शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

ममुराबादला कमी दाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ममुराबाद : गावात वॉर्ड तीनसह अन्य बऱ्याच भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ममुराबाद : गावात वॉर्ड तीनसह अन्य बऱ्याच भागात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. नळांना दोन बादल्या पाणी येत असताना त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संपूर्ण ममुराबाद गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी लहान व मोठे जलकुंभ उभारण्यात आले आहेत. त्यानुसार वॉर्ड क्रमांक तीन व परिसरासाठी नेहरू विद्यालयाजवळ एक जलकुंभ उभारण्यात आला आहे. प्रत्यक्षात या जलकुंभावरून अपेक्षित दाबानुसार पाणीपुरवठा केला जात नसल्याने नळांना बऱ्याचवेळा पुरेसे पाणी येत नाही. पाणी आले तरी जेमतेम दोन बादल्या भरतील, इतकाच वेळ पाणी येते. दुसरीकडे मात्र धो-धो पाणी वाहते. उन्हाळ्याच्या दिवसांत पाणीसमस्या जास्त तीव्र होत असते. यंदाही तोच प्रत्यय येत असून रोजच्या त्रासाला कंटाळलेल्या रहिवाशांनी पाणीटंचाईच्या विषयाला वाचा फोडण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा ग्रामविकास अधिकारी व सरपंचांना तोंडी व लेखी निवेदने दिली आहेत. मात्र, त्यांनी व्हॉल्व्ह नादुरुस्त असल्याचे तसेच तापी नदीवरील पंपिंग होत नसल्याचे कारण देऊन नेहमीच वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. पाणीटंचाईची समस्या कायम असताना या भागातील ग्रामपंचायत सदस्यदेखील पाणीप्रश्न सोडविण्यात आतापर्यंत अपयशी ठरल्याचाही आरोप केला जात आहे.

पाण्याची समस्या तातडीने निकाली न निघाल्यास ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात येईल तसेच पाणीपट्टी कराचा भरणा केला जाणार नाही, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

-----------------

पंधराव्या वित्त आयोगाचे काय झाले ?

ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या निधीपैकी निम्मा निधी हा पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी खर्च करण्याची मुभा आहे. मात्र, ममुराबाद येथील अंतर्गत पाइपलाइन बदलण्यासाठी अद्याप काहीच हालचाल होऊ शकलेली नाही. त्यामुळे असमान पाणीवितरण समस्या कायम आहे. रीतसर आराखडा तयार करून सदरचे काम मार्गी लावण्याची मागणी होत आहे.

--------------------

पावसाळा असो किंवा उन्हाळा पाणीटंचाई आमच्या पाचवीला पुजलेली आहे. नळांना नेहमीच जेमतेम बादलीभर पाणी येत असल्याने नाइलाजाने ट्यूबवेलवरील क्षारयुक्त पाणी पिण्यासाठी वापरावे लागते.

- अविनाश पाटील, ग्रामस्थ, ममुराबाद