शहरं
Join us  
Trending Stories
1
लूथरा बंधूंच्या मागे आता ईडी देखील हात धुवून लागणार; दिल्लीतील एकाच पत्त्यावर ४२ बनावट कंपन्या...
2
Nashik Leopard: बिबट्याची नाशिक पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालय आवारातच एन्ट्री, सीसीटीव्हीमध्ये दिसला
3
"२ लाख घरे, ३५० स्क्वेअर फूटचं घर, १ कोटींची किंमत..."; धारावी प्रकल्पानं मुंबईचा चेहरा बदलणार
4
...हे ५६ हजार लोक जगातील संपत्तीवर ठेवतात नियंत्रण; श्रीमंतीच्या नव्या आकडेवारीनं सर्वच हैराण
5
पाकिस्तान हेरगिरी नेटवर्क: गुरुग्राम कोर्टातील वकील नय्यूमला अटक, हवाला कनेक्शनचा संशय!
6
U19 Asia Cup 2025 : वैभव सूर्यवंशीचा धमाका! सिक्सर मारत स्टाईलमध्ये साजरी केली फिफ्टी
7
खळबळजनक! ३ वर्षे इंजिनिअरने केले रुग्णांवर उपचार; भावोजींची डिग्री, पण औषधं द्यायचा मेहुणा
8
‘शेतात जाणाऱ्या महिलाही सुरक्षित नाहीत’, पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर हजारो जोडप्यांचे व्हिडीओ बनल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट
9
नगराध्यक्ष ते राज्यपाल! कसा होता शिवराज पाटील चाकूरकरांचा प्रवास; तब्बल ७ वेळा बनले खासदार
10
उत्तर प्रदेशातील दुसरी सीमा हैदर! लग्नानंतर बांगलादेशी महिला रीना बेगम नेपाळमार्गे थेट भारतात
11
Flipperachi Net Worth: धुरंदरचं व्हायरल गाणं FA9LA गाणाऱ्या फ्लिपरॅचीची संपत्ती किती? दरवर्षी किती करतो कमाई, जाणून घ्या
12
Ghodbunder Road Update: घोडबंदर मार्गावर पुन्हा ३ दिवस अवजड वाहनांना बंदी,  पर्यायी मार्ग कोणते?
13
"मनोरंजनाच्या नावाखाली फक्त हिंसाच...", सध्याच्या कंटेंटवर राधिका आपटेने व्यक्त केली चिंता
14
मेक्सिकोच्या ५०% टॅक्समागे अमेरिकेचा हात? भारतातील 'या' क्षेत्राला बसणार सर्वाधिक झळ
15
IND vs SA: द.आफ्रिकेचा मोठा पराक्रम, भारताविरुद्ध सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा पहिलाच संघ
16
विश्वास बसणार नाही...! मोदी चालले अशा देशा, जिथे १३ महिन्यांचे असते वर्ष; आज तिथे २०१८ सुरु आहे...
17
Nashik Crime: नणंदेला संशय आला, दरवाजा उघडताच वहिनीला बघून चिरकली! नाशिकमध्ये शीतलला पतीनेच संपवले
18
लखनौ हत्याकांडात नवा ट्विस्ट: जादूटोणा आणि चौथा आरोपी! इंजिनियरच्या वडिलांचा धक्कादायक दावा
19
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
20
ITR Refund Delay : ITR रिफंड मिळाला नाही? लाखो करदाते चिंतेत, विलंबाचं खरं कारण काय? अजून किती वाट पाहावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील जमीन व्यवहार संपूर्ण पारदर्शक, आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर राधे-राधे बाबा (इंदूर) यांनी अयोध्येतील जमीन व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक असल्याचे स्पष्टीकरण केले. या व्यवहारात कुठलाही भ्रष्टाचार, घोटाळा नसून हे आरोप म्हणजे राजकीय षड‌‌यंत्र असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर गोवंश हत्येसंदर्भात कडक कायदे करावे, अशी मागणीही केली.

येथील सतपंथ संस्थांच्या आश्रमात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत मागील भूमिका विशद केली. त्यांनी प्रास्ताविकात श्री राम मंदिर निर्माण यासाठी अनेकांनी श्रद्धेने दान दिले आहे. मात्र आज देणगी न देणारे हिशेब मागत आहे, ही शोकांतिका आहे. राधेराधे बाबा यांनी श्रीराम मंदिर निर्माणचे कार्य व्यवस्थित व नियोजनानुसार सुरू आहे. जमिनीचा व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक आहे. १० वर्षांपूर्वी झालेला हा व्यवहार असून आज मंदिर निर्माणानंतर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा यासाठी जी जमीन खरेदी होत आहे शासकीय नियमानुसार हा व्यवहार होत आहे. जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचे कार्य काही मंडळी करीत आहे. त्यांचा निषेध व्यक्त करीत संत समिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सोबत असल्याचे आवर्जुन सांगितले.

यावेळी त्यांनी श्री राम मंदिर ट्रस्टमध्ये संत समितीचे तीन प्रमुख प्रतिनिधी सदस्य असल्याचेही उल्लेख केला. पत्रकार परिषदेला महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, सावदा येथील सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामिनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास, जामनेरच्या गुरुदेव सेवा आश्रमचे श्यामचैतन्य महाराज, स्वामी प्रभुदास महाराज यांची उपस्थिती होती.

गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

या पत्रकार परिषदेत श्री राधे राधे बाबा यांनी गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच 'गो' अभयारण्य निर्माण करावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठ्या निष्ठेने घेतले जाते. त्यांचे पुत्र आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गोवंश हत्या, कत्तलखाने बंद करण्यासाठी कडक पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.