शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

कापूर दीडपटीने महागले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 12:11 IST

‘जीएसटी’चा परिणाम : अगरबत्तीला कर लागू, दर ‘जैसे थे’

ठळक मुद्देअगोदर मूळ किंमतीत वाढ 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कल

ऑनलाईन लोकमत / विजयकुमार सैतवाल 

जळगाव, दि. 13 -  वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंचे भाव वधारले असताना यातून पूजेचे साहित्यही सुटलेले नाही. जास्त वापर नसला तरी दररोज घरोघरी व मंदिरात सकाळ-संध्याकाळ देवापुढे ज्योत लावली जाते त्या कापूरचे भाव थेट दीडपटीने वाढले आहे. अगोदर मूळ किंमतीत वाढ जीएसटी लागू होण्यापूर्वीच कापूरच्या मूळ किंमतीत भाववाढ झाली. पूर्वी 400 ते 450 रुपये प्रति किलो असणा:या कापूरचे भाव 100 रुपये प्रति किलोने वाढून त्याचे भाव 500 ते 550 रुपये किलोवर पोहचले. चार महिन्यात सात टन कापूरचा वापरकापूराचा वर्षभर वापर केला जात असतो.  त्यात सध्या व्रतवैकल्यांचा श्रावण मास सुरू असून याच महिन्यापासून चार महिने कापराचा सर्वाधिक वापर केला जात असतो.   एकटय़ा जळगाव जिलत श्रावणाचे दिवस ते दिवाळी अशा चार महिन्याच्या कालावधीत तब्बल सात टन कापूरचा वापरला जात        असल्याचे काही विक्रेत्यांशी संपर्क साधला असता समजले. परराज्यातून मोठय़ा प्रमाणात आवकजळगावच्या बाजारपेठेत मुंबई, नागपूर यासह चेन्नई, उज्जैन, अहमदाबाद येथून मोठय़ा प्रमाणात कापूर येतो. येथून तो विविध तालुक्यांच्या ठिकाणी विक्री साठी पाठविला जात असतो.  पूर्वी जळगावातील व्यापारी ललित बरडिया हे कापूरची निर्मिती करीत असत, मात्र याची मजुरी वाढल्यामुळे हे उत्पादन बंद करण्यात आल्याचे बरडिया यांनी सांगितले. त्यापेक्षा आता तयार माल येत असल्याने त्याचाच व्यापार केला जातो, असेही ते म्हणाले. शहरातील काही घाऊन व्यापा:यांकडून हा कापूर तालुक्यांच्या ठिकाणी विक्रीसाठी जात असतो. 18 टक्के थेट जीएसटीजीएसटी लागू होण्यापूर्वी कापूरवर कर नव्हता. मात्र 1 जुलैपासून त्यावर थेट 18 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. त्यामुळे आधीच           500 ते 550 रुपये किलोवर पोहचलेल्या कापूरचे भाव आता 600 ते 625 रुपये प्रति किलो झाले आहे. एकूणच पूर्वीच्या भावामध्ये थेट दीडपट वाढ झाली आहे.

जीएसटी टाळण्यासाठी अनोखी शक्कलकापूरवर जीएसटी लावण्यात आल्याने भेसळयुक्त कापूरची निर्मितीही होऊ लागली आहे. त्यामुळे त्याची कमी दरात विक्री होत असल्याचे व्यापा:यांचे म्हणणे आहे. जो अस्सल कापूर असतो, तो पूर्ण जळतो, मात्र भेसळयुक्त कापूर जळाल्यानंतर शेवटी राख शिल्लक राहते, ही भेसळयुक्त कापूरची ओळख असल्याचे सांगितले जाते. अगरबत्तीचे भाव स्थिरपूजेसाठी आवश्यक असलेल्या अगरबत्तीवरदेखील 5 टक्के जीएसची  आहे. याचा उलट उत्पादकांना फायदा झाल्याचेही चित्र आहे. कारण पूर्वी अगरबत्तीसाठी आवश्यक रसायनासाठी उत्पादन शुल्क व इतर कर मिळून 18 ते 28 टक्के कर होता.आता जीएसटी केवळ 5 टक्के असल्याने कर कमी झाल्याचा फायदा आहे. जीएसटी लागला तरी अगरबत्तीच्या भावात वाढ झालेली नाही. पूर्वी कापूरवर कर लागत नव्हता. आता 18 टक्के जीएसटी लागत आहे. त्यात मूळ किंमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे कापूरचे भाव जवळपास दीडपटीने वाढले आहेत. श्रावण मास ते दिवाळीर्पयत चार महिन्यात जळगाव जिल्ह्यात 7 टन कापूर वापरला जातो.-ललित बरडिया, कापूर व्यापारी तथा माजी अध्यक्ष, एकता रिटेल किराणा असोसिएशन