शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:55 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटींची कर्जमाफी

ठळक मुद्देस्वहिस्सा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत १० हजार शेतकºयांना झालीय ११४ कोटींची कर्जमाफी

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १६ हजार ८५ शेतकºयांनी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेखाली त्यांच्या हिश्याची दीड लाखांच्यावरील रक्कम न भरल्याने त्यांची सुमारे ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे. दरम्यान शासनाने ही रक्कम भरण्यासाठी योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत दीड लाखांच्या थकबाकीला माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ज्या शेतकºयांची थकबाकी दीड लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (ओटीस) योजना आणली. त्यात पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची म्हणजेच दीड लाखांच्यावरील उर्वरीत संपूर्ण रक्कम शासनाला भरल्यानंतर त्यांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार होता. ही रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत होता. जिल्ह्यात २५ हजार ८५८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असल्याने त्यांनी स्व-हिस्सा भरल्यास त्यांना २२४ कोटी २१ लाख २३ हजारांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या मुदतीत केवळ ९७७३ शेतकºयांनीच स्व-हिस्सा भरल्याने त्यांना ११३ कोटी ७१ लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उवररीत १६ हजार ८५ शेतकºयांनी त्यांची स्व-हिस्सा रक्कम न भरल्याने त्यांची ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे.ओटीएस योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत शेतकºयांनी स्व-हिस्सा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असून आता ही मुदत ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आह, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांनी आपल्या हिश्याची रक्कम वरील मुदतीत बँकामध्ये भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९८३ कोटींची कर्जमाफीजळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १० ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून त्यात २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटी १२ लाखांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात जिल्हा बँकेच्या १ लाख ९४ हजार ४९८ खातेदारांना ७५८ कोटी ७९ लाखांची तर राष्टÑीयकृत बँकांच्या ४० हजार ३१ लाभार्र्थींना २२४ कोटी ३३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. विशेष म्हणजे राष्टÑीयकृत बँकांकडे मात्र त्यांच्याकडील कर्जमाफीची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समजते. अद्यापही शासनाकडून ग्रीनलिस्ट येतच असून नुकतीच जाहीर झालेली ११ ग्रीन लिस्ट जाहीर होताच रद्द झाली आहे.