शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
3
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
4
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
5
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
6
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
7
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
8
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
9
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
10
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
11
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
12
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
13
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
14
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
15
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
16
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
17
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
18
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
19
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
20
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!

‘रमाई घरकुल’कडे लाभार्र्थींची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 01:24 IST

अडीच लाखांसाठी ५ ते १० लाखांच्या मालमत्तेवर लाभार्र्थींच्या उताऱ्यावर बोझा

अमळनेर, जि.जळगाव : अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या जाचक अटींमुळे लाभार्थी मिळत नसल्याने निधी परत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ही योजना बारगळण्याची शक्यता असून शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होणार नसल्याचे चित्र आहे.अनुसूचित जाती म्हणजे एस.सी. प्रवर्गासाठी शासनाने घरकुल बांधण्यासाठी रमाई घरकुल योजनेंतर्गत आधी दीड लाख, नंतर अडीच लाख रुपये अनुदान जाहीर केले आहे. मात्र त्यासाठी नागरिकांचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांच्या आत असले पाहिज. तसेच त्याची किमान ३०० ते ५०० स्केअर फूट जागा स्वत:च्या मालकीची असावी. त्याने आधी कोणताही लाभ घेतलेला नसावा, मात्र अनुदान घेणाºया लाभार्थीला मुद्रांकावर प्रतिज्ञापत्र करून घ्यायचे आहे, त्याला ते घर विकता येणार नाही व त्याला कर्जही मिळणार नाही. म्हणजेच भविष्यात त्याला मुलामुलींच्या लग्नासाठी किंवा सुख-दु:खात तसेच इतर कामांसाठी त्यावर त्याला बँक कर्जही देणार नाही. कारण शासन त्याला अडीच लाख देत आहे अन् उर्वरित रक्कम त्याने टाकून घर बांधकाम करून त्याची मालमत्ता सुमारे पाच लाखांपासून पुढे जाते. त्यावर शासन त्याच्या उताºयावर बोझा लावून घेते. म्हणजे त्याच्या घरकुलावर शासनाचा बोझा लागतो. त्यामुळे त्याला कर्ज मिळत नाही. मुद्रांकावर घरकुल न विकण्याचे प्रतिज्ञापत्र शासन बनवून घेते तर उताºयावर बोझा लावण्याची गरजच काय? त्यामुळे ‘शासन अनुदान देते आहे की कर्ज’ घरावर बोझा लावून तर बँकही कर्ज देते, असाही प्रश्न लाभार्थी उपस्थित करीत आहेत.म्हणून लाभार्र्थींनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे. अमळनेर पालिकेकडे प्रथम ९३ घरकुलांसाठी सुमारे एक कोटीवर निधी आलेला आहे, पैकी २८ घरकुले पूर्ण बांधली आहेत, तर १९ प्रगतीपथावर आहेत. बाकीचे लाभार्थी मिळत नाहीत. पालिकेने वारंवार जाहिरात देऊनही रमाई घरकुल योजनेकडे पाठ फिरवण्यात आली आहे.अमळनेरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. त्याउलट पंतप्रधान आवास योजनेत जाचक अटी नसल्याने नागरिक त्या योजनेचा लाभ घेत आहेत. पंतप्रधान आवास योजनेतही तेवढे अनुदान मिळणार असल्याने मालमत्तेवर निर्बंध नको म्हणून त्या योजनेचा लाभ नागरिकांना सुलभ वाटत आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून पालिकेकडे निधी प्राप्त आहे. मात्र सिटी सर्व्हे कार्यालय अथवा तलाठ्याकडील अहस्तांतरणीय अशी नोंद मालकाने जागेच्या उताºयावर लावल्याशिवाय अखेरचा १० टक्के रकमेचा हप्ता दिला जात नाही म्हणून लाभार्र्थींमध्ये उदासीनता आहे. पालिकेने दोन-तीन वेळा जाहिराती देऊनही अनुसूचित जातीच्या नागरिकांसाठी शासनाने योजना जाहीर करूनही लाभार्थी लाभ घेण्यास तयार नाही हे आश्चर्यजनक आहे.शासनाच्या अटींना घाबरून लाभार्थी अनुदान घेण्यास तयार नाहीत. पालिकेकडे पैसे शिल्लक आहेत व अजून शासन देण्यास तयार आहे. मागासवर्गीय नागरिकांसाठी चांगली योजना आहे. - पुष्पलता पाटील, नगराध्यक्षा, अमळनेरअमळनेर शहरातील नागरिकांनी रमाई घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, अन्यथा आलेला निधी परत जाऊ शकतो. - शोभा बाविस्कर, मुख्याधिकारी, अमळनेर