शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

किमान दुसऱ्या लाटेतून तरी आपण धडा घ्यावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. ...

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. पहिल्या लाटेच्या ९ महिन्यांमध्ये जेवढे रुग्ण आढळले नाहीत, जेवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे मृत्यू व नवीन रुग्ण या तीन महिन्यांत झाले. तरुणांचा बळी गेला... असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, निर्बंध शिथिल होताच, बाजारपेठेत उडालेली गर्दी काय दर्शवतेय... महामारीच्या काळात प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. बाजारात सर्व संपेल, आपल्याला काही मिळणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी आणि त्यातून होणारी ही गर्दी आगामी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही... पहिल्या लाटेनंतर आपण धडा घेतला नाही. किमान दुसऱ्या लाटेतून तरी धडा घेऊ या... आपल्याला साधे तीन नियम पाळायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, त्याशिवाय पर्याय नसेल, तर व्यवस्थित मास्क परिधान करा, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, स्पर्श झाला, तरी ते हात नाका तोंडाला लावू नका, एकमेकांपासून अंतर ठेवून मास्क नाका तोंडावरच परिधान करून बोला... हे नियम कोरोनाला दूर ठेवू शकतात, असे वैद्यकीय यंत्रणा सुरुवातीपासून सांगत आली आहे. दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिलची आकडेवारी, मृतांची संख्या, स्मशानातील चित्र हे सर्वच एकदम भयावह होते, शासकीय यंत्रणेतील बेड मिळविण्यासाठीची वेटिंग, रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची होणारी भटकंती, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रात्र, रात्रभर होणारी धावपळ, व्हेंटिलेटरच्या शोधार्थ रुग्णवाहिकेतच फिरणारे गंभीर रुग्ण... अशी ही भयावह दुसरी लाट ठरली. ३० ते ४० वयोगटांतील अनेक तरुण या लाटेत कोरोनाचे बळी ठरले. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग, प्रमाण अधिकच जलद होते. याचे उदाहरण म्हणजे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत होते. अशी परिस्थिती असताना, आकडे कमी झाले, म्हणून पुन्हा कोरेाना गेल्याच्या गैरसमजातून होणाऱ्या घडामोडी या किती घातक ठरतील, हे वेगळे सांगायची गरज नाही... तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले आहेच... आताच्या स्थितीत गर्दी जेवढी टाळता येईल, तेवढी टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर लाट आपण रोखू शकतो, हे आपल्या हातात आहे... नंतर यंत्रणेच्या भरवशावर राहून आयुष्याशी खेळ करण्यापेक्षा आताच दक्ष राहिल्यास, स्वत:वरील संकट दूर करू शकू, आपोआप कुटुंबावरील, समाजावरील संकट दूर होईल...