शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

लॉकडाऊनची शक्यता कमीच मात्र नियम मोडल्यास कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:16 IST

जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण समोर आले तरी उपचाराची सुविधा आहे. मात्र हा संसर्ग वेळीच रोखणे ...

जळगाव : सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असून रुग्ण समोर आले तरी उपचाराची सुविधा आहे. मात्र हा संसर्ग वेळीच रोखणे आवश्यक असून १५ मार्चपर्यंत वाढविलेल्या निर्बंधांच्या कालावधीत बंधने पाळल्यास नियंत्रण मिळविणे शक्य होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे. जिल्ह्यात मृत्युदरावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. मृत्युदर २.१९वर आला आहे. यात काही जण पूर्ण लॉकडाऊनची मागणी करीत असले तरी त्याची शक्यता कमीच असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत म्हणाले.

प्रलंबित अहवालांमुळे वाढती संख्या कोरोना चाचण्या वाढविल्याने प्रलंबित अहवालांचीही संख्या वाढली. मात्र आता त्यांचे अहवाल हळूहळू येऊ लागले असून त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. अहवाल निघाल्यानंतर ही संख्यादेखील कमी होईल. इतर जिल्ह्यातही ही रुग्णसंख्या वाढत गेली व ती खाली आली. आपल्याकडेही हाच ट्रेण्ड दिसून येत असून काही दिवसात रुग्णसंख्या कमी होईल. मात्र या काळात नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले. तसे न झाल्यास प्रशासनातर्फे कारवाईदेखील केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

मृत्युदर नियंत्रणात यश

सध्या रुग्णसंख्या अधिक येत असली तरी या काळात मृत्युदर कमी ठे‌वण्यास मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. यात जे मृत्यू होत आहे, त्यात अधिक वय अथवा इतर आजार हे कारणे आहेत. मात्र गेल्या वर्षी मृत्यूचे जे प्रमाण होते, ते कमी झाले असून एक-एक मृत्यूदेखील रोखणे महत्त्वाचे आहे. लवकरच मृत्युदर दोन टक्क्यांच्याखाली येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हाबंदी शक्य नाही

वाढत्या संसर्गामुळे पूर्ण लॉकडाऊनची मागणी काही जणांकडून होत आहे. मात्र त्याचे परिणाम सर्वच घटकावर होतात. त्यामुळे लॉकडाऊनची या काळात शक्यता कमीच असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. या शिवाय जिल्हाबंदीची मागणी होत आहे. मात्र गेल्या वर्षाची स्थिती वेगळी होती, आता स्थिती वेगळी आहे. सध्या आपल्या जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही संसर्ग असल्याने जिल्हाबंदी करून उपयोग होणार नसल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.