शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

कोगटा, तोतला यांनी घेतले कोटींच्या घरात कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची परतफेड दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्या कर्जात चुकीच्या पध्दतीने समायोजित केलेल्या आहेत. कर्जदार तुपाशी तर ठेवीदार उपाशी अशी गत या प्रकरणात झालेली आहे. प्रेम कोगटा व जयश्री अंतिम तोतला यांनी तर पावणे दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. दरम्यान, सीआयडीने केलेल्या लेखापरीक्षणात संस्थेने नियमबाह्य कर्जाची खिरापत वाटल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे व इतर पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात अटक केलेले प्रेम कोगटा यांनी बीएचआरकडून १ कोटी ८० लाख ३९ हजार ९७३ रुपये कर्ज घेतले होते, तर भागवत भंगाळे यांनी ९० लाख ८२ हजार ७२९ रुपये कर्ज घेतले होते. भागवत भंगाळे यांनी २२ मे २०१८ रोजी कर्जाची परतफेड केल्याचा दाखला लोकमत कार्यालयात आणून दिला होता. जयश्री शैलेश मणियार यांनी ६४ लाख ५५ हजार २८३ रुपये, संजय भगवानदास तोतला यांनी ६४, लाख १ हजार ७६२ रुपये, जयश्री अंतिम तोतला यांनी १ कोटी ६८ लाख ३५ हजार ७० रुपये कर्ज घेतले होते. या शिवाय यांच्याच कुटुंबात आणखी इतरांनी नियमबाह्य कर्ज घेतल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

औरंगाबादमध्येही महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने बीएचआरसह वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यातूनच अंबादास आबाजी मानकापे (रा.औरंगाबाद) यांना अटक झाली आहे.

संगणकातील नोंदी डिलीट, नियमबाह्य कर्ज

लेखापरीक्षणात काही पुरावे आढळून येऊ नये म्हणून संस्थेच्या संगणकातील महत्त्वाच्या नोंदी डिलीट करण्यात आलेल्या आहेत तर काही प्रकरणात दप्तरच गायब झालेले आहे किंवा जाणूनबुजून लेखापरीक्षकांपुढे दप्तर सादर केलेले नाही. कर्जाच्या नोंदी संगणकातून डिलीट केल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे. अंतिम भगवानदास तोतला यांना ६० लाख, त्यांची पत्नी जयश्री यांना ६० लाखाचे नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

--