शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

उशिरा आलेल्या पावसामुळे संकरित पिकाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:34 IST

यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊसच न आल्याने व कापूस पिकाची वाढ खुंटल्याने गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस उलट कापसासाठी ...

यावर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत पाऊसच न आल्याने व कापूस पिकाची वाढ खुंटल्याने गेल्या दोन-तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस उलट कापसासाठी नुकसानकारक असा ठरणार आहे. तर कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हा पाऊस जलसंजीवनी ठरणार आहे. म्हणून सध्या शेतकऱ्यांमध्ये कहीं खुशी कहीं गम असे चित्र निर्माण झालेले आहे. उशिरा लागवड केलेले कापूस पीक अतिउत्तम आहे. तर मे महिन्याच्या मध्यांतरापासून लागलेल्या कापसाच्या कैऱ्या सडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांची शेतामध्ये कापूस वेचणी सुरू झाल्याने पाण्यामुळे सर्व ओला झालेला आहे. म्हणून हा पाऊस बहुतांश शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरला आहे. असे असले तरी मात्र पिके जरी हातातून जाणार असली तरी भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी हा पाऊस महत्त्वाचा ठरणार आहे.

कोरडवाहू पिके गेली वाया

चोपडा तालुक्यात यावर्षी पाऊस वेळेवर न आल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांनी जवळपास तीनवेळा शेतात बियाणे पेरले मात्र पेरणीनंतर पाऊसच न आल्याने सदर बी पूर्ण क्षमतेने उगवले नाही. तसेच मूग, सोयाबीन, उडीद, मका, ज्वारी, बाजरी, तीड, तीळ, ज्वारी, चवळी, तूर यासारखी पिके पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. जेमतेम बागायतदार शेतकऱ्यांनी लागवड केलेला कापूस ठिबक सिंचनद्वारे अथवा पाटाचे पाणी भरून वाचविण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पाटाचे किंवा ठिबकद्वारे पाणी दिल्याने व वरून पावसाचे पाणीही पडल्याने सर्व फूलपाती गळून पडली. मोठ्या प्रमाणात आलेला प्रथम बहार नष्ट झाला व त्यात पुन्हा जोरदार पाऊस पडला. त्यात शेतामध्ये आता पाणी साचलेले दिसून येते व बहुतांश कापूस पिकावर रोगही पडलेला दिसून येतो. म्हणून गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडणारा पाऊस शेतीसाठी नुकसानकारक तर भूगर्भातील जलपातळी वाढवण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

तालुक्याची दिनांक १ स्पटेंबर रोजीची मंडळनिहाय पर्जन्यमान स्थिती:- १. चोपडा - ३८ मि.मी. २. अडावद - २० मि.मी. ३. धानोरा - २८ मि.मी. ४. गोरगावले - ३३ मि.मी. ५. चहार्डी - ४० मि.मी. ६. हातेड - २३ मि.मी. ७. लासूर - ७६ मि.मी. एकूण पर्जन्यमान - २५८ मिमी *सरासरी पर्जन्यमान - ३६.८५ मिमी* यावर्षी आतापर्यंत झालेले पर्जन्यमान -३२७.१४ मिमी. ## पाऊस फायद्याचा:- दरम्यान तालुका प्रभारी कृषी अधिकारी प्रशांत देसाई यांना उशिरा आलेला पाऊस शेती पिकांसाठी फायद्याचा ठरेल काय? असे विचारले असता काही पिकांना फायदेशीर ठरेल तर काही पिकांना नुकसानकारक हा पाऊस ठरणार आहे. उशिरा कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायद्याचा आहे.

कोट

पिण्याच्या पाण्यासाठी व भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासाठी हा पाऊस समाधानकारक असा ठरेल. प्रशांत देसाई, प्रभारी तालुका कृषी अधिकारी चोपडा.