शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

आयुष्य लॉक, पेट्रोल दरवाढ अनलॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:15 IST

- स्टार न्यूज़ क्रमांक : 711 --------- १५ वर्षात पेट्रोलमध्ये झाली तब्बल ५४ रुपयांनी वाढ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव ...

- स्टार न्यूज़ क्रमांक : 711

---------

१५ वर्षात पेट्रोलमध्ये झाली तब्बल ५४ रुपयांनी वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सध्या जळगाव शहरात पेट्रोलचे दर पुन्हा एकदा शंभराच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. डिसेंबर २००७ मध्ये पेट्रोलचे दर ४५ रुपये होते. तेव्हापासून आतापर्यंत पेट्रोलच्या दराने तब्बल ५४ रुपयांनी वाढ झाली आहे. सध्याच्या काळात आयुष्य लॉक अन् पेट्रोलचे दर अनलॉक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

डिसेंबर २००७ च्या सुमारास पेट्रोलचे दर ४५ रुपयांवर होते. डिसेंबर २०२० मध्ये हेच दर ९१ रुपयांच्यावर पोहचले आणि आता सहा महिन्यातच पेट्रोलच्या दरांनी तब्बल ९ रुपयांनी उसळी घेतली आहे. आता जळगाव शहरात पेट्रोल ९९.३० वर गेले आहे. पेट्रोलचे भाव दररोज बदलण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाने आता सामान्यांना पेट्रोल पंपांवर गेल्याशिवाय पेट्रोलचे दर कळत नाही. २०१८ च्या आधी सरकार पेट्रोलच्या दरात वाढ होणार असेल तर त्याची माहिती एक दिवस आधी सामान्यांना देत होती. मात्र आता केंद्र सरकारने ही पद्धत बंद केली. आता दररोज सकाळीच नागरिकांना कळते की पेट्रोलचे दर किती आहेत.

पुन्हा सायकलवर फिरावे का?

पेट्रोलचे भाव सातत्याने वाढत आहे. आधी शंभरचे पेट्रोल गाडीत टाकले की, दोन दिवस सहज पुरत होते. आता पेट्रोलच शंभरवर पोहचले आहे. त्यामुळे साहजिक दररोजच्या येण्या-जाण्याच्या खर्चात देखील मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा सायकल घेऊन फिरावे लागते की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

- पराग पाटील

सध्या आम्ही लॉकडाऊनमुळे घराबाहेर जास्त फिरू शकत नाही. मात्र पूर्वीप्रमाणे व्यवहार सुरू झाले की आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. तेव्हा पेट्रोलही जास्त लागेल. आणि सगळेच बजेट कोलमडून पडेल. सरकारने लवकरात लवकर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावे.

- विनोद देशमुख

पेट्रोल आणि डिझेलचे दर जास्त असल्याने जवळच जायचे असेल तर आम्ही पायीच जातो. त्यामुळे व्यायामदेखील होतो आणि पेट्रोलदेखील वाचते. भाववाढ अशीच सुरू राहिली तर सायकल हाच सर्वोत्तम पर्याय ठरेल. - शैलेश राजपूत

पेट्रोलपेक्षा करच जास्त

सध्या सर्वत्र पेट्रोलच्या मुळ दरापेक्षा त्यावरील करच जास्त असल्याची परिस्थिती आहे. सध्या राज्य शासनाचा दर जवळपास २७ रुपये आणि केंद्र शासनाचा कर ३४ रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे पेट्रोल घेताना नागरिक पेट्रोलच्या मूळ दरापेक्षा जास्त पैसे फक्त राज्य आणि केंद्र सरकारच्या करापोटीच देतात.