शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
2
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
3
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
4
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
5
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
6
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
7
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?
8
"मी मुलीशिवाय जगू शकणार नाही..."; लेकीने आयुष्य संपवल्यावर आईनेही मृत्यूला कवटाळलं
9
भारीच! एक रिल बनवा अन् १५ हजार जिंका, सरकारकडून पैसे मिळवा; जाणून घ्या सविस्तर
10
Lunchbox Recipe: दुधीची भाजी नको? ट्राय करा दुधीचे खमंग पराठे; करा झटपट, खा चटचट!
11
राहुल गांधींविरोधात किती खटले? किती प्रकरणांमध्ये मिळालाय जामीन? जाणून घ्या...
12
"इंग्लिश मीडियममध्ये शिकला, बायको ख्रिश्चन आणि हा म्हातारा...", 'बिग बॉस' फेम रीलस्टारने मराठीवरुन रितेश देशमुखला डिवचलं
13
"हा एक नवीन पायंडा काही मोजक्या पत्रकारांनी पाडलाय"; राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडले?
14
चीनच्या मिसाईलमुळे भारतानं S-400 एअर डिफेन्स सिस्टिम गमावली? समोर आलं धक्कादायक सत्य
15
"प्रत्येक सीननंतर सांगितलं किस करायला...", 'अक्सर२'मध्ये फसवून केलेलं अश्लील शूट, जरीनचा धक्कादायक खुलासा
16
सहा वर्षांच्या लेकीला मारलं अन् घरातच कुजत ठेवला मृतदेह! आईच इतकी क्रूर का झाली?
17
"मंत्री माझ्या वडिलांच्या पाया पडतात, तू..."; भाजपा नेत्याच्या मुलाची धमकी, महिलने संपवलं जीवन
18
"तुम्ही भारताचे पंतप्रधान असाल किंवा चीनचे राष्ट्राध्यक्ष, पण जर तुम्ही..."; नाटोच्या प्रमुखांची तीन देशांना थेट धमकी
19
हृदयद्रावक! लेकीच्या साखरपुड्याआधी वडिलांना मृत्यूने गाठलं, २० सेकंदात ३ ट्रकने चिरडलं
20
लग्न खरं नाही, पण मजा १००% खरी! दिल्ली-पुण्यात सुरु झालाय 'फेक वेडिंग'चा नवा ट्रेंड, तरुणाई करतेय लाखो खर्च

काकरदा आरोग्य केंद्राला ठोकले कुलूप

By admin | Updated: October 19, 2015 00:05 IST

नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. संतप्त गावक:यांनी काकरदा येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकले.

नंदुरबार : सर्पदंश झालेल्या बालिकेला वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्यामुळे वेळेवर उपचार मिळू शकला नाही. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे संतप्त गावक:यांनी काकरदा, ता.धडगाव येथील आरोग्य केंद्राला कुलूप ठोकल्याची घटना रविवारी घडली. संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचा:यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

काकरदा येथील अर्चना भीमराव वळवी (चार वर्ष) या बालिकेला सर्पदंश झाल्याने शनिवारी सायंकाळी तिला काकरदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे केवळ शिपाई उपस्थित होता. वैद्यकीय अधिकारी किंवा इतर कुणीही कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हता. त्यामुळे नातेवाइकांनी बालिकेला उपचारासाठी म्हसावद ग्रामीण रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

परंतु तेथे असलेल्या रुग्णवाहिकेचा चालकदेखील उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे खाजगी वाहनाने बालिकेला म्हसावद येथे नेण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु अध्र्या रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. जर बालिकेला काकरदा येथेच वेळेवर उपचार मिळाले असते तर तिचा जीव वाचला असता. गेल्या दोन महिन्यात अशा प्रकारची ही चौथी घटना आहे.

चार जणांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गावक:यांनी काकरदा आरोग्य केंद्राला सरळ कुलूप ठोकत निषेध व्यक्त केला. जोर्पयत संबंधितांवर कारवाई होत नाही, तोर्पयत कुलूप उघडणार नाही, असा पवित्रा गावक:यांनी घेतला. तसे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही कळविण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ.कांतीलाल टाटिया यांनी सांगितले.

दरम्यान, काकरदासह इतर अनेक ठिकाणच्या आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नाही. शनिवार व रविवारी नेहमीच आरोग्य केंद्रांमध्ये कुणीही सापडत नाहीत. त्यामुळे अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागत आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही संतप्त गावक:यांकडून करण्यात येत आहे.

यासंदर्भात जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले आहे. त्यात संबंधितांवर कारवाई होत नाही तोर्पयत कुलूप न उघडण्याचा इशारा या निवेदनात सरपंचांसह गावक:यांकडून देण्यात आला आहे.