शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कामगार वसाहतीचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 21:43 IST

मालदाभाडी : बंद स्टार्च प्रकल्पाकडे शासनाचे दुर्लक्ष, ५०० कुटुंबांचा प्रश्न

जामनेर : मालदाभाडी येथील स्टार्च प्रकल्प सहा महिन्यांपासून बंद पडला असून, गेल्या महिन्यात कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना साकडे घातले होते. तरीही कोणताही तोडगा न निघाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी कामगार आयुक्तांसह जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले आहे. मंगळवारी प्रकल्पासमोरील कामगार वसाहतीचा वीज पुरवठा बिल थकल्याने वीज वितरण कंपनीने खंडित केला. यामुळे सुमारे पाचशे कुटुंबांवर उमासमारीची वेळ आली आहे.खासगी तत्त्वावर सुरु असलेल्या या प्रकल्पात ३५० कायम व सुमारे १५० हंगामी कर्मचारी काम करीत होते. जानेवारी २०१९ पासून प्रकल्प बंद असून, एप्रिलपासून कायम कर्मचाºयांना वेतन नाही. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा खर्च व उदरनिर्वाह करणे अशक्य झाले आहे. कायम कर्मचारी असल्याने सोडूनही जाता येत नाही. प्रकल्प सुरू करणार अथवा नाही याबाबत व्ययवस्थापनाने भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा थकीत पगारासह देणी परत करावी, या आशयाचे निवेदन कर्मचाºयांनी यापूर्वीच प्रकल्प उपाध्यक्षांना दिले होते.वीज वितरण कंपनीची प्रकल्पाकडे ६५ लाख, कर्मचारी वसाहतीकडे १ लाख २९ हजार व पाणी पुरवठा विभागाकडे ४ लाख ६१ हजार थकबाकी असल्याची माहिती मिळाली.मंगळवारी कंपनीने कर्मचारी वसाहतीचा वीजपुरवठा खंडित केला. यावेळी महिलांनी त्यांना वीज खंडित न करण्याबाबत विनंती केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कंपनीने यापूर्वीच प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडित केला आहे.दिवाळीपूर्वी पालकमंत्री व शासनाने याकडे लक्ष देऊन कर्मचारी हिताचा निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.