शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
3
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
4
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
5
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
6
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
7
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
8
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
9
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
10
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
11
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
12
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
13
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
14
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
15
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
16
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
17
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
18
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
19
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
20
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक

दमदार पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता : ८८ टक्के पेरणी; पावसाची अनियमितता कायम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे राज्यात सर्वदूर ...

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता : ८८ टक्के पेरणी; पावसाची अनियमितता कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने थैमान घातले असताना, जिल्ह्यात मात्र पावसाची अनियमितता कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील पिकांवर मोठा परिणाम होत असून, तब्बल २ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाला फटका बसला आहे. अनेक भागांत पावसाच्या पाण्याअभावी हंगामपूर्व कापसासह कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाचीही वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे २५ टक्के नुकसान झाले होते, तर या वर्षी पावसाअभावी कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर अनेक भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. आता दुबार पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना वरुण राजा मात्र जळगाव जिल्ह्यावर रुसून बसल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकूण सरासरीच्या १५ टक्के तर आता जुलै महिन्यातही सद्यस्थितीत एकूण सरासरीच्या २० टक्के कमी पाऊस आहे. जुलै महिन्याचे अद्याप ११ दिवस शिल्लक असून, या उर्वरित दिवसांमध्ये तरी पावसाची तूट भरून निघावी, अशी अपेक्षा शेतकरी लावून बसले आहेत. आता जर अजून काही दिवस पावसाने पाठ फिरवली, तर दुबार पेरणीचे पीकही संकटात येऊन जाईल.

कापसाची फुले फुलण्याची प्रक्रिया थांबली

जिल्ह्यात मे महिन्यातच हंगामपूर्व कापसाची लागवड होत असते. त्यानंतर, जुलै महिन्यात कापसाला फुले फुलण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. मात्र, या वर्षी पावसाचे पाणी न मिळाल्याने कापसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रियाही थांबली आहे. ही प्रक्रिया थांबल्यास हंगामही लांबेल व त्याचा परिणाम उत्पादनावरी होईल.

जिल्ह्यात मान्सून का रुसला

१. जळगाव जिल्ह्यात नेहमी अरबी समुद्राकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस होत असतो. समुद्राकडून येणारे वारे, नंदुरबार, नाशिकमार्गे जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, या वर्षी अरबी समुद्रात ढग तयार होत आहेत. मात्र, वाऱ्यांची दिशा उत्तर-पूर्व असल्याने कोकणात हजेरी लावून पाऊस थेट गुजरात, मध्य प्रदेशकडे रवाना होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.

२. मान्सूनचा नेहमीचा मार्ग यावेळेस भरकटलेला दिसून येत आहे. त्यामुळे सर्वदूर पाऊस होत असताना, जळगाव जिल्हा मात्र वंचित राहत आहे. वाऱ्याची दिशा बदलली, तर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते असेही डॉ.साबळे यांनी सांगितले. या वर्षी हवामान बदलाचा परिणाम मान्सूनवर दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन दिवस महत्त्वाचे

हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात ५० ते ७० टक्के पावसाची शक्यता सांगितली असली, तरी हा पाऊस अनियमित स्वरूपाचाच राहणार आहे. एखाद्या तालुक्यात एकाच वेळी चांगला पाऊस होत आहे, तर दुसरीकडे मात्र पाऊस होत नाही. जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी झाली आहे. आता पुन्हा पावसाने दडी मारल्यास या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.