शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव-भुसावळ चौथ्या रेल्वेलाईनसाठी वाटाघाटीद्वारे होणार भूसंपादन: प्रक्रियेत बदल करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 13:18 IST

जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात कमिटी नेमून प्रत्येक शेतकºयांची वाटाघाटी करून ठरविणार दर

ठळक मुद्देतिसºया लाईनवेळी झाले नुकसानशेतकºयांनी मांडल्या समस्यावारसाला नोकरी देण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ-जळगाव चौथ्या रेल्वे लाईनसाठी पूर्वीचा अनुभव व विरोध लक्षात घेऊन बदल करण्याचा निर्णय गुरूवारी प्रांताधिकाºयांकडे झालेल्या रेल्वे व बाधीत शेतकºयांच्या बैठकीत ेघेण्यात आला. जिल्हाधिकारीस्तरावर कमिटी नेमून प्रत्येक शेतकºयाशी चर्चा, वाटाघाटी करून त्याचा जागेचा दर ठरविण्याचे धोरण निश्चित करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली.रेल्वेने भुसावळ -जळगाव दरम्यान चौथ्या लाईनसाठी भूसंपादन मोहीम हाती घेतली आहे. मात्र त्यासाठी जनसुनावणी न घेता थेट मोजणीसाठी सुमारे २५-३० शेतकºयांना नोटीस पाठविल्याने शेतकºयांनी यावर हरकत घेतली होती. जमीन देण्यास शेतकºयांचा विरोध नाही मात्र कोणत्या योजनेसाठी जमिन घेणार? निवाडा कसा करणार? आदीबाबत आधी शेतकºयांना माहिती द्यायला हवी  होती, असा मुद्दा मांडला. त्यामुळे प्रांताधिकाºयांकडे याबाबत बैठक घेण्यात आली.तिसºया लाईनवेळी झाले नुकसानतिसºया रेल्वेलाईनसाठी भूसंपादन झाले. तेव्हा भूसंपादन निवाडा करताना शेतकºयांना फारच कमी दर लावल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यामुळे चौथ्या लाईनसाठी भूसंपादन करताना आधी निवाडा कशा पद्धतीने होणार? मोबदला कसा देणार? असा शेतकºयांचा सवाल होता.शेतकºयांनी मांडल्या समस्याप्रांताधिकारी जलज शर्मा यांच्याकडे झालेल्या बैठकीस रेल्वेचे निर्माण विभागाचे उपमुख्य कार्यकारीअभियंता रोहीत थावरे,  भूमि अभिलेख विभागाचे उपअधीक्षक चांगदेव मोहोडकर तसेच जि.प. सदस्य लालचंद पाटील, योगेश पाटील, मिलिंद कौंडिण्य, सुनील सराफ, सचिन नारखेडे, किसन झटके, सोपान पाटील, ललित बºहाटे, धर्मेंद्र करूले व बाधीत शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकºयांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. तिसºया रेल्वेलाईनच्या भूसंपादनावेळी फारच कमी दर मिळाला. त्याचे अ‍ॅवार्ड झाल्याने बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता चौथ्या लाईनसाठी भूसंपादन करताना योग्य मोबदला मिळावा. तसेच ही भूसंपादीत होणारी जमीन ओरिएंट सिमेंट, भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम, आदीला समांतर आहे. त्यामुळे या औद्योगिक झोनचा विचार भूसंपादन दर ठरविताना व्हावा, अशी मागणीही करण्यात आली. तसेच बाधीत शेतकºयाच्या वारसाला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार रेल्वेच्या सेवेत सामावून घेण्याची मागणीही करण्यात आली.मोबदल्यासाठी कमिटी बाधीत शेतकºयाशी चर्चा करणारतिसºया रेल्वेलाईनसाठीचे भूसंपादन २०१३च्या भूसंपादन कायद्यानुसार झाले होते. त्यामुळे शेतकºयांनी कमी भाव मिळाल्याची तक्रार केली होती. त्यामुळे रेल्वेने यावेळी जिल्हाधिकाºयांच्या नियंत्रणात कमिटी नेमून त्या कमिटीने प्रत्येक बाधीत शेतकºयाशी चर्चा व वाटाघाटी करून मोबदल्याचा दर ठरवावा, असा प्रस्ताव मांडला. त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच शेतकºयांनी एका वारसाला नोकरीची मागणी केली. त्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पठाविण्यात येणार आहे. मात्र जुन्या १८९४ च्या भूसंपादन कायद्यात वारसाला नोकरीची तरतूद होती. नवीन कायद्यात तशी तरतूद नाही. याबाबत रेल्वेकडून मंत्रालयाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. मात्र रेल्वेमंत्रालयाकडून याबाबत काहीही उत्तर आलेले नाही. सर्वच शासकीय नोकºया परिक्षा पास झाल्याशिवाय मिळत नसताना अशाप्रकारे सेवेत सामावून घेणे अवघड असल्याचे समजते.