विलंबाने धावत आहेत. या मध्ये प्रवाशांचा सर्वाधिक प्रतिसाद असलेली महानगरी एक्स्प्रेस तब्बल सात तास विलंबाने धावत होती. तसेच गीतांजली एक्स्प्रेस तीन तास, काशी एक्स्प्रेस तीन तास, गोरखपूर सुपरफास्ट एक्स्प्रेस तीन तास व पाटलीपुत्र एक्स्प्रेस सहा तास विलंबाने धावली. दरम्यान, जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या मात्र वेळेवर धावल्या.

इन्फो :

गाडीच्या प्रतीक्षेत प्रवासी ताटकळले

गेल्या दोन दिवसांपासून गाड्या विलंबाने धावत असल्याने, याचा प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी मुंबईकडून येणाऱ्या गाड्या विलंबाने धावत असल्यामुळे प्रवाशांना स्टेशनवरच गाडीची वाट पाहत ताटकळत बसावे लागले. यामुळे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरम्यान, पावसामुळे या गाड्या मुंबईतून न सोडता, या पुढे नाशिकहून सोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.