शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

हासरा नाचरा जरासा लाजरा 'श्रावण' आला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 15:36 IST

वसुंधरेला हिरवे गोंधण: व्रत - वैकल्यांना उधाण, घरोघरी आनंदाचे डोहि आनंद तरंग

जिजाबराव वाघचाळीसगाव: श्रावण म्हणजे वसुंधरेच्या अंगोपांग हिरवे गोंधण.. श्रावण म्हणजे पाऊस भरले अंगण... श्रावण म्हणजे मांगल्य सुवासिक... सण - उत्सवांचे प्रतिक. श्रावणाचे हे सप्तरंगी मनमोहक रुपडे. इंद्रधनूच्या पावलांनी येऊन मनभावन करुन जाते. दरवर्षी येणारा श्रावण नेहमी वेगळाच भासतो. यंदाच्या श्रावणाला कोरोनाची किनार असली तरी, त्याच्या सौदर्याची ओंजळ भरलेलीच असेल. सोमवारपासून सुरु होणाऱ्या श्रावणमासासाठी हिरवा शालू नेसून अवघी वसुंधरा त्याच्या स्वागतासाठी रोमांचित झाली आहे.श्रवणभक्तिसह मांगल्याचे मानाचे पान असणाºया श्रावणाचे वर्णन करतांना कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची कविता 'हासरा नाचरा जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला, तांबूस कोमल पाऊल टाकीत, भिजल्या मातीत श्रावण आला...' अशा शब्द लयीत न्हाऊन निघते. मुळातच श्रावण हा सृजनाला नवी साद घालतो. म्हणूनच कवींच्या हळव्या काळजात श्रावणासाठी एक हक्काचा कोपरा राखून ठेवलेला असतो. बळीराजा असो की सामान्य माणूस श्रावण प्रत्येकाच्या मनगाभारी नाविन्याची अन आनंदाची रांगोळी चितारतो. सृष्टी तर नव्या नवरी सारखी नखशिखांत नटून - तटून निघते. आषाढ सरींनी काहीसा विसावा घेतलेला असतो. ऊन - पावसात श्रावणसरी अल्हादपणे इंद्रधनू होऊन बरसत असतात. अनेकांच्या मनात कवितेची पालवी फुटते. घरोघरी पुजाअर्चेचा धूपदीप दरवळू लागतो.याच महिन्यात रक्षाबंधन, नारळीपौर्णिमा, नागपंचमी, जन्माष्टमी, दहिकाला असे सण - उत्सवही साजरे होतात. यामुळे घरोघरी भक्ति आणि मांगल्याचा गंध भरुन वाहत असतो. श्रावण हा शब्दच उर्जा देणारा आहे. निसर्गाची अपूर्व किमया देखील पहावयास मिळते. मयुराचे मिलनही श्रावणातच फुलते.