शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
2
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
3
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
4
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
5
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
6
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
7
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
8
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
9
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
10
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
11
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
12
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
13
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?
14
BCCI: "आणखी दोन-तीन दिवस वाट पाहू, जर ट्रॉफी परत मिळाली नाही तर...", बीसीसीआयची कडवी भूमिका
15
“मविआचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली का”; भाजपाचा सवाल, राज ठाकरेंबद्दल म्हणाले... 
16
Andhra Pradesh Stampede: आंध्र प्रदेशच्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; ९ भक्तांचा मृत्यू 
17
आज पुन्हा घसरलं सोनं-चांदी, लग्नसराईला सुरुवात होण्यापूर्वी किती स्वस्त झाला? पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
भारतानं मिळवलं दहशतवादावर नियंत्रण, २०१३ नंतर कुठेही मोठा दहशतवादी हल्ला नाही - अजित डोवाल
19
"७५ वर्षांत काश्मीर ताब्यात घेता आले नाही अन्..."; तालिबानने पाकिस्तानच्या दुखऱ्या बाजूवर मीठ रगडले....
20
'या' रेल्वे कंपनीला मुंबई मेट्रोकडून मिळालं २४८१ कोटी रुपयांचं काम, फोकसमध्ये राहणार शेअर्स

किमान दुसऱ्या लाटेतून तरी आपण धडा घ्यावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. ...

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. पहिल्या लाटेच्या ९ महिन्यांमध्ये जेवढे रुग्ण आढळले नाहीत, जेवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे मृत्यू व नवीन रुग्ण या तीन महिन्यांत झाले. तरुणांचा बळी गेला... असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, निर्बंध शिथिल होताच, बाजारपेठेत उडालेली गर्दी काय दर्शवतेय... महामारीच्या काळात प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. बाजारात सर्व संपेल, आपल्याला काही मिळणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी आणि त्यातून होणारी ही गर्दी आगामी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही... पहिल्या लाटेनंतर आपण धडा घेतला नाही. किमान दुसऱ्या लाटेतून तरी धडा घेऊ या... आपल्याला साधे तीन नियम पाळायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, त्याशिवाय पर्याय नसेल, तर व्यवस्थित मास्क परिधान करा, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, स्पर्श झाला, तरी ते हात नाका तोंडाला लावू नका, एकमेकांपासून अंतर ठेवून मास्क नाका तोंडावरच परिधान करून बोला... हे नियम कोरोनाला दूर ठेवू शकतात, असे वैद्यकीय यंत्रणा सुरुवातीपासून सांगत आली आहे. दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिलची आकडेवारी, मृतांची संख्या, स्मशानातील चित्र हे सर्वच एकदम भयावह होते, शासकीय यंत्रणेतील बेड मिळविण्यासाठीची वेटिंग, रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची होणारी भटकंती, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रात्र, रात्रभर होणारी धावपळ, व्हेंटिलेटरच्या शोधार्थ रुग्णवाहिकेतच फिरणारे गंभीर रुग्ण... अशी ही भयावह दुसरी लाट ठरली. ३० ते ४० वयोगटांतील अनेक तरुण या लाटेत कोरोनाचे बळी ठरले. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग, प्रमाण अधिकच जलद होते. याचे उदाहरण म्हणजे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत होते. अशी परिस्थिती असताना, आकडे कमी झाले, म्हणून पुन्हा कोरेाना गेल्याच्या गैरसमजातून होणाऱ्या घडामोडी या किती घातक ठरतील, हे वेगळे सांगायची गरज नाही... तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले आहेच... आताच्या स्थितीत गर्दी जेवढी टाळता येईल, तेवढी टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर लाट आपण रोखू शकतो, हे आपल्या हातात आहे... नंतर यंत्रणेच्या भरवशावर राहून आयुष्याशी खेळ करण्यापेक्षा आताच दक्ष राहिल्यास, स्वत:वरील संकट दूर करू शकू, आपोआप कुटुंबावरील, समाजावरील संकट दूर होईल...