शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता : ८८ टक्के पेरणी; पावसाची अनियमितता कायम लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : एकीकडे राज्यात सर्वदूर ...

उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता : ८८ टक्के पेरणी; पावसाची अनियमितता कायम

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : एकीकडे राज्यात सर्वदूर जोरदार पावसाने थैमान घातले असताना, जिल्ह्यात मात्र पावसाची अनियमितता कायम आहे. यामुळे जिल्ह्यातील पिकांवर मोठा परिणाम होत असून, तब्बल २ लाख हेक्टर क्षेत्रावरील कापसाला फटका बसला आहे. अनेक भागांत पावसाच्या पाण्याअभावी हंगामपूर्व कापसासह कोरडवाहू क्षेत्रावरील कापसाचीही वाढ खुंटली आहे. यामुळे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे २५ टक्के नुकसान झाले होते, तर या वर्षी पावसाअभावी कापसाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत ८८ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत, तर अनेक भागांत शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. आता दुबार पेरणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असताना वरुण राजा मात्र जळगाव जिल्ह्यावर रुसून बसल्याचे पाहायला मिळत आहे. जून महिन्यात एकूण सरासरीच्या १५ टक्के तर आता जुलै महिन्यातही सद्यस्थितीत एकूण सरासरीच्या २० टक्के कमी पाऊस आहे. जुलै महिन्याचे अद्याप ११ दिवस शिल्लक असून, या उर्वरित दिवसांमध्ये तरी पावसाची तूट भरून निघावी, अशी अपेक्षा शेतकरी लावून बसले आहेत. आता जर अजून काही दिवस पावसाने पाठ फिरवली, तर दुबार पेरणीचे पीकही संकटात येऊन जाईल.

कापसाची फुले फुलण्याची प्रक्रिया थांबली

जिल्ह्यात मे महिन्यातच हंगामपूर्व कापसाची लागवड होत असते. त्यानंतर, जुलै महिन्यात कापसाला फुले फुलण्याची प्रक्रिया ही सुरू होत असते. मात्र, या वर्षी पावसाचे पाणी न मिळाल्याने कापसाची वाढ खुंटली आहे. त्यामुळे फुले फुलण्याची प्रक्रियाही थांबली आहे. ही प्रक्रिया थांबल्यास हंगामही लांबेल व त्याचा परिणाम उत्पादनावरी होईल.

जिल्ह्यात मान्सून का रुसला

१. जळगाव जिल्ह्यात नेहमी अरबी समुद्राकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यांमुळे पाऊस होत असतो. समुद्राकडून येणारे वारे, नंदुरबार, नाशिकमार्गे जिल्ह्यात दाखल होत असतात. मात्र, या वर्षी अरबी समुद्रात ढग तयार होत आहेत. मात्र, वाऱ्यांची दिशा उत्तर-पूर्व असल्याने कोकणात हजेरी लावून पाऊस थेट गुजरात, मध्य प्रदेशकडे रवाना होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी दिली.

२. मान्सूनचा नेहमीचा मार्ग यावेळेस भरकटलेला दिसून येत आहे. त्यामुळे सर्वदूर पाऊस होत असताना, जळगाव जिल्हा मात्र वंचित राहत आहे. वाऱ्याची दिशा बदलली, तर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात होऊ शकते असेही डॉ.साबळे यांनी सांगितले. या वर्षी हवामान बदलाचा परिणाम मान्सूनवर दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले.

तीन दिवस महत्त्वाचे

हवामान विभागाने पुढील तीन दिवस जिल्ह्यात ५० ते ७० टक्के पावसाची शक्यता सांगितली असली, तरी हा पाऊस अनियमित स्वरूपाचाच राहणार आहे. एखाद्या तालुक्यात एकाच वेळी चांगला पाऊस होत आहे, तर दुसरीकडे मात्र पाऊस होत नाही. जिल्ह्यात जळगाव, चोपडा, अमळनेर, धरणगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुबार पेरणी झाली आहे. आता पुन्हा पावसाने दडी मारल्यास या पेरण्याही वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस महत्त्वाचे असून, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे.