शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

रस्ते नाही तर कामांचे किमान होर्डिंग्ज तरी लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव- शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. खड्डे आणि धुळीच्या समस्यांमुळे आता जळगावकर रस्त्यावरदेखील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव- शहरातील रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात आहे. खड्डे आणि धुळीच्या समस्यांमुळे आता जळगावकर रस्त्यावरदेखील उतरत आहेत. मात्र सत्ताधाऱ्यांना शहरातील रस्त्यांबाबत कोणतेही गंभीर नसून कोट्यवधींच्या रस्त्यांच्या केवळ घोषणा केला जात आहे. आता सत्ताधाऱ्यांनी शहरात विविध भागात रस्त्यांचे होर्डिंग्ज लावून तरी जळगावकरांना दिलासा द्यावा, अशी कोपरखळी घेत शिवसेना नगरसेवक नितीन लढ्ढा यांनी मनपातील सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे.

शहरातील रस्त्यांच्या प्रश्नावर विविध भागात नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच आणि भागात गेल्या काही दिवसात आंदोलने देखील केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर स्थायी समितीच्या सभेत नितीन लढ्ढा यांनी शिवाजीनगर येथील रस्त्याच्या प्रश्नाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर, स्थायी समिती सभापती यांनी शिवाजीनगरातील रस्ता ४२ कोटींच्या निधीतून मंजूर झाल्याचे सांगितले. त्यावर नितीन लढ्ढा यांनी शहरातील कोणता रस्ता कोणत्या निधीतून मंजूर झाला आहे हे आता सत्ताधारी व मनपा दर अधिकाऱ्यांना देखील सांगणे कठीण झाले असल्याचे सांगितले. कारण गेला दोन वर्षात सत्ताधाऱ्यांकडून शहरात मोठ्या प्रमाणात निधी आणल्याच्या घोषणा केल्या जात आहेत. ७० कोटींचे रस्ते, ४२ कोटींचे रस्ते, नगरोत्थानचा निधी, मनपा फंडातून रस्ते अशाप्रकारे अनेक घोषणा केल्या जात आहेत. मात्र एकही भागात आतापर्यंत नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यामुळेच सत्ताधाऱ्यांनी कोट्यवधीच्या घोषणा न करता केवळ विविध भागात रस्ते बनवण्याचे बॅनर लावले तरीही नागरिकांना काही प्रमाणात का असेना दिलासा मिळेल, असा टोमणा नितीन लढ्ढा यांनी लगावला.

तर मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील

शहरात मनपा मालकीच्या कोट्यवधी किमतीच्या जागा अनेक वर्षांपासून धूळ खात पडून आहेत. तसेच अनेक जागा मनपाने कोट्यवधी रुपये देऊन भूसंपादित केल्या आहेत. मात्र त्यापैकी अनेक जागा मनपाच्या वापरात नसून त्या जागा अजूनही जुनेच मालक वापरत आहेत. भूसंपादित करूनही अनेक जागा मनपा प्रशासनाकडून ताब्यात घेतल्या गेलेला नसल्याने भविष्यात या जागा ही मनपाला पुन्हा दुपटीने यावे लागतील, अशी वेळ निर्माण होऊ शकते. तसेच ट्रान्स्पोर्ट नगर व अनेक मालमत्तादेखील मनपाला ताब्यात घेता आलेल्या नाहीत. अशा परिस्थितीमुळे मनपाची आर्थिक परिस्थिती कधीही सुधारू शकत नसल्याची खंत नितीन लढ्ढा यांनी सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत व्यक्त केली. कोट्यवधीच्या जागांकडे जर अशाच प्रकारे दुर्लक्ष करत राहिले तर मनपाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे स्वप्न हे केवळ स्वप्नच राहील, असे सांगत नितीन लढ्ढा यांनी मनपा प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.