शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

अयोध्येतील जमीन व्यवहार संपूर्ण पारदर्शक, आरोप म्हणजे राजकीय षडयंत्र-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फैजपूर : अयोध्येतील जमीन व्यवहाराबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर राधे-राधे बाबा (इंदूर) यांनी अयोध्येतील जमीन व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक असल्याचे स्पष्टीकरण केले. या व्यवहारात कुठलाही भ्रष्टाचार, घोटाळा नसून हे आरोप म्हणजे राजकीय षड‌‌यंत्र असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले. तसेच त्यांनी महाराष्ट्र सरकारने मध्य प्रदेश व राजस्थानच्या धर्तीवर गोवंश हत्येसंदर्भात कडक कायदे करावे, अशी मागणीही केली.

येथील सतपंथ संस्थांच्या आश्रमात या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महामंडलेश्‍वर जनार्दन हरी महाराज यांनी पत्रकार परिषदेत मागील भूमिका विशद केली. त्यांनी प्रास्ताविकात श्री राम मंदिर निर्माण यासाठी अनेकांनी श्रद्धेने दान दिले आहे. मात्र आज देणगी न देणारे हिशेब मागत आहे, ही शोकांतिका आहे. राधेराधे बाबा यांनी श्रीराम मंदिर निर्माणचे कार्य व्यवस्थित व नियोजनानुसार सुरू आहे. जमिनीचा व्यवहार हा संपूर्ण पारदर्शक आहे. १० वर्षांपूर्वी झालेला हा व्यवहार असून आज मंदिर निर्माणानंतर त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या सोयी सुविधा यासाठी जी जमीन खरेदी होत आहे शासकीय नियमानुसार हा व्यवहार होत आहे. जमीन ट्रस्टच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जनतेला भ्रमित करण्याचे कार्य काही मंडळी करीत आहे. त्यांचा निषेध व्यक्त करीत संत समिती श्रीराम मंदिर ट्रस्टच्या सोबत असल्याचे आवर्जुन सांगितले.

यावेळी त्यांनी श्री राम मंदिर ट्रस्टमध्ये संत समितीचे तीन प्रमुख प्रतिनिधी सदस्य असल्याचेही उल्लेख केला. पत्रकार परिषदेला महामंडलेश्वर पुरुषोत्तमदास महाराज, सावदा येथील सुरेश शास्त्री मानेकर बाबा, स्वामिनारायण गुरुकुलचे उपाध्यक्ष शास्त्री भक्ती किशोर दास, जामनेरच्या गुरुदेव सेवा आश्रमचे श्यामचैतन्य महाराज, स्वामी प्रभुदास महाराज यांची उपस्थिती होती.

गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करा

या पत्रकार परिषदेत श्री राधे राधे बाबा यांनी गोमातेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यात यावी. तसेच 'गो' अभयारण्य निर्माण करावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्यासाठी पुढाकार घ्यावा. आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव मोठ्या निष्ठेने घेतले जाते. त्यांचे पुत्र आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांनी गोवंश हत्या, कत्तलखाने बंद करण्यासाठी कडक पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.