शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कापूर दीडपटीने महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:11 IST

‘जीएसटी’चा परिणाम : अगरबत्तीला कर लागू, दर ‘जैसे थे’

ठळक मुद्देअगोदर मूळ किंमतीत वाढ 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कल

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल 

जळगाव, दि. 13 -  वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दीडपटीने वाढले आहे. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली. पूर्वी 400 ते 450 रुपये प्रति किलो असणा:या कापूरचे भाव 100 रुपये प्रति किलोने वाढून त्याचे भाव 500 ते 550 रुपये किलोवर पोहचले. चार महिन्यात सात टन कापूरचा वापरकापूराचा वर्षभर वापर केला जात असतो.  त्यात सध्या व्रतवैकल्यांचा श्रावण मास सुरू असून याच महिन्यापासून चार महिने कापराचा सर्वाधिक वापर केला जात असतो.   एकटय़ा जळगाव जिलत श्रावणाचे दिवस ते दिवाळी अशा चार महिन्याच्या कालावधीत तब्बल सात टन कापूरचा वापरला जात        असल्याचे काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता समजले. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात आवकजळगावच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्री साठी पाठविला जात असतो.  पूर्वी जळगावातील व्यापारी ललित बरडिया हे कापूरची निर्मिती करीत असत, मात्र याची मजुरी वाढल्यामुळे हे उत्पादन बंद करण्यात आल्याचे बरडिया यांनी सांगितले. त्यापेक्षा आता तयार माल येत असल्याने त्याचाच व्यापार केला जातो, असेही ते म्हणाले. शहरातील काही घाऊन व्यापा:यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच           500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहे. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.

जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कलकापूरवर जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापा:यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते, ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते. अगरबत्तीचे भाव स्थिरपूजेसाठी आवश्यक असलेल्या अगरबत्तीवरदेखील 5 टक्के जीएसची  आहे. याचा उलट उत्पादकांना फायदा झाल्याचेही चित्र आहे. कारण पूर्वी अगरबत्तीसाठी आवश्यक रसायनासाठी उत्पादन शुल्क व इतर कर मिळून 18 ते 28 टक्के कर होता.आता जीएसटी केवळ 5 टक्के असल्याने कर कमी झाल्याचा फायदा आहे. जीएसटी लागला तरी अगरबत्तीच्या भावात वाढ झालेली नाही. पूर्वी कापूरवर कर लागत नव्हता. आता 18 टक्के जीएसटी लागत आहे. त्यात मूळ किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कापूरचे भाव जवळपास दीडपटीने वाढले आहेत. श्रावण मास ते दिवाळीर्पयत चार महिन्यात जळगाव जिल्ह्यात 7 टन कापूर वापरला जातो.-ललित बरडिया, कापूर व्यापारी तथा माजी अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन