शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
3
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
4
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
5
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
6
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
7
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
8
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
9
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
10
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
11
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
12
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
13
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
14
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
15
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
16
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
17
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
18
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
19
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
20
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?

ओटीएसअंतर्गत जळगाव जिल्ह्यातील १६ हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 22:55 IST

जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटींची कर्जमाफी

ठळक मुद्देस्वहिस्सा भरण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत १० हजार शेतकºयांना झालीय ११४ कोटींची कर्जमाफी

जळगाव: छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना म्हणजेच कर्जमाफी योजनेंतर्गत मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या १६ हजार ८५ शेतकºयांनी एकवेळ समझोता (ओटीएस) योजनेखाली त्यांच्या हिश्याची दीड लाखांच्यावरील रक्कम न भरल्याने त्यांची सुमारे ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे. दरम्यान शासनाने ही रक्कम भरण्यासाठी योजनेची मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत वाढविली आहे.शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजने अंतर्गत दीड लाखांच्या थकबाकीला माफी देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ज्या शेतकºयांची थकबाकी दीड लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी मुद्दल व व्याजासह दीड लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतक-यांसाठी एकवेळ समझोता (ओटीस) योजना आणली. त्यात पात्र शेतक-यांनी त्यांच्या हिश्याची म्हणजेच दीड लाखांच्यावरील उर्वरीत संपूर्ण रक्कम शासनाला भरल्यानंतर त्यांना दीड लाखांच्या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार होता. ही रक्कम भरण्याचा कालावधी दिनांक ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत होता. जिल्ह्यात २५ हजार ८५८ शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरले असल्याने त्यांनी स्व-हिस्सा भरल्यास त्यांना २२४ कोटी २१ लाख २३ हजारांची कर्जमाफी मिळणार आहे. मात्र ३० सप्टेंबर २०१८ पर्यंतच्या मुदतीत केवळ ९७७३ शेतकºयांनीच स्व-हिस्सा भरल्याने त्यांना ११३ कोटी ७१ लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उवररीत १६ हजार ८५ शेतकºयांनी त्यांची स्व-हिस्सा रक्कम न भरल्याने त्यांची ११० कोटींची कर्जमाफी रखडली आहे.ओटीएस योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढओटीएस योजनेंतर्गत शेतकºयांनी स्व-हिस्सा भरण्यास शासनाने मुदतवाढ दिली असून आता ही मुदत ३१ डिसेंबर, २०१८ पर्यंत वाढविण्यात आली आह, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतक-यांनी आपल्या हिश्याची रक्कम वरील मुदतीत बँकामध्ये भरुन सदर योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांनी केले आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ९८३ कोटींची कर्जमाफीजळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १० ग्रीन लिस्ट प्राप्त झाल्या असून त्यात २ लाख ३४ हजार ५२९ शेतकºयांना ९८३ कोटी १२ लाखांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात जिल्हा बँकेच्या १ लाख ९४ हजार ४९८ खातेदारांना ७५८ कोटी ७९ लाखांची तर राष्टÑीयकृत बँकांच्या ४० हजार ३१ लाभार्र्थींना २२४ कोटी ३३ लाखांची कर्जमाफी झाली आहे. विशेष म्हणजे राष्टÑीयकृत बँकांकडे मात्र त्यांच्याकडील कर्जमाफीची आकडेवारीच उपलब्ध नसल्याचे समजते. अद्यापही शासनाकडून ग्रीनलिस्ट येतच असून नुकतीच जाहीर झालेली ११ ग्रीन लिस्ट जाहीर होताच रद्द झाली आहे.