शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
3
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
4
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
5
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
6
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
7
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
8
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
9
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
10
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
11
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
12
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
13
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
15
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
16
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
17
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
18
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
19
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
20
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?

दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा ...

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.

जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १९२६ शाळा असून त्यामध्ये सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या. शहरातील नंदिनीबाई विद्यालय, प्रगती विद्यालय यासह इतर शाळांमध्ये सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याआधी प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले. नंतर तापमान व ऑक्सिजन मोजून वर्गात प्रवेश दिला. सामाजिक अंतर राहावे, यासाठी खुणासुध्दा शालेय परिसरात आखण्यात आल्या होत्या.

कुठे तुरळक तर कुठे चांगली उपस्थिती

लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती़ मात्र, ए.टी.झांबरे, नंदिनीबाई तसेच कन्या, चौबे मनपा व इतर शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक केले होते. तर वर्गातही सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात येत होते. गणित, इंग्रजी, विज्ञान यासह इतर काही विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळा सुरू होती.

गप्पा रंगल्या..

दीर्घ कालावधीनंतर वर्गातील मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीसुध्दा हजेरी लावली होती. त्यावेळी संमतीपत्रसुध्दा भरून घेतले जात होते. ए.टी. झांबरे विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा शाळांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षक भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिक्षण विभागाच्या पथकाकडून पाहणी

प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गाची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थी उपस्थिती तपासून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.