शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
3
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
4
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
5
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
6
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
7
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
8
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
9
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
10
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
11
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
12
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
13
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
14
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
15
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
16
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
17
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
18
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
19
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
20
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन पुकारले आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठे किसान आंदोलन असून, हे अहिंसक आंदोलन शेतकरी आपल्या एकजुटीने नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास लोकसंघर्ष मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला समर्थन म्हणून प्रतिभा शिंदे या देखील २४ नोव्हेंबरपासून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून परत जळगावला आल्या आहेत. या ऐतिहासीक ‘किसान आंदोलना’तील त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला.

मागण्यांबाबत प्रत्येक शेतकरी जागृत

किसान आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा अभ्यास नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवकापासून ते ज्येष्ठ नागरिकाला देखील आपल्या मागण्या व कृषी विधेयकातील शेतकरी विरोधी कायदा याबाबतची माहिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शेतकरी आता आपल्या न्याय व हक्कासाठी जागृत झाला असून, त्याचे हे मुर्तीमंत उदाहरण या आंदोलनात पहायला मिळत आहे.

खलिस्तानच्या घोषणा या केवळ अफवा

या आंदोलनात खलिस्तानबाबतच्या घोषणा देण्यात आल्या अशाही वावड्या पसरविल्या जात आहेत. मुस्लिमांनी आंदोलन केले तर त्यांना आंतकवादी म्हणून भाजप सरकारकडून हिनवले जाते. पुरोगाम्यांनी आंदोलन केले तर ते नक्षलवादी आता पंजाबसह संपुर्ण भारतातील शेतकरी एकत्र आला आहे. तर त्यांना खलिस्तानी चळवळ म्हणून चुकीचा प्रचार हा केला जात आहे. या आंदोलनात १५ दिवस काम केल्यानंतर या आंदोलनात केवळ शेतकरी व आपला भारतच केंद्रबिंदू असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी व त्यांच्या ‘मोदी मीडिया’कडून हा आरोप केला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातूनही पाठिंबा

दिल्ली येथे आंदोलन करण्याचे निश्चित झाल्यानंतर याठिकाणी दिल्लीला लागून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होण्याचे ठरले होते. तसेच इतर राज्यातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विविध संघटनातील सदस्यांनी सहभागी होण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून लोकसंघर्ष मोर्च्याचे २८० कार्यकर्ते व इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भविष्यात हे आंदोलन तीव्र केल्यानंतर राज्यातूनही शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला संपुर्ण देशातील शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.