शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

बोगस डॉक्टरकडून औषधी घेतल्याने किडनी विकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 11:18 IST

बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेत सूर

जळगाव : बोगस डॉक्टर आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वेदनाशामक औषधी घेतल्याने किडनीला अपाय होण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच ग्रामीण भागातील बाल रोग तज्ज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केल्यास अतिशय कमी खर्चात लहान मुलांची किडनी निकामी होण्यापासून वाचवू शकते, असा सूर रविवारी बालरोग तज्ज्ञांच्या परिषदेत उमटला.बाल किडनी फाऊंडेशन मुंबई आणि जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटना यांच्यावतीने जागतिक किडनी दिवसाचे औचित्य साधून लहान मुलांच्या किडनी आजारावर एक दिवसीय परिषद रविवारी एका हॉटेलमध्ये पार पडली. यात जिल्ह्यातील १०० बालरोगतज्ज्ञांनी सहभाग नोंदवला.यात डॉ. कुमुद मेहता (वाडिया हॉस्पिटल, मुंबई), डॉ. उमा अली (लिलावती हॉस्पिटल मुंबई), डॉ. प्रीती शानबाग , डॉ. पवन देवरे (नवी मुंबई), डॉ. शिवहर सोनवणे (मुंबई ), डॉ पंकज भन्साली (औरंगाबाद) आदींनी मार्गदर्शन केले.१४ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर किडनी डे म्हणून साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून ही परिषद आयोजित केली गेली. वैद्यकीय सेवेत प्रगती करुन बाल मृत्यू कमी करण्याचा संकल्प संघटनेने केला असल्याचे जळगाव बालरोग तज्ज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ अजय शास्त्री यांनी सांगितले.चिटणीस डॉ. मंदार काळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी डॉ. शमीक सिंग, डॉ. स्वप्निल दसोरे, डॉ. अविनाश भोसले, डॉ. अविनाश खेलवाडे, डॉ. हितेंद्र भोळे, डॉ. ॅ अमित नारखेडे, डॉ. वृषाली सरोदे, डॉ. प्रीती जोशी, डॉ. सारिका सुरवाडे, डॉ. सारिका पाटील यांनी परिश्रम घेतले.यावेळी आलेल्या पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.

टॅग्स :Medicalवैद्यकीय