शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

कापसाला 4200 ते 4400 भाव

By admin | Updated: October 13, 2015 23:10 IST

कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

नंदुरबार : कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदी केंद्रात परवानाधारक व्यापा:यांनी कापूस खरेदीस सुरुवात केली.

कापसाचा लिलाव होण्याआधी बैलगाडय़ा, टेम्पो, मिनीट्रक, माल वाहतूक करणारी रिक्षा अशा एकूण सात वाहनांद्वारे कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर बाजार समितीने नियुक्त केलेल्या परवानाधारक व्यापा:यांनी संपूर्ण कापसाची लिलावाद्वारे खरेदी केली. नंदुरबारसह वरूळ, पळाशी, धमडाई गावासह परिसरातील शेतक:यांनी आज पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणला होता.

याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य अशासकीय प्रशासक व्यंकटराव भगा पाटील यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपमुख्य प्रशासक हरिभाई पाटील, सचिव योगेश अमृतकर, जूनमोहिदा येथील सरपंच नरेंद्र पाटील, खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल यांच्यासह शेतकरी, तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

पहिला मान

दरम्यान, बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खरेदीचा मान नंदुरबार येथील शरद तांबोळी या शेतक:याला मिळाला. या शेतक:याच्या कापसाला 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे भाव मिळाला.

बाजार समितीच्या या यार्डालगत व परिसरात अर्धा डझन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. शेतक:यांकडील माल परवानाधारक खरेदीदाराने खरेदी केल्यानंतर जवळील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीत लागलीच प्रक्रिया करून त्याच्या गठाणी तयार केल्या जातात. कापसाच्या मोजणीपासून तर गठाणी तयार करणे, तसेच वाहनचालक, मजूर अशा जवळपास तीनशेवर नागरिकांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आहे.

गेल्या वर्षी बाजार समितीच्या यार्डात भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयआयमार्फत एक लाख 90 हजार क्विंटल, तर बाजार समिती नियुक्त खरेदीदारांनी 22 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. तथापि, यंदा तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर आलेला पाऊसही कापूस पिकासाठी नुकसानदायक ठरला आहे. परिणामी यंदा बाजार समिती यार्डात विक्रीसाठी किती माल येतो हे लवकरच समजेल. गतवर्षी सीसीआयने कापसाला चार हजार ते 4100 रुपये प्रती क्विंटलर्पयत भाव दिला होता. परंतु बाजार समिती नियुक्त खरेदीदारांकडून आजच्या स्थितीत 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदी दस:यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

घुली-पळाशी येथे बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी सात वर्षापूर्वी पावणेतीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. पाच एकर क्षेत्रातील यार्डात काँक्रिटीकरणाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. कापसाला काडीकचरा लागू नये, काही नुकसान होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.

- योगेश अमृतकर,

सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार