शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
6
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
7
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
8
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
9
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
10
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
11
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
12
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
13
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
14
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
15
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
16
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
17
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
18
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
19
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
20
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

मैत्रीतून प्रेम फुलले अन् झाले विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : २००५ मध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. कुटुंबाच्या विरोधानंतर देखील दोघांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : २००५ मध्ये कॉलेजमध्ये असताना दोघांची ओळख झाली. मैत्रीतून प्रेम फुलले. कुटुंबाच्या विरोधानंतर देखील दोघांनी लग्न केले. वडिलांचा विरोध झुगारून देखील तिने त्याच्यासोबतच संसार थाटला. ही गोष्ट आहे. जळगावच्या तेजस अकोले आणि जयश्री पाटील- अकोले यांची.

२००५ मध्ये अकरावीत शिकत असताना दोघांची ओळख झाली. जळगावच्या नुतन मराठा महाविद्यलयात अकरावीत शिकत असताना मैत्री झाली. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. २००७ मध्ये तेजस ऑडीओलॉजीचे शिक्षण घेण्यासाठी हैदराबादला गेला. त्यावेळी देखील दोघे एकमेकांच्या संपर्कात राहिले. कुटुंबाचा व्यवसाय सांभाळण्यासाठी तेजस जळगावला परतला त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यात मुख्य अडसर होता तो जयश्रीच्या कुटुंबाचा. दोघांची जात वेगळी असल्याने तिचे कुटुंब या लग्नाच्या विरोधात होते. त्याच्या भितीने दोघांनी घरी न सांगताच आपले मित्र सचिन, नेहा आणि सागर यांच्या सोबत जाऊन २ डिसेंबर २०१० पद्मालय येथे विवाह केला. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले. काही दिवसांनी तेजस याने त्याच्या कुटुंबाला विवाहाची कल्पना दिली. त्याचवेळी जयश्री हिच्यासाठी कुटुंबाने स्थळे पाहणे सुरू केले. त्यावेळी तेजसने तीला घेऊन गृहप्रवेश केला आणि संसाराला सुरूवात केली. अकोले कुटुंबांने तिला सुन म्हणून स्विकारले मात्र ही बाब तिच्या माहेरी माहिती नव्हती. मात्र त्यांच्या प्रेमाची कल्पना असल्याने तिचे वडील यांनी थेट तेजस याचे घर गाठले. त्यावेळी तेजसच्या वडिलांनी तिच्या माहेरच्यांची समजुत घातली. त्यावेळी ते लग्नाला तयार झाले. त्यानंतर ५ मे २०११ ला पुन्हा त्यांचे थाटामाटात सर्वांच्या साक्षीने लग्न लावून देण्यात आले. आज तेजस कुटुंबाचा व्यवसाय सांभाळत आहे. तर त्या दोघांना दोन मुली देखील आहेत.