शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

दहा महिन्यांनंतर स्कूल चले हम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:58 IST

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा ...

जळगाव : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू करण्यास राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविला होता. त्यानुसार कोरोना नियमांचे पालन करत जळगाव जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा बुधवारपासून सुरू झाल्या. हात सॅनिटाईज करून व तापमान मोजूनच शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाऊन स्वागत करण्यात आले. पहिल्या दिवशी बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली.

जळगाव जिल्ह्यात पाचवी ते आठवीच्या १९२६ शाळा असून त्यामध्ये सुमारे ३ लाख १० हजार विद्यार्थी आहेत. तब्बल दहा महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर बुधवारी इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा उघडल्या. शहरातील नंदिनीबाई विद्यालय, प्रगती विद्यालय यासह इतर शाळांमध्ये सकाळी ७.३० वाजता विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. त्याआधी प्रवेशद्वारावर शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज केले. नंतर तापमान व ऑक्सिजन मोजून वर्गात प्रवेश दिला. सामाजिक अंतर राहावे, यासाठी खुणासुध्दा शालेय परिसरात आखण्यात आल्या होत्या.

कुठे तुरळक तर कुठे चांगली उपस्थिती

लोकमत प्रतिनिधीने शहरातील काही शाळांना भेटी देऊन पाहणी केली. त्यात काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांची तुरळक उपस्थिती होती़ मात्र, ए.टी.झांबरे, नंदिनीबाई तसेच कन्या, चौबे मनपा व इतर शाळांमध्ये पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. प्रत्येक विद्यार्थ्याला मास्क बंधनकारक केले होते. तर वर्गातही सामाजिक अंतर ठेवून बसविण्यात येत होते. गणित, इंग्रजी, विज्ञान यासह इतर काही विषयांच्या अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली. दुपारी तीन वाजेपर्यंत शाळा सुरू होती.

गप्पा रंगल्या..

दीर्घ कालावधीनंतर वर्गातील मित्र-मैत्रिणी भेटल्यानंतर त्यांच्या चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी पालकांनीसुध्दा हजेरी लावली होती. त्यावेळी संमतीपत्रसुध्दा भरून घेतले जात होते. ए.टी. झांबरे विद्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. तसेच विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व सुविधा शाळांकडून उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. खूप दिवसांनी मित्र-मैत्रिणी तसेच शिक्षक भेटल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

शिक्षण विभागाच्या पथकाकडून पाहणी

प्राथमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी विजय पवार यांच्या पथकाकडून जळगाव तालुक्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या वर्गाची पाहणी करण्यात आली. तसेच विद्यार्थी उपस्थिती तपासून आवश्यक सूचना त्यांनी केल्या.