शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य गट यंदा नवीन उमेदवारांना देणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : ग.स. सोसायटी निवडणुकीत या वेळी नवीन उमेदवारांना संधी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात येईल, असा निर्णय रविवारी झालेल्या ...

जळगाव : ग.स. सोसायटी निवडणुकीत या वेळी नवीन उमेदवारांना संधी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात येईल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत लोकमान्य गटाने घेतला आहे. यात स्वत:हून कोणी आले तर युती करू, अशीही चर्चा या वेळी झाला.

ग.स. सोसायटीच्या १४ संचालकांनी राजीनामे दिले व त्यानंतर सर्वच गटांकडून वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे सहकार गट प्रशासक नियुक्तीची मागणी करीत आहे तर प्रगती गटाने अध्यक्ष मनोज पाटील यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. यात आता लोकमान्य गटही आखाड्यात उतरला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाला कोरोनामुळे मुदतवाढ भेटली असली तरी त्यानंतर होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी लोकमान्य गटाची बैठक झाली.

स्वत:हून कोणी आल्यास दरवाजे खुले

लोकमान्य गट अगोदरपासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून याही वेळी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. संस्थेतील स्थिती पाहता स्वत:हून जर कोणी पुढे आले तर युती करू व जे येतील त्यांच्यासाठी दरवाजे खुले राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसावा

संस्थेची निवडणूक आली की संचालकांचे इकडून तिकडे जाणे, राजीनामे देणे असे प्रकार सुरूच असतात. आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसणे गरजेचे असून या संस्कृतीला लोकमान्य गटाचा विरोध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. आयाराम-गयारामांना या वेळी सभासद घरी बसवतील, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. लोकमान्य गटाच्यावतीने नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार असून त्यासाठी संभाव्य उमेदवारही ठरविले असल्याचे गटनेते मगन पाटील यांनी सांगितले.

सहा वर्षांपासून संगनमताने कारभार

संस्थेत राजीनामा दिला गेला असला तरी या पूर्वीही वेगवेगळ्या अध्यक्षांविरोधात बंड पुकारले गेले. मात्र सर्वांनीच संगनमताने कारभार करीत नोकरभरती केली व त्यातही स्वत:चे मुले, पत्नी यांना लावून घेण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या काळात कोट्यवधींची कमाई केली गेली व काही प्रकारांमध्ये दोन पैसे मिळाले नाही म्हणून बंड पुकारले गेले असा आरोपही या वेळी करण्यात आला. गैरमार्गाने सत्ता मिळविली व ती टिकत नसल्याचे लोकमान्य गटाचे म्हणणे आहे.

या वेळी लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील, गटनेते मगन पाटील, साहेबराव पाटील, शरद भगवान पाटील, प्रतिभा सुर्वे, विलास पाटील, वाल्मीक पाटील, गुणवंत पाटील, अमित पाटील, सुधाकर सूर्यवंशी यांच्यासह तालुका पातळीवरील कार्यकर्ते उपस्थित होते.