शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

चला करु या, एक दिवस डिजिटल उपवास !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:14 IST

तर सांगायचा मुद्दा किंबहूना तुमच्या लक्षात आलाच असेल. आपण ज्या प्रमाणे आठवडयातून एक दिवस उपवास धरतो. त्या दिवशी अन्न ...

तर सांगायचा मुद्दा किंबहूना तुमच्या लक्षात आलाच असेल. आपण ज्या प्रमाणे आठवडयातून एक दिवस उपवास धरतो. त्या दिवशी अन्न वर्ज करतो, परमेश्वराच्या आठवणीत तो दिवस घालवितो. यामागील धार्मिक आणि अध्यात्मिक उद्देशाबरोबर विज्ञानही आहेच, शरीराच्या कर्मेंद्रियांना एक दिवस आराम मिळावा व त्या अधिक कार्यक्षम पद्धतीने कार्यरत रहाव्यात हे दोन्ही उद्देश आहेत.

आज सर्वत्र मनोरंजन क्षेत्रातील मोबाईल, टीव्ही यांचा वापर जास्त वाढला असला तरी त्यावर नियंत्रण करणे अत्यावश्यक झाले आहे. एक मिनिटही मोबाईल सापडला नाही किंवा अपडेट पाहिले नाही, तर बैचेन होणारी आजची पिढी आहे. त्याच प्रमाणे सतत व जास्त काळ टीव्ही समोर बसून मनोरंजनाच्या नावाखाली बहुमूल्य वेळ घालविणारी कुटुंब व्यवस्था पाहिली की यास आठवड्यातून एक दिवस का होईना, डिजिटल उपवास करावा असेच वाटते. यामुळे फायदा हा होईल की कुटुंबासमवेत आपणास वेळ देता येईल, चांगली पुस्तके वाचता येईल. काही मैदानी वा घरातील बैठे खेळ खेळता येतील, आणि सर्वात म्हणजे या साधनांना पण एक दिवस आराम मिळेल व आपल्या मनासही एक दिवस या डिजिटल खाण्यापासून वेगळे खाद्य मिळेल आणि सकारात्मकता वाढीस लागेल.

आज करोनाच्या परिस्थितीत सर्वत्र भयाचे आणि अशांततेचे वातावरण आहे, व्हाटसअॅप वर सारख्या त्याच करोनाच्या भितीच्या बातम्या, दूरचित्रवाणी वर त्याच बातम्या, वृत्तपत्रावर त्याच बातम्या यामुळे या सर्वांचा विचार करता आपला मनाचा डायट प्लॅन बनवावा लागेल. त्यासाठी एक दिवस डिजिटल उपवास करुन गॅजेट, मोबाईल, टिव्ही वा इतर साधनांपासून स्वत:ला दूर करुन मनाला इतर छंदात गुंतवून ताजेतवाने करा.

- ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी

(लेखिका या वरिष्ठ राजयोग शिक्षिका असून, ब्रह्माकुमारीज् जळगाव उपक्षेत्राच्या निर्देशिका आहेत.)