शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

१८ जणांचे मृत्यू पाहिलेल्या लताबाई ठरल्या मृत्युंजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:14 IST

विलास बारी लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वय वर्ष सत्तर, मधुमेहाचा त्रास. त्यात न्यूमोनिया आणि काेरोनाची लागण अशा कठीण ...

विलास बारी

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वय वर्ष सत्तर, मधुमेहाचा त्रास. त्यात न्यूमोनिया आणि काेरोनाची लागण अशा कठीण परिस्थितीत जिल्हा रुग्णालयातील आयसीयु कक्षामध्ये उपचार घेतले. १५ दिवसांच्या कालावधीत आपल्या आजूबाजूचे एक दोन नव्हे तर तब्बल १८ रुग्ण मृत्युमुखी पडल्यानंतरही कोरोनाला धोबीपछाड करणार्या लताबाई तोताराम कोल्हे या मृत्युंजयी ठरल्या आहेत.

कोरोनाचे भय आणि भीती काही प्रमाणात आता कमी झाली आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकांना कसरत करावी लागत होती. जळगाव शहरातील स्नेहल काॅलनीतील लताबाई तोताराम कोल्हे यांना कोरोनाचे निदान झाल्याबरोबर सर्व कुटुंबामध्ये एकच भीती पसरली होती.

रेमडेसिविरमुळे शरीरात उष्णता

१३ सप्टेंबर रोजी त्यांना इकरा कोविड सेंटरमध्ये दाखल केले. मात्र शरीरातील ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना १५ रोजी जिल्हा रुग्णालयातील आयसीयू कक्षात दाखल केले. मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांच्यावर औषधाची मात्रा काम करीत नव्हती. त्यातच या रुग्णालयातील डाॅक्टरांनी लताबाई यांना रेमडेसिविरचे इंजेक्शन द्यावे लागणार असल्याचे कुटुंबीयांना सांगितले. या दरम्यान इंजेक्शनच्या दुष्परिणामाची माहिती दिली. तब्बल सहा ते सात इंजेक्शन दिल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड उष्णता तयार होऊन जेवण करणे अवघड झाले.

आजूबाजूच्या बेडवरील १८ जणांचा मृत्यू

लताबाई कोरोना वाॅर्डातील ज्या बेडवर होत्या, त्यांच्या आजूबाजूच्या बेडवरील तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला. एका रुग्णाला तर संध्याकाळी लताबाई यांनी नारळाचे पाणी दिले आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. मृत्यूचे भय आजूबाजूला घोंगावत असताना मुलगा राजेंद्र व कुटुंबातील अन्य सदस्यांनी याही परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. त्यानंतर लताबाई यांचेदेखील मृत्यूचे भय गायब झाले.

कोरोनाग्रस्त आईसाठी मुले झाले श्रावण बाळ

लताबाई यांचा मोठा मुलगा राजेंद्र यांनादेखील मधुमेह आहे. लहान मुलगा जितेंद्र पुण्याला राहतो. मात्र आईला कोरोनाची लागण झाल्यानंतर मुलगादेखील जळगावात येऊन थांबला. या काळात लहान मुलाने बेड अटेंडन्सची जबाबदारी स्वीकारत आईचे औषधोपचार, जेवणाची जबाबदारी पार पाडली. या काळात मोठ्या मुलाचा व्यवसाय तर ठप्पच झाला. मात्र घरी सुरू केेलेल्या किराणा दुकानाचा व दूध विक्रीचा व्यवसायही ठप्प झाला.

ऑक्सिजन सिलिंडरसाठी रात्री १२ वाजता गाठले शिरसोली

जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झाल्यानंतर लताबाई यांना काही दिवस शाहू महाराज रुग्णालयात दाखल केले. यादरम्यान ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्याचे आव्हान होते. काही दिवस घरी ऑक्सिजन कायम ठेवण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला. मात्र ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था होत नसल्याने पुन्हा चिंता वाढली. शिरसोली येथील एक कोरोनामुक्त आजीसाठी सिलिंडर असल्याची माहिती मिळाली. त्याच दिवशी रात्री १२ वाजता मुलगा राजेंद्र व महेंद्र यांनी सिलिंडर मिळावे यासाठी त्या कुटुंबीयांना विनंती केली. याठिकाणी सिलिंडर मिळाल्यामुळे पुढच्या तीन ते चार दिवसांत लताबाई यांची प्रकृती चांगली झाली. कोरोनाच्या जीवघेण्या संकटातून बाहेर पडल्यानंतर आता कुठे हे कुटुंब स्थिर झाले आहे.