शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

बहर लागण्याच्या अवस्थेत खरिपातील पिके तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST

साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ ...

साधारणपणे आषाढ महिना लागला म्हणजे डोक्यावर आभाळ आले तरी ते जमिनीवर तुटून पडत. आषाढसरीच्या रूपातून बरसत राहते. याचा लाभ नेमक्या याच काळातील पीकवाढीच्या अवस्थेत होतो. आषाढात सुरुवातीला तसा पाऊस झाला. यातही काही भाग कोरडा राहिला. तेथे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. आषाढातील प्रथम पंधरवड्यात पाऊस झालेल्या भागात आता सर्वच पीक बहर लागण्याच्या अवस्थेत आहे.

आता एक चांगल्या पावसाची गरज असताना आषाढ उत्तरार्धात कोरडा जातोय. आकाशात ढग चांगले जमून येतात, पण त्यापाठोपाठ जोरदार वारे ढग पळवून नेत आहेत. मागील दोन-चार दिवसांपासून तर वारा बेफाम झाल्यागत वाहत आहे. यामुळे जमिनीची ओल सुकत ती भेगा धरत आहे. कडक होत आहे.

यावर्षी मान्सूनपूर्व कपाशीचे क्षेत्र अधिक आहे. या क्षेत्रावर फुलफुगडी, कैऱ्या लागत आहेत. कपाशी खालोखाल मका क्षेत्र आहे. मका तुरा काढण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी, सोयाबीन, कडधान्य आदी पिके फुलोरा ते शेंगा पक्व होण्याच्या अवस्थेत आहेत. ज्वारीने पान फिरविले आहे. उशिराने पाऊस सुरू झालेल्या भागात खरीप पीकवाढीच्या अवस्थेत आहे. या सर्वच पिकात उत्पादनवाढीसाठी एक चांगला पाऊस आवश्यक आहे.

आषाढात सुरुवातीला झालेल्या पावसाने तापमान, उकाडा कमी झाला खरा; पण अधिकवेळ आभाळ आभ्राच्छादित राहत आहे. मधूनच ऊन, वारे व अंगण ओले होईल इतपतच पाऊस पडतो. यामुळे पिकांबरोबरच, गुरेढोरे, शेतकऱ्यांनादेखील हे हवामान बाधत आहे. तापमान कमी असल्याने मान्सूनपूर्व कपाशीवर अजूनतरी फुलकिड्यांचा प्रादुर्भाव फारसा झालेला नाही, असे शेतकरी सांगत आहे.

संपूर्ण गिरणा लाभक्षेत्रच वाऱ्यावर

यावर्षी गिरणा नदीच्या एकूणच खोऱ्यात पाऊस कमी आहे. मागील दोन वर्षे जुलैमध्येच गिरणा धरण जलसाठ्यात वाढ होते. १० टक्के भरण्याची ऑगस्ट क्रांती झाली होती. यावर्षी जलसाठ्यात तूट आहे. गिरणा धरणात फक्त ३८ टक्के जलसाठा आहे, तर गिरणा नदीवरील नाशिक जिल्ह्यातील चणकापूर धरणात ४६ टक्के तर मोसम नदीवरील हरणबारी धरणात ७८ टक्के जलसाठा झाल्याची माहिती आहे. या धरणांच्या लाभक्षेत्रातदेखील कमी पावसाची स्थिती आहे. नेहमी गिरणा धरण ऑगस्ट महिन्यात भरते. यानुसार श्रावण महिन्यात जलरूपी अभिषेक या लाभक्षेत्रात होतो.

वाहणारे वारे एकतर पाऊस आणतील नाहीतर पाऊस पळवतील. मान्सूनपूर्व कपाशीला सिंचनासाठी सरी पाडून ठेवल्या आहेत. परंतु पाटपाण्यापेक्षा पावसाचे पाणी पिकांना अमृतसमान असते. यामुळे एक चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.

-शिवाजी माधवराव हिरे, शेतकरी, खेडगाव

वाहणाऱ्या वाऱ्यामुळे शेतजमीन कोरडी होते. खरीप पिकांना ताण, शाॅक बसणार आहे. यानंतर याचा परिणाम होत पाऊस आल्यावर फुलफुगडी, पात्यागळ संभवते.

-उत्तम रामभाऊ पाटील, शेतकरी, बात्सर