शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगाम शेवटपर्यंत तहानलेलाच

By ram.jadhav | Updated: September 19, 2017 23:24 IST

कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़

ठळक मुद्देपावसाअभावी पिकांची वाढ खुंटलीकिडींचाही प्रादुर्भाव वाढलाउत्पादनावर होणार परिणाम

राम जाधवआॅनलाईन लोकमत, जळगाव, दि़ १९ -शेतकºयांनी नेहमीप्रमाणेच अपेक्षा ठेवून मोठ्या आशेने खरिपाच्या हंगामाची लागवड केली़ परंतु सुरुवातीपासून पावसाने हुलकावणी दिल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात दुबार तर काही ठिकाणी तिसºयांदा पेरणी करावी लागली़ त्यामुळे कर्जबाजारी शेतकरी अजूनच आर्थिक संकटात सापडला गेला़ मात्र त्याचे सोयरसुतक कुणालाही नाही़या हंगामातील खरीप पिकांची परिस्थिती फारसी काही चांगली नाही़ त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामाचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांपेक्षा जास्त घटणार आहे, यात शंका नाही़ पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच पिके सलाईनवर जगत आलेले आहेत़ त्यामुळे यावर्षी पुन्हा एकदा बळीराजाचा ‘बळी’ जात आहे, हे निश्चित़आता परतीचा पाऊस जरी काही भागात पडत असला, तरी मध्यंतरीच्या मोठ्या खंडामुळे पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटणार आहे़ तग धरलेल्या पिकांना मात्र या पावसाचा शवेटी काहीतरी फायदा होईल़मक्याचे उत्पादन कमीचमका पिकाच्या ऐन वाढीच्या काळात व दाणे भरण्याच्या वेळी पाण्याचा ताण पडल्याने दाणे अपूर्ण भरले आहे़ त्यामुळे कणसाचा आकार लहान राहिला आहे़ तसेच खोड अळींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पन्नात घट येणार आहे़ या पिकावर मावा व कणसामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव झालेला आहे़आला तो नुकसान करून गेलागेल्या आठवड्यात नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात व जामनेर तालुक्यातील वाकोद परिसरात जवळपास सात ते आठ गावांमध्ये वादळी वाºयासह झालेल्या मुसळधार पावसाने मक्याचे उभे पीक आडवे झाले आहे़ तर याच भागातील कपाशी, ऊस या पिकांसह खरिपाच्या सर्वच पिकांचे वादळी पावसात नुकसान झाले आहे़ त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिरावला गेला व लावलेला खर्चही गेला़ अशाप्रकारे तूर, भुईमूग, तीळ, सोयाबीनसह जवळपास सर्वच पिकांची या हंगामात बिकट स्थिती आहे़उडीद व मुगाचे उत्पादन कमीचउडीद व मुगावर रसशोषक किडी, पाने खाणारी अळी व पिवळा विषाणू रोगाचा प्रादुर्भाव होता़ त्यातच शेंगा आलेल्या असताना पावसाने रिपरिप लावली, त्यामुळे आलेल्या शेंगा खराब झाल्या़ नंतर पुन्हा पावसाची गरज असताना मात्र पावसाने उघडीप दिली़ यामुळे यावर्षी उडीद व मुगाचे सरासरीपेक्षा ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पन्न घटले आहे़ त्यातच आहे, त्याही मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झालेले आहेत़काही भागात जुलैच्या पहिल्या व दुसºया आठवड्यात खरिपाची पेरणी झाली़ तर काही भागात पाऊसमान व नैसर्गिक स्थितीही चांगली नसल्याने काही शेतकºयांनी पेरणी करण्यापेक्षा जमिनी पडीत ठेवल्याचीही स्थिती जामनेर तालुक्यात आहे़हंगामाच्या सुरुवातीला लागवड केल्यानंतर पावसाची अनियमितता असल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम झाला़ मात्र मध्यंतरी आॅगस्टमध्ये रिमझिम बरसलेल्या श्रावणधारांमुळे काही भागात पिकांना जीवदान मिळाले़ पुन्हा आॅगस्टच्या शेवटी पावसाने हुलकावणी दिली़ त्यामुळे ऐन दाणे भरण्याच्या व फुले पात्या बनण्याच्या काळात पिकांना पाण्याचा झटका बसल्यामुळे उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला आहे़कपाशीवर किडींचा प्रादुर्भाव जास्तजेव्हा पावसाने उघडीप दिली, त्या काळात कपाशीवर मोठ्या प्रमाणावर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव झाला़ यामध्ये मावा, तुडतुडे, थ्रिप्स, पिठ्या ढेकूण (मिली बग), पांढरी माशी तर काही भागात गुलाबी बोंडअळीसह पाने खाणाºया अळींचाही प्रादुर्भाव आढळून आला़ यामुळे कपाशीच्या पिकावर याचा परिणाम होऊन कपाशीचे उत्पादन घटणारगिरणा परिसरात कपाशीचे पीक पाण्याअभावी करपून जात आहे़ हलक्या जमिनीवरील पीक तर अक्षरश: वायाच गेले आहे़ भारी जमिनीवरील कपाशी कशीबशी तग धरून आहे. मात्र तिच्याही उत्पन्नावर परिणाम होत आहे़ जिल्ह्यात पाऊस अनियमित व अनिश्चित आहे़ नुकत्याच केलेल्या नजर अंदाजानुसार खरीप हंगामातील सर्व पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे या हंगामात शेतकºयांचे उत्पन्न घटणार आहे़ पिकांच्या ऐन जोमाच्या काळात पावसाने उघडीप दिल्याने उत्पन्न घटण्याचा अंदाज आहे़- अनिल भोकरे, कृषी उपसंचालक, जळगाव़यावर्षी मोठ्या अपेक्षेने खर्च करून पिकांची लागवड केली होती़ मात्र निसर्गाने सर्व अपेक्षांवर पाणी फेरले़ सरतेशेवटी आलेल्या वादळी पावसाने होते नव्हते, ते सर्व पुन्हा वाया गेले़- प्रकाशचंद जैन, शेतकरी, माजी सरपंच वाकोद