शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ॲलमच्या वाढलेल्या दरामुळे मनपाच्या तिजोरीवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेचे आयोजन बुधवारी सकाळी ११ वाजता ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले आहे. या सभेत एकूण ११ विषय मंजूरीसाठी ठेवण्यात आले असून, उमाळा जलशुध्दीकरण केंद्रात पाणी शुध्द व निर्जतुकीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या ॲलम (पिवळी तुरटी) च्या दरात २५०० रुपयांची वाढ करण्यात आल्यामुळे मनपाच्या तिजोरीवर भार पडणार आहे. याच मुद्द्यावर स्थायी समितीची सभा गाजण्याची शक्यता आहे.

तब्बल महिनाभरानंतर मनपाची स्थायी समितीच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत १२ संविदांसह ११ विषयांवर चर्चा होणार आह. दरवर्षी मनपाकडून पावसाळ्याचा तोंडावर जलशुध्द व निर्जतुकीकरणासाठी ॲलमची खरेदी केली जात असते. गेल्या तीन महिन्यांपासून मनपाकडून ॲलमचा पुरवठा करण्यासाठी निविदा काढण्यात आली होती. यामध्ये चार निविदा काढण्यात आल्या होत्या. तीन निविदांपैकी नाशिक येथील विक्रम केमिकल्स यांची सर्वात कमी दराची निविदा निघाली आहे. विक्रम केमिकल्स यांचे १५ हजार ९९९ रूपये प्रति टन दर आले आहेत. मनपाने हे दर जास्त असल्याने वाटाघाटी केली असता केवळ ३६० रूपये कमी केले असून १५ हजार ३६० रूपये प्रति टन दराला स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर केले आहे. या वाढलेल्या दरामुळे मनपाच्या तिजोरीवर भर पडणार असल्याने याबाबत स्थायी समिती काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

कोविड केअर सेंटरमधील सफाई ठेक्याला मुदतवाढ ?

शहरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी येणाऱ्या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता मनपा प्रशासनाने आपली तयारी सुरु केली आहे. कोविड केअर सेंटरमध्ये फवारणी करणे, साफसफाई करण्याचे काम करत असलेल्या मक्तेदाराला पुढील सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव मनपाने स्थायी समोर ठेवला आहे. या ठेक्याला देखील मनपात मुदतवाढ देण्याची शक्यता आहे. यासह अनुराग स्टेट बँक कॉलनीतील १२ मीटरचा डीपीरोड कॉक्रींटचा करण्याबाबत ९१ लाख ८७ हजार रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार आहे. तसेच दलित वस्ती सुधार योजनेतंर्गत काही कामांना देखील स्थायी सभेत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

नालेसफाईच्या मुद्द्यावर प्रशासन राहणार टार्गेटवर

पावसाळा सुरु झाल्यावर देखील शहरातील नालेसफाईचे काम पुर्ण झालेले नाही. त्यातच पाऊस झाल्यानंतर शहरातील रस्त्यावर पाणी साचत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या मुद्द्यावर सदस्यांकडून मनपा प्रशासनाला घेरण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर विरोधी नगरसेवक सत्ताधाऱ्यांनाही टार्गेट करण्याची शक्यता आहे.