शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी पुकारलेले ‘किसान आंदोलन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : केंद्र शासनाच्या कृषी विधेयकातील तरतुदी या शेतकरीविरोधी असून, यासाठी भारतभरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी दिल्ली येथे आंदोलन पुकारले आहे. भारतीय इतिहासातील सर्वात मोठे किसान आंदोलन असून, हे अहिंसक आंदोलन शेतकरी आपल्या एकजुटीने नक्कीच यशस्वी करून दाखवतील असा विश्वास लोकसंघर्ष मोर्च्याच्या जिल्हाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला. केंद्र शासनाच्या कृषी विधेयकाविरोधात दिल्ली येथे लाखो शेतकरी एकत्र आले आहेत. या आंदोलनाला समर्थन म्हणून प्रतिभा शिंदे या देखील २४ नोव्हेंबरपासून आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. ६ डिसेंबर रोजी त्या दिल्लीहून परत जळगावला आल्या आहेत. या ऐतिहासीक ‘किसान आंदोलना’तील त्यांचा अनुभव त्यांनी ‘लोकमत’ कडे व्यक्त केला.

मागण्यांबाबत प्रत्येक शेतकरी जागृत

किसान आंदोलनात सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना कृषी विधेयकाचा अभ्यास नसल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. मात्र, या आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवकापासून ते ज्येष्ठ नागरिकाला देखील आपल्या मागण्या व कृषी विधेयकातील शेतकरी विरोधी कायदा याबाबतची माहिती असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सर्व शेतकरी आता आपल्या न्याय व हक्कासाठी जागृत झाला असून, त्याचे हे मुर्तीमंत उदाहरण या आंदोलनात पहायला मिळत आहे.

खलिस्तानच्या घोषणा या केवळ अफवा

या आंदोलनात खलिस्तानबाबतच्या घोषणा देण्यात आल्या अशाही वावड्या पसरविल्या जात आहेत. मुस्लिमांनी आंदोलन केले तर त्यांना आंतकवादी म्हणून भाजप सरकारकडून हिनवले जाते. पुरोगाम्यांनी आंदोलन केले तर ते नक्षलवादी आता पंजाबसह संपुर्ण भारतातील शेतकरी एकत्र आला आहे. तर त्यांना खलिस्तानी चळवळ म्हणून चुकीचा प्रचार हा केला जात आहे. या आंदोलनात १५ दिवस काम केल्यानंतर या आंदोलनात केवळ शेतकरी व आपला भारतच केंद्रबिंदू असल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सत्ताधारी व त्यांच्या ‘मोदी मीडिया’कडून हा आरोप केला जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातूनही पाठिंबा

दिल्ली येथे आंदोलन करण्याचे निश्चित झाल्यानंतर याठिकाणी दिल्लीला लागून असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभागी होण्याचे ठरले होते. तसेच इतर राज्यातून शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून विविध संघटनातील सदस्यांनी सहभागी होण्याचे ठरले होते. त्यानुसार महाराष्ट्रातून लोकसंघर्ष मोर्च्याचे २८० कार्यकर्ते व इतर संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. भविष्यात हे आंदोलन तीव्र केल्यानंतर राज्यातूनही शेतकरी सहभागी होणार आहेत. या आंदोलनाला संपुर्ण देशातील शेतकऱ्यांचा पाठींबा आहे.