शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन पुकारले आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठे किसान आंदोलन असून, हे अहिंसक आंदोलन शेतकरी आपल्या एकजुटीने नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास लोकसंघर्ष मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला समर्थन म्हणून प्रतिभा शिंदे या देखील २४ नोव्हेंबरपासून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून परत जळगावला आल्या आहेत. या ऐतिहासीक ‘किसान आंदोलना’तील त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला.

मागण्यांबाबत प्रत्येक शेतकरी जागृत

किसान आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा अभ्यास नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवकापासून ते ज्येष्ठ नागरिकाला देखील आपल्या मागण्या व कृषी विधेयकातील शेतकरी विरोधी कायदा याबाबतची माहिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शेतकरी आता आपल्या न्याय व हक्कासाठी जागृत झाला असून, त्याचे हे मुर्तीमंत उदाहरण या आंदोलनात पहायला मिळत आहे.

खलिस्तानच्या घोषणा या केवळ अफवा

या आंदोलनात खलिस्तानबाबतच्या घोषणा देण्यात आल्या अशाही वावड्या पसरविल्या जात आहेत. मुस्लिमांनी आंदोलन केले तर त्यांना आंतकवादी म्हणून भाजप सरकारकडून हिनवले जाते. पुरोगाम्यांनी आंदोलन केले तर ते नक्षलवादी आता पंजाबसह संपुर्ण भारतातील शेतकरी एकत्र आला आहे. तर त्यांना खलिस्तानी चळवळ म्हणून चुकीचा प्रचार हा केला जात आहे. या आंदोलनात १५ दिवस काम केल्यानंतर या आंदोलनात केवळ शेतकरी व आपला भारतच केंद्रबिंदू असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी व त्यांच्या ‘मोदी मीडिया’कडून हा आरोप केला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातूनही पाठिंबा

दिल्ली येथे आंदोलन करण्याचे निश्चित झाल्यानंतर याठिकाणी दिल्लीला लागून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होण्याचे ठरले होते. तसेच इतर राज्यातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विविध संघटनातील सदस्यांनी सहभागी होण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून लोकसंघर्ष मोर्च्याचे २८० कार्यकर्ते व इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भविष्यात हे आंदोलन तीव्र केल्यानंतर राज्यातूनही शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला संपुर्ण देशातील शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.