शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

किमान दुसऱ्या लाटेतून तरी आपण धडा घ्यावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. ...

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. पहिल्या लाटेच्या ९ महिन्यांमध्ये जेवढे रुग्ण आढळले नाहीत, जेवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे मृत्यू व नवीन रुग्ण या तीन महिन्यांत झाले. तरुणांचा बळी गेला... असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, निर्बंध शिथिल होताच, बाजारपेठेत उडालेली गर्दी काय दर्शवतेय... महामारीच्या काळात प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. बाजारात सर्व संपेल, आपल्याला काही मिळणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी आणि त्यातून होणारी ही गर्दी आगामी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही... पहिल्या लाटेनंतर आपण धडा घेतला नाही. किमान दुसऱ्या लाटेतून तरी धडा घेऊ या... आपल्याला साधे तीन नियम पाळायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, त्याशिवाय पर्याय नसेल, तर व्यवस्थित मास्क परिधान करा, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, स्पर्श झाला, तरी ते हात नाका तोंडाला लावू नका, एकमेकांपासून अंतर ठेवून मास्क नाका तोंडावरच परिधान करून बोला... हे नियम कोरोनाला दूर ठेवू शकतात, असे वैद्यकीय यंत्रणा सुरुवातीपासून सांगत आली आहे. दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिलची आकडेवारी, मृतांची संख्या, स्मशानातील चित्र हे सर्वच एकदम भयावह होते, शासकीय यंत्रणेतील बेड मिळविण्यासाठीची वेटिंग, रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची होणारी भटकंती, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रात्र, रात्रभर होणारी धावपळ, व्हेंटिलेटरच्या शोधार्थ रुग्णवाहिकेतच फिरणारे गंभीर रुग्ण... अशी ही भयावह दुसरी लाट ठरली. ३० ते ४० वयोगटांतील अनेक तरुण या लाटेत कोरोनाचे बळी ठरले. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग, प्रमाण अधिकच जलद होते. याचे उदाहरण म्हणजे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत होते. अशी परिस्थिती असताना, आकडे कमी झाले, म्हणून पुन्हा कोरेाना गेल्याच्या गैरसमजातून होणाऱ्या घडामोडी या किती घातक ठरतील, हे वेगळे सांगायची गरज नाही... तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले आहेच... आताच्या स्थितीत गर्दी जेवढी टाळता येईल, तेवढी टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर लाट आपण रोखू शकतो, हे आपल्या हातात आहे... नंतर यंत्रणेच्या भरवशावर राहून आयुष्याशी खेळ करण्यापेक्षा आताच दक्ष राहिल्यास, स्वत:वरील संकट दूर करू शकू, आपोआप कुटुंबावरील, समाजावरील संकट दूर होईल...