शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गत १० वर्षात वाचवले २० ते २५ जणांचे प्राण तर तेवढीच काढली बुडालेली प्रेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:18 IST

मुक्ताईनगर : निसर्ग म्हटला म्हणजे त्यात नदी, नाले, ओढे, डोंगर-दऱ्या यासारखे महत्त्वपूर्ण घटक हे ओघाने आलेच. परंतु या घटकांमुळे ...

मुक्ताईनगर : निसर्ग म्हटला म्हणजे त्यात नदी, नाले, ओढे, डोंगर-दऱ्या यासारखे महत्त्वपूर्ण घटक हे ओघाने आलेच. परंतु या घटकांमुळे अनेक वेळेस विविध दुर्घटनादेखील होत असतात किंवा जीवनाला कंटाळून अथवा नैराश्य येऊन जीवन संपवण्यासारखे प्रकारदेखील अनेक वेळेस घडत असतात. याच घटनांमधून सामाजिक बांधिलकी जोपासत अनेकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करणे हा हेतू समोर ठेवून संघटना स्थापन करण्याचा आदर्श कसा जोपासावा यासाठी सुंदर उदाहरण म्हणजे मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथील तापी पूर्णा चालक-मालक नावाडी संघटना होय.

चांगदेव येथे तापी आणि पूर्णा या दोन नद्यांचा संगम असल्याने विस्तीर्ण असा जलाशय आहे. त्यामुळे अनेक वेळेस या ठिकाणी भाविक देवदर्शनासाठी तसेच अस्थी विसर्जन किंवा पर्यटन म्हणून येत असतात. पर्यटकांची कायम असलेली गर्दी व त्यातच तरुणाईमध्ये असलेली हुल्लडबाजी यातून बऱ्याच वेळेस दुर्घटना होत असतात. ही बाब लक्षात आल्याने चांगदेव येथे नावाडी व्यवसाय करणाऱ्या युवकांनी मिळून एक संघटना स्थापन केली. त्या संघटनेला तापी-पूर्णा चालक-मालक नावाडी संघटना असे नाव दिले. २०१५ मध्ये स्थापन झालेल्या या संघटनेचा उद्देशच बुडणाऱ्या व्यक्ती अथवा प्रेत बाहेर काढणे या उद्देशाने प्रेरित होऊन राजेंद्र अंबादास भोई यांच्या अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन केली. या संघटनेत हिरामण मोतीराम भोई हे उपाध्यक्ष असून संजय शिवलाल भोई हे सचिव आहेत, तर ज्ञानेश्वर सदू भोई, किशोर ज्ञानेश्वर भोई, प्रकाश देवराम भोई, विलास शिवदास भोई, गजानन शिवदास भोई, योगेश राजेंद्र भोई, राजेंद्र शिवराम भाई, मनोज हिरामण भोई, गोपाळ त्र्यंबक भोई, जयराम देवराम भोई, प्रकाश देवराम भोई, गोपाळ प्रकाश भोई, प्रवीण परदेशी, प्रवीण ज्ञानेश्वर भोई आणि विजय शिवराम भोई या १८ युवकांची ही समिती बनवण्यात आली आहे.

२०१५ पासून आतापर्यंत या तरुणांनी जवळपास २० ते २५ जणांना जलसमाधी मिळण्यापासून वाचवले आहे. यामध्ये काही जण हे दुर्घटनेतून पाण्यात पडले होते, तर काही जणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच १५ ते २० जणांची प्रेतेदेखील बुडाल्यानंतर तापी नदीतून काढलेली आहेत. यात नुकतेच मेहुण येथे तापी नदीच्या पात्रात बाळकृष्ण तुळशीराम पाटील हे बोदवड तालुक्यातील व्यक्ती असून, ७ ऑगस्ट रोजी पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे प्रेत त्यांनी पाण्यातून बाहेर काढले होते. या युवकांचे कार्यक्षेत्र पूर्ण नदीच्या खामखेडा पुलापासून ते हतनूर धरणापर्यंतचे आहे. विशेष म्हणजे या व्यतिरिक्त एकादशी चांगदेव यात्रा उत्सव या दरम्यान फराळ वाटप करण्यासारखेच सामाजिक उपक्रमदेखील हे तरुण करत असतात.

जीव वाचवण्याचा व प्रयत्न करण्याचे सामाजिक उपक्रम आणि पवित्र कार्य करत असताना मात्र कोणत्याही फळाची अपेक्षा या नावाडी संघटनेकडून व्यक्त केली जात नाही. मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला २०१८ मध्ये पोलीस निरीक्षक अशोक कडलग असताना या युवकांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल संघटनेला प्रमाणपत्र दिले होते. मात्र याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने अशा युवकांची दखल घेऊन त्यांना पुरस्कार देणे किंवा किमान मानधन देणे यासारख्या गोष्टीचा निर्णय घेणे आवश्यक आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांची मदत करणे यासाठी राज्य शासनाने पुरस्कार अथवा मानधन दिल्यास ती एकप्रकारे युवकांना प्रेरणा मिळू शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे.