शहरं
Join us  
Trending Stories
1
"...महाराष्ट्राच्या इतिहास एवढा मोठा विजय कुणालाच मिळालेला नाही, ही तर...," फडणवीसांनी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा आकडाच सांगितला
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसात सहाशे कि.मी.अंतर पायी कापून आणली कोल्हापूरहून महालक्ष्मीची ज्योत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 18:35 IST

पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील तरुणांनी रात्रंदिवस प्रवास करीत ही ज्योत आणली असून पुढील ज्योत पावागड आणि वैष्णोदेवी येथून आणणार असल्याचा निश्चय केला आहे.

ठळक मुद्देतरुणांनी वाटेत केला केवळ तीन ठिकाणी मुक्काम30 तरुणांच्या जत्थ्याला लाभले सहकार्याचे बळ

लोकमत ऑनलाईन खडकदेवळा, ता. पाचोरा, दि.25 : तालुक्यातील नांद्रा येथील दुर्गा मित्र मंडळाच्या तरुण कार्यकत्र्यानी कोल्हापूर ते नांद्रा हे सहाशे कि.मी. एवढे मोठे अंतर अवघ्या चार दिवसात पायी कापून महालक्ष्मीची अखंड ज्योत आणली. नवरात्रोत्सवानिमित्त नांद्रा, ता. पाचोरा येथील महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळाच्या कार्यकत्र्यानी कोल्हापूर येथून अखंड ज्योत आणण्याचे ठरविले. 17 सप्टेंबर रोजी सकाळी देवीची आरती करून कोल्हापूर येथून हे तरुण ज्योत घेऊन निघाले. त्यांचा पहिला मुक्काम विरबाबा मंदिर फलटणजवळ झाला. दुसरा मुक्काम चिखली (अहमदनगर), तिसरा मुक्काम टापरगाव जनार्दन महाराज आश्रम (कन्नड) येथे, तर चौथा मुक्काम नाथ मंदिर जारगाव, पाचोरा येथे झाला. 21 रोजी सकाळी 7 वाजता नांद्रा गावात ही ज्योत दाखल झाली. प्रथम गावातील ज्येष्ठ नागरिक साहेबराव पाटील व आप्पासाहेब सीताराम पाटील यांनी महादेव मंदिरावर मंडळाच्या तरुणांचे स्वागत केले. ज्योत घेण्यासाठी 30 तरुण रवाना झाले होते. त्यांना विनोद बाविस्कर व बापू सूर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. मंडळाचे हे 19 वे वर्ष आहे. महाराष्टातून ठिकठिकाणाहून मागील चार वर्षापासून हे मंडळ अखंड ज्योत आणत आहे. 2014 मध्ये जोगेश्वरी, 2015 मनुदेवी, 2016 मध्ये माहूरगड, तर यंदा कोल्हापूरच्या महालक्ष्मीची ज्योत आणली. भविष्यात या तरुणांनी पावागड (गुजरात) व वैष्णोदेवी (जम्मू) येथून अखंड ज्योत आणण्याचा संकल्प केला आहे. या पदयात्रेत गणेश कर्नावट, डिगंबर सूर्यवंशी, बाळा पारस, राजेंद्र पाटील, योगेश बोरसे, बाळू सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, भूषण तावडे, बापू वाघ, विश्वास पाटील, सागर तावडे, बारकू बाविस्कर, एकनाथ बोरसे, प्रमोद सूर्यवंशी आदी तरुणांनी ज्योत आणण्यासाठी सेवा दिली. तर प्रदीप बाविस्कर व किशोर सूर्यवंशी यांनी कोल्हापूर व सांगली येथे भोजन व्यवस्था केली.