शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:15 IST

जळगाव : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव येथून लोकसंघर्ष ...

जळगाव : केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव येथून लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना झाले. यामध्ये जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील १२०० जणांचा सहभाग असून जळगाव जिल्ह्यातील ७०० जण यामध्ये आहेत. रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय ते रेल्वेस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली. या वेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे परिसर दणाणला होता.

शनिवार, १६ जानेवारी रोजी जळगाव येथून जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शेतकरी असे एकूण १२०० महिला, पुरुष दिल्लीकडे रेल्वेने रवाना झाले. दुपारी १२ वाजता गोवा एक्सप्रेसने काही शेतकरी रवाना झाल्यानंतर रात्रीपर्यंत वेगवेगळ्या सहा रेल्वेंनी हे शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले. या सोबतच काही जणांचे रावेर, भुसावळ येथून आरक्षण असल्याने तेथूनही काही जण रवाना झाले.

केंद्र सरकारविरुद्ध जोरदार घोषणा

दिल्लीकडे रवाना होण्यापूर्वी लोकसंघर्ष मोर्चा, संयुक्त किसान मोर्चा, महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा, मणियार बिरादरी, छावा मराठा युवा महासंघ या संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र आले. तेथून जनजागृती रॅलीला सुरुवात करण्यात आली. रॅली दरम्यान नरेंद्र मोदी किसान विरोधी, जय जवान जय किसान, शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करा, अशा वेगवेगळ्या घोषणा देण्यात आल्या.

मोर्चामध्ये महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे, लोकसंघर्ष मोर्चाचे सचिन धांडे, संजय महाजन, मणियार बिरादरीचे फारुक शेख, छावा मराठा युवा महासंघाचे अमोल कोल्हे, प्रा. प्रीतीलाल पवार, हरिचंद्र सोनवणे, भरत कर्डीले, ताराचंद बारेला, कृष्णा सपकाळे, शेख ईस्माईल यांच्यासह शेकडो शेतकरीदेखील सहभागी झाले होते.