शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा ...

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.

जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १९२६ शाळा असून त्यामध्ये सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या. शहरातील नंदिनीबाई विद्यालय, प्रगती विद्यालय यासह इतर शाळांमध्ये सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याआधी प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले. नंतर तापमान व ऑक्सिजन मोजून वर्गात प्रवेश दिला. सामाजिक अंतर राहावे, यासाठी खुणासुध्दा शालेय परिसरात आखण्यात आल्या होत्या.

कुठे तुरळक तर कुठे चांगली उपस्थिती

लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती़ मात्र, ए.टी.झांबरे, नंदिनीबाई तसेच कन्या, चौबे मनपा व इतर शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक केले होते. तर वर्गातही सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात येत होते. गणित, इंग्रजी, विज्ञान यासह इतर काही विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळा सुरू होती.

गप्पा रंगल्या..

दीर्घ कालावधीनंतर वर्गातील मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीसुध्दा हजेरी लावली होती. त्यावेळी संमतीपत्रसुध्दा भरून घेतले जात होते. ए.टी. झांबरे विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा शाळांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षक भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिक्षण विभागाच्या पथकाकडून पाहणी

प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गाची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थी उपस्थिती तपासून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.