शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
4
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
5
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
11
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
12
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
13
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
14
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
15
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
16
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
17
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
18
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी

स्व. रंगराव बारी यांच्या ‘उमेदकार’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शिरसोली येथील शिक्षक, कवी स्व. रंगराव बारी लिखीत आणि अथर्व पब्लीकेशन प्रकाशित ‘उमेदकार’ या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शिरसोली येथील शिक्षक, कवी स्व. रंगराव बारी लिखीत आणि अथर्व पब्लीकेशन प्रकाशित ‘उमेदकार’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा साने गुरुजी फाउंडेशन शिरसोलीतर्फे मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पत्रकार भवनात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक बुलडाणा येथील सुरेश कांबळे यांच्या हस्ते या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. हा कविता संग्रह आगामी पिढ्यांसाठी जगण्याची प्रेरणा देणारा असल्याच्या भावना सुरेश कांबळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.

''लोकमत''चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख अतिथी सत्यशोधकी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष डॉ. मिलिंद बागुल, अथर्व पब्लीकेशन तसेच अ. भा. मराठी प्रकाशन संघ पुणे, सदस्य युवराज माळी, साने गुरुजी फाउंडेशनचे सचिव भगवान बारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविकात विलास बारी यांनी कविता संग्रहाच्या प्रकाशनामागची भूमिका स्पष्ट केली. संस्थेची कागदपत्रे चाळत असताना रंगराव बारी यांनी लिहिलेल्या कविता डायरीत आढळल्या, रंगराव बारी यांनी कविता प्रकाशनाची इच्छाही व्यक्त केली होती. त्यांच्या ५२ वर्षीय अनुभवांची मांडणी या कविता संग्रहात असून, त्यांच्या इच्छेनुसार हा कविता संग्रह वाचकांसमोर आणत असल्याचे विलास बारी यांनी सांगितले. सूत्रसंचालन बापू पानपाटील यांनी तर आभार साहित्यिक राजेंद्र पारे यांनी मानले. यावेळी ग.स. सोसायटीचे अध्यक्ष मनोज पाटील, मिलिंद केदार, भय्यासाहेब देवरे, मंगल पाटील, प्रकाश दाभाडे, एल. बी. भारूळे, अस्मिता गुरव, विजय लुल्हे, शिवराम शिरसाठ, संगीता माळी, अनिल सुरडकर, रा. श. साळुंके, सुनील सोनवणे, नायब तहसीलदार जितेंद्र पंजे, आर. डी. कोळी, शिवलाल बारी, निषाद बारी, कैलास बारी, रवींद्र बारी, हेमंत नेमाडे, अशोक भाटिया आदी उपस्थित होते.

पहिल्या पुस्तकाचा वेगळाच आनंद- डॉ. बागुल

हा कविता संग्रह २५ दिवसात प्रकाशित झाल्याचे साहित्यिक डॉ. मिलिंद बागुल यांनी सांगितले. साहित्यिकाला आपल्या पहिल्या पुस्तकाचा एक वेगळाच आनंद असतो आणि रंगराव बारी आपल्यात नसले तरी या पुस्तकाचा आनंद कायम आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:हून कार्यक्रमाला येण्याचा आग्रह केला, असे बंध रंगराव बारी यांनी जोपासले होते, असेही डॉ. बागुल यांनी सांगितले.

प्रेरणादायी काव्यसंग्रह : सुरेश कांबळे

माणूस आणि मातीचा वास असलेले साहित्य हे चिरकाल टिकणारे असते, आणि रंगराव बारी यांचा हा कविता संग्रह लोकांसाठी प्रेरणादायी असल्याचे विचार साहित्यिक सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले. एखाद्या पुस्तकामागे लेखकाचे जेवढे कष्ट असतात तेवढेच कष्ट प्रकाशकाचे असतात. रंगराव बारी यांनी त्यांचा भोवतालचा अनुभव या पुस्तकात मांडला आहे. जे सुचतंय ते लिहा, लोकांना ठरवू द्या ते काय आहे ते, असे ते म्हणाले.

पुस्तकात परिपक्व भावना : मिलिंद कुलकर्णी

रंगराव बारी यांनी ५२ वर्षात जे विश्व उभे केले ते अतुलनिय, थक्क करणारे आहे. त्यांच्या भावना, वेगवेगळे अनुभव त्यांनी या कविता संग्रहात व्यक्त केल्या आहेत. असे ''लोकमत''चे निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले. या पुस्तकात परिपक्व भावना आहे. हा दस्तऐवज तयार करून तो लोकांसमोर आणणे, हे मोठे काम आहे. या पुस्तक रूपाने रंगराव बारी यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.