शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

भूसंपादन प्रकरणी न्यायालयाने मनपाला दिलेली मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:24 IST

मुदतवाढीचा प्रस्ताव नाही

ठळक मुद्दे सहा महिन्यात भरावयाची होती रक्कम

जळगाव : जळगाव शिवारातील गट क्रमांक ३३६ ही जागा संबधित जमीन मालकाला सध्याच्या जमीन भावात देवून भूसंपादन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मनपाला दिलेली सहा महिन्याची संपली आहे. तसेच या प्रकरणात स्थगिती आणण्याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने मनपा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१८ मध्ये मनपाने सहा महिन्यात ही रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत १२ जानेवारी पर्यंत होती.मनपाला या जमीनीच्या भूसंपादनासाठी १२ कोटी रूपये भरावे लागणार आहेत. यासंबधी मनपा प्रशासनाने ११ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत ही जागा भूसंपादित करण्याबाबत महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आयत्यावेळच्या विषयात देण्यात आला. मात्र, महासभेने या विषयाला मंजुरी न देता पुढील महासभेत निर्णय घेण्याचे ठरले होते.त्यानंतर ७ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत सर्वानुमते या प्रस्तावाला स्थगिती देवून या प्रकरणी न्यायालयात जाण्यासाठी महासभेने माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, अ‍ॅड.दिलीप पोकळे, अ‍ॅड.शुचिता हाडा यांची समिती नेमली होती. तसेच कैलास सोनवणे यांनी या प्रकरणात मनपाच्या वकीलांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप देखील केला होता.काय आहे प्रकरणजळगाव शिवारातील जागेवर सिव्हीक सेंटर व प्राथमिक शाळेचे आरक्षण होते. तत्कालीन नगरपालिकेने १९९५ मध्ये ३६ क्रमांकाचा ठराव करून १ हेक्टर ४८ आर जागा प्रती एकरी ३ लाख रुपये दराने जागा मालक सुजय कोल्हे यांच्याकडून संपादित केली होती.मात्र, या प्रकरणी तत्कालीन नगरपालिकेने ही जागा आपल्या नावावर न केल्यामुळे या प्रकरणी जमीन मालकाने ही न्यायालयात जावून ही जागा आपलीच असल्याचे सिध्द केले होते.या प्रकरणी न्यायालयाने मनपाच्या विरोधात निकाल संबधित जमीन मालकाला सध्याचा जमीनीच्या दरानुसार रक्कम देवून या जागेचे भूसंपादन करण्याचा आदेश जुलै २०१८ मध्ये दिला होता.प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे - आयुक्त डांगेन्यायालयाने जुलै २०१८ मध्ये निर्णय देत मनपाला या सहा महिन्यांची मुदत दिली होती. यामध्ये मनपाने संबधित जमीन मालकाला ही रक्कम द्यावी किंवा आपसात वाटाघाटी करणे गरजेचे होते. मात्र, मनपाकडून या सहा महिन्यात कोणतेही नियोजन केले नाही. तसेच महासभेने समिती स्थापन करून या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असता मनपाने न्यायालयाकडून या प्रकरणी मुदतवाढ करणे अपेक्षित होते.या प्रकरणी आयुक्तांना विचारले असता, भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, केवळ जमीनीचा दर निर्धारित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका होती अशी माहिती काही तज्ज्ञांनी दिली.