शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१८ जणांचे मृत्यू पाहिलेल्या लताबाई ठरल्या मृत्युंजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

विलास बारी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वय वर्ष सत्तर, मधुमेहाचा त्रास. त्यात न्यूमोनिया आणि काेरोनाची लागण अशा कठीण ...

विलास बारी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वय वर्ष सत्तर, मधुमेहाचा त्रास. त्यात न्यूमोनिया आणि काेरोनाची लागण अशा कठीण परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील आयसीयु कक्षामध्ये उपचार घेतले. १५ दिवसांच्या कालावधीत आपल्या आजूबाजूचे एक दोन नव्हे तर तब्बल १८ रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतरही कोरोनाला धोबीपछाड करणार्या लताबाई तोताराम कोल्हे या मृत्युंजयी ठरल्या आहेत.

कोरोनाचे भय आणि भीती काही प्रमाणात आता कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागत होती. जळगाव शहरातील स्नेहल काॅलनीतील लताबाई तोताराम कोल्हे यांना कोरोनाचे निदान झाल्याबरोबर सर्व कुटुंबामध्ये एकच भीती पसरली होती.

रेमडेसिविरमुळे शरीरात उष्णता

१३ सप्टेंबर रोजी त्यांना इकरा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना १५ रोजी जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल केले. मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर औषधाची मात्रा काम करीत नव्हती. त्यातच या रुग्णालयातील डाॅक्टरांनी लताबाई यांना रेमडेसिविरचे इंजेक्शन द्यावे लागणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. या दरम्यान इंजेक्शनच्या दुष्परिणामाची माहिती दिली. तब्बल सहा ते सात इंजेक्शन दिल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड उष्णता तयार होऊन जेवण करणे अवघड झाले.

आजूबाजूच्या बेडवरील १८ जणांचा मृत्यू

लताबाई कोरोना वाॅर्डातील ज्या बेडवर होत्या, त्यांच्या आजूबाजूच्या बेडवरील तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. एका रुग्णाला तर संध्याकाळी लताबाई यांनी नारळाचे पाणी दिले आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे भय आजूबाजूला घोंगावत असताना मुलगा राजेंद्र व कुटुंबातील अन्य सदस्यांनी याही परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यानंतर लताबाई यांचेदेखील मृत्यूचे भय गायब झाले.

कोरोनाग्रस्त आईसाठी मुले झाले श्रावण बाळ

लताबाई यांचा मोठा मुलगा राजेंद्र यांनादेखील मधुमेह आहे. लहान मुलगा जितेंद्र पुण्याला राहतो. मात्र आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलगादेखील जळगावात येऊन थांबला. या काळात लहान मुलाने बेड अटेंडन्सची जबाबदारी स्वीकारत आईचे औषधोपचार, जेवणाची जबाबदारी पार पाडली. या काळात मोठ्या मुलाचा व्यवसाय तर ठप्पच झाला. मात्र घरी सुरू केेलेल्या किराणा दुकानाचा व दूध विक्रीचा व्यवसायही ठप्प झाला.

ऑक्सिजन सिलिंडरसाठी रात्री १२ वाजता गाठले शिरसोली

जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यानंतर लताबाई यांना काही दिवस शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्याचे आव्हान होते. काही दिवस घरी ऑक्सिजन कायम ठेवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. मात्र ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था होत नसल्याने पुन्हा चिंता वाढली. शिरसोली येथील एक कोरोनामुक्त आजीसाठी सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. त्याच दिवशी रात्री १२ वाजता मुलगा राजेंद्र व महेंद्र यांनी सिलिंडर मिळावे यासाठी त्या कुटुंबीयांना विनंती केली. याठिकाणी सिलिंडर मिळाल्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांत लताबाई यांची प्रकृती चांगली झाली. कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आता कुठे हे कुटुंब स्थिर झाले आहे.