शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

मैत्रीतून प्रेम फुलले अन् झाले विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २००५ मध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. कुटुंबाच्या विरोधानंतर देखील दोघांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : २००५ मध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. कुटुंबाच्या विरोधानंतर देखील दोघांनी लग्न केले. वडिलांचा विरोध झुगारून देखील तिने त्याच्यासोबतच संसार थाटला. ही गोष्ट आहे. जळगावच्या तेजस अकोले आणि जयश्री पाटील- अकोले यांची.

२००५ मध्ये अकरावीत शिकत असताना दोघांची ओळख झाली. जळगावच्या नुतन मराठा महाविद्यलयात अकरावीत शिकत असताना मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००७ मध्ये तेजस ऑडीओलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेला. त्यावेळी देखील दोघे एकमेकांच्या संपर्कात राहिले. कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तेजस जळगावला परतला त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यात मुख्य अडसर होता तो जयश्रीच्या कुटुंबाचा. दोघांची जात वेगळी असल्याने तिचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. त्याच्या भितीने दोघांनी घरी न सांगताच आपले मित्र सचिन, नेहा आणि सागर यांच्या सोबत जाऊन २ डिसेंबर २०१० पद्मालय येथे विवाह केला. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. काही दिवसांनी तेजस याने त्याच्या कुटुंबाला विवाहाची कल्पना दिली. त्याचवेळी जयश्री हिच्यासाठी कुटुंबाने स्थळे पाहणे सुरू केले. त्यावेळी तेजसने तीला घेऊन गृहप्रवेश केला आणि संसाराला सुरूवात केली. अकोले कुटुंबांने तिला सुन म्हणून स्विकारले मात्र ही बाब तिच्या माहेरी माहिती नव्हती. मात्र त्यांच्या प्रेमाची कल्पना असल्याने तिचे वडील यांनी थेट तेजस याचे घर गाठले. त्यावेळी तेजसच्या वडिलांनी तिच्या माहेरच्यांची समजुत घातली. त्यावेळी ते लग्नाला तयार झाले. त्यानंतर ५ मे २०११ ला पुन्हा त्यांचे थाटामाटात सर्वांच्या साक्षीने लग्न लावून देण्यात आले. आज तेजस कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. तर त्या दोघांना दोन मुली देखील आहेत.