शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

कोगटा, तोतला यांनी घेतले कोटींच्या घरात कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्यांनी बीएचआर पतसंस्थेकडून कोटीच्या घरात कर्ज घेतले असून त्याची परतफेड दाखविण्यात आली असली तरी प्रत्यक्षात ठेवीदारांच्या पावत्या घेऊन त्या कर्जात चुकीच्या पध्दतीने समायोजित केलेल्या आहेत. कर्जदार तुपाशी तर ठेवीदार उपाशी अशी गत या प्रकरणात झालेली आहे. प्रेम कोगटा व जयश्री अंतिम तोतला यांनी तर पावणे दोन कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे. दरम्यान, सीआयडीने केलेल्या लेखापरीक्षणात संस्थेने नियमबाह्य कर्जाची खिरापत वाटल्याचेही उघड झाले आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे व इतर पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट केले आहे. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्यात अटक केलेले प्रेम कोगटा यांनी बीएचआरकडून १ कोटी ८० लाख ३९ हजार ९७३ रुपये कर्ज घेतले होते, तर भागवत भंगाळे यांनी ९० लाख ८२ हजार ७२९ रुपये कर्ज घेतले होते. भागवत भंगाळे यांनी २२ मे २०१८ रोजी कर्जाची परतफेड केल्याचा दाखला लोकमत कार्यालयात आणून दिला होता. जयश्री शैलेश मणियार यांनी ६४ लाख ५५ हजार २८३ रुपये, संजय भगवानदास तोतला यांनी ६४, लाख १ हजार ७६२ रुपये, जयश्री अंतिम तोतला यांनी १ कोटी ६८ लाख ३५ हजार ७० रुपये कर्ज घेतले होते. या शिवाय यांच्याच कुटुंबात आणखी इतरांनी नियमबाह्य कर्ज घेतल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

औरंगाबादमध्येही महत्त्वाचे कागदपत्रे हस्तगत

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) या पतसंस्थेमध्ये अवसायक जितेंद्र कंडारे व त्याच्या साथीदारांनी केलेल्या गैरव्यवहाराचे पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तब्बल एक ट्रक भरुन पुरावे गोळा केले आहेत. त्यात प्रामुख्याने बीएचआरसह वेगवेगळ्या १२ ठिकाणी टाकलेल्या धाडीत मिळालेली कागदपत्रे, शपथपत्रे, तसेच लॅपटॉप, पीसीओसह मोठ्या प्रमाणावर डिजिटल साहित्यही हस्तगत करण्यात आले आहे. याबरोबरच औरंगाबाद व अन्य ठिकाणी केलेल्या तपासणीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. त्यातूनच अंबादास आबाजी मानकापे (रा.औरंगाबाद) यांना अटक झाली आहे.

संगणकातील नोंदी डिलीट, नियमबाह्य कर्ज

लेखापरीक्षणात काही पुरावे आढळून येऊ नये म्हणून संस्थेच्या संगणकातील महत्त्वाच्या नोंदी डिलीट करण्यात आलेल्या आहेत तर काही प्रकरणात दप्तरच गायब झालेले आहे किंवा जाणूनबुजून लेखापरीक्षकांपुढे दप्तर सादर केलेले नाही. कर्जाच्या नोंदी संगणकातून डिलीट केल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे. अंतिम भगवानदास तोतला यांना ६० लाख, त्यांची पत्नी जयश्री यांना ६० लाखाचे नियमबाह्य कर्ज वाटप केल्याचे लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे.

--