शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
3
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
4
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
5
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
6
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
7
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
10
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
11
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
12
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
13
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
14
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
15
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
16
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
17
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
18
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
19
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
20
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

भूसंपादन प्रकरणी न्यायालयाने मनपाला दिलेली मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 13:24 IST

मुदतवाढीचा प्रस्ताव नाही

ठळक मुद्दे सहा महिन्यात भरावयाची होती रक्कम

जळगाव : जळगाव शिवारातील गट क्रमांक ३३६ ही जागा संबधित जमीन मालकाला सध्याच्या जमीन भावात देवून भूसंपादन करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मनपाला दिलेली सहा महिन्याची संपली आहे. तसेच या प्रकरणात स्थगिती आणण्याबाबत मनपा प्रशासनाकडून कोणतीही हालचाल होत नसल्याने मनपा प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जुलै २०१८ मध्ये मनपाने सहा महिन्यात ही रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. त्याची मुदत १२ जानेवारी पर्यंत होती.मनपाला या जमीनीच्या भूसंपादनासाठी १२ कोटी रूपये भरावे लागणार आहेत. यासंबधी मनपा प्रशासनाने ११ आॅक्टोबर रोजी झालेल्या महासभेत ही जागा भूसंपादित करण्याबाबत महासभेच्या मंजुरीसाठी प्रस्ताव आयत्यावेळच्या विषयात देण्यात आला. मात्र, महासभेने या विषयाला मंजुरी न देता पुढील महासभेत निर्णय घेण्याचे ठरले होते.त्यानंतर ७ डिसेंबर रोजी झालेल्या महासभेत सर्वानुमते या प्रस्तावाला स्थगिती देवून या प्रकरणी न्यायालयात जाण्यासाठी महासभेने माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे, अ‍ॅड.दिलीप पोकळे, अ‍ॅड.शुचिता हाडा यांची समिती नेमली होती. तसेच कैलास सोनवणे यांनी या प्रकरणात मनपाच्या वकीलांनी मोठा घोटाळा केल्याचा आरोप देखील केला होता.काय आहे प्रकरणजळगाव शिवारातील जागेवर सिव्हीक सेंटर व प्राथमिक शाळेचे आरक्षण होते. तत्कालीन नगरपालिकेने १९९५ मध्ये ३६ क्रमांकाचा ठराव करून १ हेक्टर ४८ आर जागा प्रती एकरी ३ लाख रुपये दराने जागा मालक सुजय कोल्हे यांच्याकडून संपादित केली होती.मात्र, या प्रकरणी तत्कालीन नगरपालिकेने ही जागा आपल्या नावावर न केल्यामुळे या प्रकरणी जमीन मालकाने ही न्यायालयात जावून ही जागा आपलीच असल्याचे सिध्द केले होते.या प्रकरणी न्यायालयाने मनपाच्या विरोधात निकाल संबधित जमीन मालकाला सध्याचा जमीनीच्या दरानुसार रक्कम देवून या जागेचे भूसंपादन करण्याचा आदेश जुलै २०१८ मध्ये दिला होता.प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे - आयुक्त डांगेन्यायालयाने जुलै २०१८ मध्ये निर्णय देत मनपाला या सहा महिन्यांची मुदत दिली होती. यामध्ये मनपाने संबधित जमीन मालकाला ही रक्कम द्यावी किंवा आपसात वाटाघाटी करणे गरजेचे होते. मात्र, मनपाकडून या सहा महिन्यात कोणतेही नियोजन केले नाही. तसेच महासभेने समिती स्थापन करून या प्रकरणी न्यायालयात जाण्याची तयारी दर्शवली असता मनपाने न्यायालयाकडून या प्रकरणी मुदतवाढ करणे अपेक्षित होते.या प्रकरणी आयुक्तांना विचारले असता, भूसंपादनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आला असून, या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयाने मुदतवाढ घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र, केवळ जमीनीचा दर निर्धारित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाची भूमिका होती अशी माहिती काही तज्ज्ञांनी दिली.