शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
2
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
3
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
4
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
5
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
6
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
7
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
8
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
9
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
10
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
11
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
12
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
13
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
14
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
15
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
16
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
17
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
18
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
19
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
20
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं

कापूर दीडपटीने महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:11 IST

‘जीएसटी’चा परिणाम : अगरबत्तीला कर लागू, दर ‘जैसे थे’

ठळक मुद्देअगोदर मूळ किंमतीत वाढ 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कल

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल 

जळगाव, दि. 13 -  वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दीडपटीने वाढले आहे. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली. पूर्वी 400 ते 450 रुपये प्रति किलो असणा:या कापूरचे भाव 100 रुपये प्रति किलोने वाढून त्याचे भाव 500 ते 550 रुपये किलोवर पोहचले. चार महिन्यात सात टन कापूरचा वापरकापूराचा वर्षभर वापर केला जात असतो.  त्यात सध्या व्रतवैकल्यांचा श्रावण मास सुरू असून याच महिन्यापासून चार महिने कापराचा सर्वाधिक वापर केला जात असतो.   एकटय़ा जळगाव जिलत श्रावणाचे दिवस ते दिवाळी अशा चार महिन्याच्या कालावधीत तब्बल सात टन कापूरचा वापरला जात        असल्याचे काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता समजले. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात आवकजळगावच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्री साठी पाठविला जात असतो.  पूर्वी जळगावातील व्यापारी ललित बरडिया हे कापूरची निर्मिती करीत असत, मात्र याची मजुरी वाढल्यामुळे हे उत्पादन बंद करण्यात आल्याचे बरडिया यांनी सांगितले. त्यापेक्षा आता तयार माल येत असल्याने त्याचाच व्यापार केला जातो, असेही ते म्हणाले. शहरातील काही घाऊन व्यापा:यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच           500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहे. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.

जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कलकापूरवर जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापा:यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते, ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते. अगरबत्तीचे भाव स्थिरपूजेसाठी आवश्यक असलेल्या अगरबत्तीवरदेखील 5 टक्के जीएसची  आहे. याचा उलट उत्पादकांना फायदा झाल्याचेही चित्र आहे. कारण पूर्वी अगरबत्तीसाठी आवश्यक रसायनासाठी उत्पादन शुल्क व इतर कर मिळून 18 ते 28 टक्के कर होता.आता जीएसटी केवळ 5 टक्के असल्याने कर कमी झाल्याचा फायदा आहे. जीएसटी लागला तरी अगरबत्तीच्या भावात वाढ झालेली नाही. पूर्वी कापूरवर कर लागत नव्हता. आता 18 टक्के जीएसटी लागत आहे. त्यात मूळ किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कापूरचे भाव जवळपास दीडपटीने वाढले आहेत. श्रावण मास ते दिवाळीर्पयत चार महिन्यात जळगाव जिल्ह्यात 7 टन कापूर वापरला जातो.-ललित बरडिया, कापूर व्यापारी तथा माजी अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन