शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आस्थापना अधीक्षकपदी लक्ष्मण सपकाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:16 IST

टोपी व रुमालाला मागणी वाढली जळगाव : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे ...

टोपी व रुमालाला मागणी वाढली

जळगाव : गेल्या आठवड्यापासून तापमानाचा पारा वाढू लागल्याने सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत उन्हापासून संरक्षणासाठी टोपी, रुमाल, महिलांचे स्कार्फ आदी वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. तसेच रस्त्यालागत ठिकठिकाणी या व्यावसायिकांची दुकाने थाटायलाही सुरुवात झाली आहे.

पाणपोई सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून सुभाष चौकातील मनपाची पाणपोई बंद आहे, यामुळे बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी गैरसोय होत आहे, तरी सध्या उन्हाळा सुरू झाल्याने नागरिकांची गैरसोय लक्षात घेता मनपाने ही पाणपोई तातडीने सुरू करण्याची मागणी होत आहे.

दाणाबाजारात लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी

जळगाव : शहरातील बाजारपेठेचा महत्त्वाचा भाग असलेल्या दाणाबाजारात दिवसभर अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते, त्यात दुचाकी व चारचाकी अशा लहान वाहनांचा या बाजारातून वापर सुरू असल्यामुळे दररोज वाहतूक कोंडी होत आहे. तरी मनपा प्रशासनाने दाणाबाजारातून लहान वाहनांना बंदी घालण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलण्याची मागणी

जळगाव : जळगावाहून मुंबईकडे जाणाऱ्या कुशीनगर एक्स्प्रेसची वेळ बदलविल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या गाडीची वेळ पुन्हा पूर्वीप्रमाणे रात्री आठ वाजता करावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तसेच या गाडीला जादा जनरल डबे जोडण्याचीही मागणी होत आहे.

हुतात्मा एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी

जळगाव : कोरोनामुळे गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून भुसावळहून पुण्याकडे जाणारी हुतात्मा एक्स्प्रेस बंद आहे. तसेच ही गाडी पुढे सोलापूरकडेही जात असल्याने, पुणे व सोलापूरला जाणाऱ्या प्रवाशांची गाडी बंद असल्याने चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने हुतात्मा एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.