शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

किमान दुसऱ्या लाटेतून तरी आपण धडा घ्यावा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:12 IST

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. ...

पहिल्या लाटेतून बाहेर पडल्यानंतर कोरोना गेल्याच्या गैरसमजातून वाढलेली बेफिकिरी किती गंभीर रूप घेऊ शकते, हे दुसऱ्या लाटेत समोर आले. पहिल्या लाटेच्या ९ महिन्यांमध्ये जेवढे रुग्ण आढळले नाहीत, जेवढे मृत्यू झाले नाहीत, तेवढे मृत्यू व नवीन रुग्ण या तीन महिन्यांत झाले. तरुणांचा बळी गेला... असे असताना आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना, निर्बंध शिथिल होताच, बाजारपेठेत उडालेली गर्दी काय दर्शवतेय... महामारीच्या काळात प्राधान्यक्रम ठरविणे गरजेचे आहे. बाजारात सर्व संपेल, आपल्याला काही मिळणार नाही, अशा पद्धतीची विचारसरणी आणि त्यातून होणारी ही गर्दी आगामी संकटाला निमंत्रण देणारी ठरेल, यात शंका नाही... पहिल्या लाटेनंतर आपण धडा घेतला नाही. किमान दुसऱ्या लाटेतून तरी धडा घेऊ या... आपल्याला साधे तीन नियम पाळायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे, अत्यावश्यक नसेल, तर घराबाहेर पडणे टाळा, त्याशिवाय पर्याय नसेल, तर व्यवस्थित मास्क परिधान करा, कोणत्याही वस्तूला स्पर्श करू नका, स्पर्श झाला, तरी ते हात नाका तोंडाला लावू नका, एकमेकांपासून अंतर ठेवून मास्क नाका तोंडावरच परिधान करून बोला... हे नियम कोरोनाला दूर ठेवू शकतात, असे वैद्यकीय यंत्रणा सुरुवातीपासून सांगत आली आहे. दुसऱ्या लाटेतील मार्च, एप्रिलची आकडेवारी, मृतांची संख्या, स्मशानातील चित्र हे सर्वच एकदम भयावह होते, शासकीय यंत्रणेतील बेड मिळविण्यासाठीची वेटिंग, रेमडेसिविरसाठी नातेवाइकांची होणारी भटकंती, ऑक्सिजन पुरवठ्यासाठी रात्र, रात्रभर होणारी धावपळ, व्हेंटिलेटरच्या शोधार्थ रुग्णवाहिकेतच फिरणारे गंभीर रुग्ण... अशी ही भयावह दुसरी लाट ठरली. ३० ते ४० वयोगटांतील अनेक तरुण या लाटेत कोरोनाचे बळी ठरले. पहिल्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत संसर्गाचा वेग, प्रमाण अधिकच जलद होते. याचे उदाहरण म्हणजे कुटुंबेच्या कुटुंबे बाधित होत होते. अशी परिस्थिती असताना, आकडे कमी झाले, म्हणून पुन्हा कोरेाना गेल्याच्या गैरसमजातून होणाऱ्या घडामोडी या किती घातक ठरतील, हे वेगळे सांगायची गरज नाही... तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले आहेच... आताच्या स्थितीत गर्दी जेवढी टाळता येईल, तेवढी टाळण्याचा प्रत्येकाने प्रयत्न केला, तर लाट आपण रोखू शकतो, हे आपल्या हातात आहे... नंतर यंत्रणेच्या भरवशावर राहून आयुष्याशी खेळ करण्यापेक्षा आताच दक्ष राहिल्यास, स्वत:वरील संकट दूर करू शकू, आपोआप कुटुंबावरील, समाजावरील संकट दूर होईल...