शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

खरीप पीककर्ज वाटपाचा निच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 22:38 IST

जेमतेम ३३ टक्के कर्जवाटप

ठळक मुद्दे मागील वर्षीच्या तुलनेत निम्मेच कर्जवाटप इतर बँकांनी आदेश डावलले

जळगाव: खरीप पीक कर्जवाटपात बँकांनी हात आखडता घेतल्याने पीककर्ज वाटपाचा यंदाच्या वर्षी निच्चांक गाठला आहे. खरीप पीककर्ज वाटपाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपत असून ही मुदत संपण्यास जेमतेम ४ दिवस उरले असताना उद्दीष्टाच्या जेमतेम ३३ टक्केच पीककर्ज वाटप झाले आहे. याउलट मागील वर्षी खरीपासाठी ५७.०६ टक्के कर्जवाटप झाले होते.२०१८-१९ या वर्षात शेतकऱ्यांना २९४४ कोटींचे खरीप पीककर्जाचे वाटप करण्याचे उद्दीष्ट जिल्ह्यातील सर्व बँकांना देण्यात आलेले होते. मात्र कर्जमाफीच्या घोळ लांबल्याने शेतकरी कर्जमुक्त होऊ न शकल्याने बँकांनी त्यांना थकबाकीदार ठरवत पीककर्ज देणे टाळले. तर जिल्हा बँकेने पात्र ठरलेल्या शेतकºयांनाही पन्नास टक्केच कर्जवाटपाचे धोरण जाहीर करून टाकले. तर राष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी कर्जवाटपाकडे सोयीस्कर पाठ फिरवली. त्यामुळे १ लाख ६८ हजार २६० खातेदारांना ९७० कोटी ८२ लाखांचे पीककर्ज वाटप झाले आहे. म्हणजेच एकूण उद्दीष्टाच्या केवळ ३३ टक्केच खरीप पीककर्जाचे वाटप झाले आहे.जिल्हा बँकेकडून ५३ टक्के कर्जवाटपजिल्हा बँकेला खरीपासाठी ८१३ कोटी ८७ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले होते. मात्र जिल्हा बँकेने १ लाख ३७ हजार २०९ खातेदारांना ४२७ कोटी ४७ लाखांचेच पीककर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या सुमारे ५३ टक्के पीककर्जाचे वाटप केले आहे.इतर बँकांनी आदेश डावललेराष्टÑीयकृत, खाजगी व ग्रामीण बँकांनी तर शासनाचे पीककर्ज वाटपाचे आदेश धाब्यावर बसविल्याचेच चित्र दिसून येत आहे. राष्टÑीयकृत बँकांना खरीपाचे १७२४ कोटी २६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी २५ हजार ६१७ श्ोतकºयांना ४४० कोटी ३५ लाखांचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजेच उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्केच कर्जवाटप केले आहे. तर खाजगी बँकांना ३५६ कोटी ३६ लाखांचे उद्दीष्ट दिलेले असताना त्यांनी ४६५० खातेदारांना ९४ कोटींचेच कर्ज वाटप केले आहे. म्हणजे उद्दीष्टाच्या केवळ २६ टक्के कर्ज वाटप केले आहे. तर ग्रामीण बँकांनी उद्दीष्टाच्या ३३ टक्के कर्जवाटप केले आहे.