शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
2
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
3
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
4
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
5
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
6
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
7
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
8
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
9
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
10
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
11
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
12
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
13
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
14
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
15
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
16
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
17
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
18
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
19
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
20
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका

दोन एकर मक्याच्या शेतात चारल्या काठेवाडीच्या गायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:21 IST

आडगाव, ता. चाळीसगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटत आले, तरी दमदार पाऊस नसल्याने याशिवाय विहिरींनीही तळ ...

आडगाव, ता. चाळीसगाव : पावसाळा सुरू होऊन अडीच महिने उलटत आले, तरी दमदार पाऊस नसल्याने याशिवाय विहिरींनीही तळ गाठला आहे. दोन महिन्यांचे पीक होत आल्याने त्यांची वाढ खुंटून कधी नुकसान होईल व कधी कणसे लागतील, याची शाश्वती नसल्याने हताश झालेल्या देवळी येथील प्रकाश जगन्नाथ पाटील या शेतकऱ्याने चक्क आपल्या दोन एकरवरील मक्याच्या शेतात काठेवाडीच्या गायी चारल्या. रोज पिकाकडे पाहूनच काळीज जाळण्यापेक्षा शेतकऱ्याने मोठ्या जड अंत:करणाने आपल्या शेतावर गायी चारल्या.

मन्याड परिसरातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशीबरोबर मक्याचीही मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. ठिबक असलेल्या क्षेत्रावर कपाशी लावली व कोरडवाहू क्षेत्रावर सरी पाडून मका लावला. सुरुवातीला पावसाने जोरदार सलामी दिल्याने पुढेदेखील निसर्गाची चांगली मेहेरबानी राहील म्हणून अनेक शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीचा हंगाम आटोपताच सऱ्या पाडलेल्या जागी मक्याची लागवड केली.

आता लागवड होऊन दोन महिने झाले तरी सदर पिकांवर कधीकधी तुरळक पाऊस आल्याने हे पीक कमी पावसामुळे मोडसावले. त्याची वाढ खुंटून आता कितीही पाऊस आला तरी फक्त चाराच हाती येईल, उत्पन्न काही येणार नाही म्हणून या शेतक-याने हताश मन करून आपल्या दोन एकर मक्याच्या उभ्या पिकावर गायी चारल्या.

मका लागवडीसाठी शेतक-याला आलेला खर्च

दोन एकर नांगरणी खर्च. - - - ३००० हजार रुपये.

दोन एकर रोटाव्हेटर खर्च - - - २००० हजार रुपये.

बियाणे - - - ४००० हजार रुपये.

रासायनिक खत - - - ४४०० रुपये.

निंदणी, कोळपणी - - - २५०० रुपये.

अळींसाठी कीटकनाशक - - - २००० हजार रुपये.

एकूण खर्च - १७ हजार ९०० रुपये एवढा खर्च आला

असून उत्पन्न मात्र शून्य आल्याने अशीच परिस्थिती बहुतेक शेतकऱ्यांवर ओढवल्याचे चित्र बहुतेक ठिकाणी बघावयास मिळत आहे. शासनाने सदर

शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी व विमा कंपन्यांनीदेखील या शेतकऱ्यांना पीक नुकसानीचा अंदाज घेत पीकविमा जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.