शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

लोकमान्य गट यंदा नवीन उमेदवारांना देणार संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:51 IST

जळगाव : ग.स. सोसायटी निवडणुकीत या वेळी नवीन उमेदवारांना संधी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात येईल, असा निर्णय रविवारी झालेल्या ...

जळगाव : ग.स. सोसायटी निवडणुकीत या वेळी नवीन उमेदवारांना संधी देत स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्यात येईल, असा निर्णय रविवारी झालेल्या बैठकीत लोकमान्य गटाने घेतला आहे. यात स्वत:हून कोणी आले तर युती करू, अशीही चर्चा या वेळी झाला.

ग.स. सोसायटीच्या १४ संचालकांनी राजीनामे दिले व त्यानंतर सर्वच गटांकडून वेगवेगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकीकडे सहकार गट प्रशासक नियुक्तीची मागणी करीत आहे तर प्रगती गटाने अध्यक्ष मनोज पाटील यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली आहे. यात आता लोकमान्य गटही आखाड्यात उतरला आहे. सोसायटीच्या संचालक मंडळाला कोरोनामुळे मुदतवाढ भेटली असली तरी त्यानंतर होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झाल्या आहेत. यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दुपारी लोकमान्य गटाची बैठक झाली.

स्वत:हून कोणी आल्यास दरवाजे खुले

लोकमान्य गट अगोदरपासूनच स्वतंत्रपणे निवडणूक लढवित असून याही वेळी ही निवडणूक स्वतंत्रपणे लढविण्याविषयी या बैठकीत चर्चा झाली. संस्थेतील स्थिती पाहता स्वत:हून जर कोणी पुढे आले तर युती करू व जे येतील त्यांच्यासाठी दरवाजे खुले राहणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसावा

संस्थेची निवडणूक आली की संचालकांचे इकडून तिकडे जाणे, राजीनामे देणे असे प्रकार सुरूच असतात. आयाराम-गयाराम संस्कृतीला आळा बसणे गरजेचे असून या संस्कृतीला लोकमान्य गटाचा विरोध असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले. आयाराम-गयारामांना या वेळी सभासद घरी बसवतील, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला. लोकमान्य गटाच्यावतीने नवीन उमेदवारांना संधी दिली जाणार असून त्यासाठी संभाव्य उमेदवारही ठरविले असल्याचे गटनेते मगन पाटील यांनी सांगितले.

सहा वर्षांपासून संगनमताने कारभार

संस्थेत राजीनामा दिला गेला असला तरी या पूर्वीही वेगवेगळ्या अध्यक्षांविरोधात बंड पुकारले गेले. मात्र सर्वांनीच संगनमताने कारभार करीत नोकरभरती केली व त्यातही स्वत:चे मुले, पत्नी यांना लावून घेण्यात आल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. या काळात कोट्यवधींची कमाई केली गेली व काही प्रकारांमध्ये दोन पैसे मिळाले नाही म्हणून बंड पुकारले गेले असा आरोपही या वेळी करण्यात आला. गैरमार्गाने सत्ता मिळविली व ती टिकत नसल्याचे लोकमान्य गटाचे म्हणणे आहे.

या वेळी लोकमान्य गटाचे अध्यक्ष गंजीधर पाटील, गटनेते मगन पाटील, साहेबराव पाटील, शरद भगवान पाटील, प्रतिभा सुर्वे, विलास पाटील, वाल्मीक पाटील, गुणवंत पाटील, अमित पाटील, सुधाकर सूर्यवंशी यांच्यासह तालुका पातळीवरील कार्यकर्ते उपस्थित होते.