शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बहर लागण्याच्या अवस्थेत खरिपातील पिके तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ ...

साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ नेमक्या याच काळातील पीकवाढीच्या अवस्थेत होतो. आषाढात सुरुवातीला तसा पाऊस झाला. यातही काही भाग कोरडा राहिला. तेथे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आषाढातील प्रथम पंधरवड्यात पाऊस झालेल्या भागात आता सर्वच पीक बहर लागण्याच्या अवस्थेत आहे.

आता एक चांगल्या पावसाची गरज असताना आषाढ उत्तरार्धात कोरडा जातोय. आकाशात ढग चांगले जमून येतात, पण त्यापाठोपाठ जोरदार वारे ढग पळवून नेत आहेत. मागील दोन-चार दिवसांपासून तर वारा बेफाम झाल्यागत वाहत आहे. यामुळे जमिनीची ओल सुकत ती भेगा धरत आहे. कडक होत आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीचे क्षेत्र अधिक आहे. या क्षेत्रावर फुलफुगडी, कैऱ्या लागत आहेत. कपाशी खालोखाल मका क्षेत्र आहे. मका तुरा काढण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी, सोयाबीन, कडधान्य आदी पिके फुलोरा ते शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. ज्वारीने पान फिरविले आहे. उशिराने पाऊस सुरू झालेल्या भागात खरीप पीकवाढीच्या अवस्थेत आहे. या सर्वच पिकात उत्पादनवाढीसाठी एक चांगला पाऊस आवश्यक आहे.

आषाढात सुरुवातीला झालेल्या पावसाने तापमान, उकाडा कमी झाला खरा; पण अधिकवेळ आभाळ आभ्राच्छादित राहत आहे. मधूनच ऊन, वारे व अंगण ओले होईल इतपतच पाऊस पडतो. यामुळे पिकांबरोबरच, गुरेढोरे, शेतकऱ्यांनादेखील हे हवामान बाधत आहे. तापमान कमी असल्याने मान्सूनपूर्व कपाशीवर अजूनतरी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव फारसा झालेला नाही, असे शेतकरी सांगत आहे.

संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रच वाऱ्यावर

यावर्षी गिरणा नदीच्या एकूणच खोऱ्यात पाऊस कमी आहे. मागील दोन वर्षे जुलैमध्येच गिरणा धरण जलसाठ्यात वाढ होते. १० टक्के भरण्याची ऑगस्ट क्रांती झाली होती. यावर्षी जलसाठ्यात तूट आहे. गिरणा धरणात फक्त ३८ टक्के जलसाठा आहे, तर गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरणात ४६ टक्के तर मोसम नदीवरील हरणबारी धरणात ७८ टक्के जलसाठा झाल्याची माहिती आहे. या धरणांच्या लाभक्षेत्रातदेखील कमी पावसाची स्थिती आहे. नेहमी गिरणा धरण ऑगस्ट महिन्यात भरते. यानुसार श्रावण महिन्यात जलरूपी अभिषेक या लाभक्षेत्रात होतो.

वाहणारे वारे एकतर पाऊस आणतील नाहीतर पाऊस पळवतील. मान्सूनपूर्व कपाशीला सिंचनासाठी सरी पाडून ठेवल्या आहेत. परंतु पाटपाण्यापेक्षा पावसाचे पाणी पिकांना अमृतसमान असते. यामुळे एक चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.

-शिवाजी माधवराव हिरे, शेतकरी, खेडगाव

वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतजमीन कोरडी होते. खरीप पिकांना ताण, शाॅक बसणार आहे. यानंतर याचा परिणाम होत पाऊस आल्यावर फुलफुगडी, पात्यागळ संभवते.

-उत्तम रामभाऊ पाटील, शेतकरी, बात्सर