शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
4
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
5
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
6
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
7
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
8
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
10
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
11
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
12
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
13
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
14
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
15
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
16
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
17
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
18
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
19
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 
20
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी

प्रियकरांची घेतली साथ अन् नव:याचा केला घात

By admin | Updated: March 6, 2017 00:35 IST

निरव शांततेच्या रस्त्यावरील घटना : एकाशी आधीच सूत जुळलेले अन् दोघे भेटले बाजारात

 चाळीसगाव : तिच्याशी एकाचे अगोदरच सूत जुळलेले.. अन्य दोघे बाजारात भेटले.. त्यांच्याबरोबरही आँख मिचौली झाली.. तिघांचा तिच्यात जीव रंगला.. त्यांचे हे अनैतिक इलू इलू मात्र तिच्या पतीला खटकायचे. आपल्या ‘त्रिकोणी लव्ह स्टोरी’तील नव:याचा अडसर दूर करताना तिने प्रियकरांच्या साथीने नव:याचा ‘गेमप्लॅन’ फत्ते केला. बेलगंगा भोरस रस्त्यावर झालेल्या खुनामागे असे हे ‘लव्ह नाटय़’ उघड झाले आहे.नांदगाव तालुक्यातील बोलठाण हे कैलास रंगनाथ पवार (वय 40) यांचे गाव. त्याचा आणि राधाबाईचा (वय 35) विवाह 10 वर्षापूर्वी झाला. त्यांना दोन मुले व एक मुलगी अशी अपत्ये झाली. संसार सुरळीत सुरू असताना कैलासला दारू पिण्याचे व्यसन जडले. राधाबाईने याचा काहीसा फायदा घ्यायला सुरुवात केली.  याची चाहूल लागल्याने कैलासने तिला काही महिने तिच्या माहेरी पोहोचवून दिले. तो कामासाठी काही काळ सुरत येथे गेला.  मुले लहान असल्याने त्याने राधाबाईशी समझोता करून तिला पुन्हा आपल्यासोबत आणले. काही दिवसांनंतर  कैलास आणि राधाबाई यांच्यात खटके उडू लागले. नव:याच्या या जाचातून सुटण्याचा विचार तिच्या मनात घोळू लागला.पहिले सूत गौतमशीलोहारी, ता.पाचोरा येथे राधाबाईचा भाऊ राहतो. तिचे भावाकडे येणे जाणे असल्याने त्याचा मित्र गौतम धना सोनवणे याच्याशी राधाबाईची ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये सूत जुळले. त्याच्या मोबाइलवरून संपर्कही सुरू झाला.  गौतम आणि राधा यांच्या प्रेमाबाबतचा  पुसटसा अंदाज कैलास यास आला होता.दोघे भेटले बाजारातसाहेबराव निकम कोळी आणि उमेश उर्फ गुडय़ा वना पाटील हे दोघेही उंबरखेड, ता.चाळीसगाव येथील रहिवासी. पाच ते सात महिन्यांपूर्वी राधाबाई पती कैलाससह चाळीसगावी बाजारासाठी आली होती. आठवडे बाजारातच कैलास आणि राधाबाईचे भांडण झाले. त्या वेळी कैलास दारू प्यायला होता. त्यांचे भांडण सोडविण्याचा प्रयत्न उमेश उर्फ गुडय़ा वना पाटील व साहेबराव कोळी यांनी केला. कैलास व या दोघांमध्ये बाचाबाचीही झाली. दरम्यान, राधाबाईने दोघांचे मोबाइल क्रमांक घेऊन त्यांच्याशी पुढे संपर्क केला. या दोघांशी तिची लव्ह स्टोरी सुरू झाली. राधाबाईच्या त्रिकोणी प्रेमाला बहर आला. कैलासला याचा मागमूसही राधाबाईने लागू दिला नाही.मध्यरात्रीचा थरार आपल्या अनैतिक संबंधांना कैलास विरोध करतो. याचा राग राधाबाईच्या मनात घुमसू लागला. तिने या तीनही  प्रियकरांसोबत कैलासच्या खुनाचा कट रचला. 19 फेब्रुवारी रोजी तब्येत दाखविण्यासाठी जायचे आहे, असे सांगत राधाबाईने कैलासला चाळीसगावी आणले. ठरल्यानुसार गौतम, साहेबराव आणि उमेश हेदेखील चाळीसगावी आले. रात्री 11 वाजता मालेगाव रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये पाचही जणांची ओली पार्टी सुरू झाली. 12 वाजता घरी जायचे म्हणून ते तेथून            उठले. अन् ती बसली दुचाकीवरगौतमच्या मोटारसायकलवर कैलासला बसविले. याच दरम्यान साहेबराव यास त्याच्या मोटारसायकलवर पेट्रोल घेण्यास पाठविले. उमेशच्या मोटारसायकलवर राधाबाई बसली. गौतम कैलासला घेऊन बेलगंगा-भोरस या सुनसान रस्त्यावर आला. त्याने कैलासला मारहाण करायला सुरुवात केली. त्यास खाली पाडत डोक्यात दगड घातला. तो जिवंत असतानाच साहेबरावने आणलेले पेट्रोल त्याच्या अंगावर टाकत पेटवून दिले. तिघे तेथून पसार झाले तर राधाबाई पहाटेच्या गाडीने बोलठाण येथे पोहोचली.अन् पोलिसांनी आवळल्या मुसक्याराधाबाईने बोलठाण येथे कैलासच्या आई-वडिलास व  भावास तो नंतर येत असल्याचे सांगितले. 19 फेब्रुवारी रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात अर्धवट जळालेल्या अज्ञात इसमाची प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. शवविच्छेदनानंतर त्याच्या डोक्यात दगड घालून खून झाल्याचे निष्पन्न झाले आणि  अज्ञात व्यक्तींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दोन दिवस उलटूनही कैलास घरी परतला नाही म्हणून त्याच्या नातेवाइकांनी नांदगाव पोलिसात तो हरविल्याची तक्रार दिली. चाळीसगाव पोलिसांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाबाबत लगतच्या पोलीस ठाण्यांना कळविले होते. नांदगाव पोलिसांनी कैलासच्या नातेवाइकांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले. 21 रोजी राधाबाई व अन्य नातेवाईक चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात  आले. या वेळी मयत कैलासचे कपडे नातेवाइकांनी ओळखले.  जिल्हा पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर व डीवायएसपी अरविंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड व त्यांची टीम मनोहर जाधव, विनोद भोई, किशोर पाटील, विकास पाटील, नीलेश पाटील, दीपक पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. तिच्या जबाबातील विसंगतीराधाबाईचा जबाब व घटनाक्रम यात विसंगती आढळल्याने त्यांनी तिच्यावरच फोकस केला. ती बाहेरख्याली असल्याबद्दल नातेवाइकांनीही सांगितले. राधाबाईला पोलीस खाक्या दाखवताच ती पोपटासारखी बोलू लागली. गौतम, उमेश व साहेबराव यांच्यावर पोलिसांनी झडप घालत त्यांनाही जेरबंद केले. चौघांनी खुनाचा गुन्हा कबूल केला. अवघ्या पाच दिवसात आरोपींना अटक झाल्याने 27 रोजी त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना 7 मार्चअखेर न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.