शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

खान्देशातील गुणवंतांचा मांडळ येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2021 16:21 IST

यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश मिळविलेल्यांचा सन्मान करण्यात आला.

संजय पाटीलअमळनेर : यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत गुणवत्ता मिळवून उत्तीर्ण झालेले   अधिकारी यांचा मांडळ ग्रामस्थांकडून कर्तृत्वाचा गौरव सोहळा मांडळ येथे आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडला.यावेळी यूपीएससी परीक्षेत १८२ रँक मिळवणारे गौरव साळुंके, ४८४ रँक मिळवणाऱ्या दृष्टी जैन व एमपीएससी परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांच्यासह त्यांच्या पालकांचा सत्कार आमदार अनिल पाटील व शिंदखेडा येथील माजी आमदार रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिपप्रज्वलन करण्यात आले. तसेच गौरव साळुंके यांचा सत्कार सरपंच  विद्या पाटील व सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्ते करण्यात आला.मानसी पाटील यांचा सत्कार माजी सरपंच रंजना जितेंद्र पाटील यांच्या हस्ते झाला.ओडिशा राज्यात संबलपूरचे जिल्हाधिकारी मयूर सुर्यवंशी हेदेखील डॉ.दीपक पाटील यांचे भाचे असल्याने त्यांच्या आईवडिलांचादेखील सत्कार करण्यात आला. तसेच गावातील सर्व क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्याचा सत्कार  करण्यात आला.प्रास्ताविक डॉ. दीपक पाटील यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी मानसी पाटील म्हणाल्या की, मला शिक्षणाची प्रेरणा मांडळ येथील डॉ. सुनील चोरडिया यांच्यामुळेच मिळाली. मांडळ हे गाव कायम लोकांना सहकार्य करणारे गाव आहे. आमचे यश जरी छोटे असले तरी आमचे घाव मात्र कोणाला दिसत नाहीत.गौरव साळुंके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी सांगितले की, माझं आणि मांडळचे नाते खुप जवळचे आहे. मांडळ हे गाव माझ्या मामाचे गाव आहे. मला वाचनाचे संस्कार माझ्या आईकडून मिळाले. यश हे सहज शक्य होत नाही. त्यासाठी खुप मेहनत करावी लागते. आयएएस होणे हे खूप मोठं नाही परंतु समाजासाठी काही करायचे आहे यासाठी या परीक्षेत यावे, असे आवाहन त्यांनी केले.माजी आमदार रामकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार अनिल पाटील यांनी मार्गदर्शन केले. मेहनतीशिवाय पर्याय नाही. मी पण स्पर्धा परीक्षा दिली होती. माझेही स्वप्न लाल दिव्याच्या गाडीचे आहे, असे सांगून गौरव साळुंके यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमास पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शामराव पाटील, डॉ. वाय. आर. सुर्यवंशी, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, जि. प. सदस्य संगीता भिल, लोण येथील माजी सरपंच अंकिता पाटील, माजी सरपंच नारायण कोळी, माजी सरपंच डॉ. अशोक पाटील, माजी सरपंच विनायक बडगुजर, रामदास जीवन कोळी, बाळासाहेब पवार, वसंत पाटील, नाना धनगर, जितेंद्र पाटील यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायत सदस्य, वि. का. सोसायटी चेअरमन, मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन किरण बडगुजर  व गंगासागर वानखेडे  यांनी केले.