शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोरी धरणावर सुविधांचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 00:50 IST

तामसवाडी येथील स्थिती : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून उघडले दरवाजे

पारोळा : तामसवाडी येथील बोरी धरणावर गेट उघडविणे बंद करणे हे जोखमीचे काम आज ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांकडून केले जाते. ही धक्कादायक बाब धरणातील पाणी पातळी वाढल्यामुळे दरवाजे उघडण्याच्या वेळी १ रोजी निदर्शनास आली.बोरी धरण हे तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे धरण आहे. मात्र त्या तुलनेत धरणाची सुरक्षा हवी तशी नाही. धरणाच्या काठावर, धोकादायक ठिकाणांवर कोणीही कधीही येऊ शकते अशी स्थिती आहे. अशा व्यक्तींची साधी चौकशीदेखील केली जात नाही. धरणावर येणाऱ्यांची चौकशी केल्याशिवाय त्यांना धरण परिसरात जास्त वेळ थांबायला तसेच धरणाच्या आत जाण्यास नागरिकांना मज्जाव करावा. धरणाची सुरक्षा वाढविण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.रविवारी १ रोजी जोरदार पावसामुळे धरणाची पाणी पातळी अचानक वाढली. आणि ८५ टक्के धरण भरले. पाण्याची आवक जोरात असल्याने धरणाचे ५ दरवाजे उघडवावे लागले. हे दरवाजे कसे उघडावेत, याबाबत येथील कोणत्याही कार्मचाºयाला पुरेशी माहिती नाही. मग या धरणावर याच कामावरून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी यशवंत कुलकर्णी रा.तामसवाडी यांना बोलवून दरवाजे उघडण्यात आले. यासाठी स्वतंत्र कर्मचाºयाची नेमणूक अद्याप केलेली नाही अथवा येथील कर्मचाºयांनाही तसे प्रशिक्षण दिलेले नाही. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास धरणाचे दरवाजे उघडण्यासाठी संबंधित कामाचा कर्मचारी असणे गरजेचे आहे.२४ तास हवा वीजपुरवठाधरणस्थळी २४ तास वीजपुरवठा असायला हवा. पण या ठिकाणी ही १२ तासांचे भरनियमन आहे. ज्या दिवशी अचानक दरवाजे उघडण्याची वेळ आली त्यावेळी जनरेटरचा उपयोग करावा लागला. यातून प्रशासकीय उदासीनता दिसून येते.मेहुटेहूपर्यंत असलेल्या पाटचारी दुरुस्ती व शिवल्या नाल्याची जेसीबीच्या साह्याने साफसफाई करावी. तसेच बोरीतून पाणी सोडण्याची वेळ आल्यास ते पाटचारीत सोडून कंकराज धरणाचे पुनर्भरण करावे, अशा सूचना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी दिल्या.