शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

कापसाला 4200 ते 4400 भाव

By admin | Updated: October 13, 2015 23:10 IST

कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

नंदुरबार : कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदी केंद्रात परवानाधारक व्यापा:यांनी कापूस खरेदीस सुरुवात केली.

कापसाचा लिलाव होण्याआधी बैलगाडय़ा, टेम्पो, मिनीट्रक, माल वाहतूक करणारी रिक्षा अशा एकूण सात वाहनांद्वारे कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर बाजार समितीने नियुक्त केलेल्या परवानाधारक व्यापा:यांनी संपूर्ण कापसाची लिलावाद्वारे खरेदी केली. नंदुरबारसह वरूळ, पळाशी, धमडाई गावासह परिसरातील शेतक:यांनी आज पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणला होता.

याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य अशासकीय प्रशासक व्यंकटराव भगा पाटील यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपमुख्य प्रशासक हरिभाई पाटील, सचिव योगेश अमृतकर, जूनमोहिदा येथील सरपंच नरेंद्र पाटील, खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल यांच्यासह शेतकरी, तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

पहिला मान

दरम्यान, बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खरेदीचा मान नंदुरबार येथील शरद तांबोळी या शेतक:याला मिळाला. या शेतक:याच्या कापसाला 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे भाव मिळाला.

बाजार समितीच्या या यार्डालगत व परिसरात अर्धा डझन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. शेतक:यांकडील माल परवानाधारक खरेदीदाराने खरेदी केल्यानंतर जवळील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीत लागलीच प्रक्रिया करून त्याच्या गठाणी तयार केल्या जातात. कापसाच्या मोजणीपासून तर गठाणी तयार करणे, तसेच वाहनचालक, मजूर अशा जवळपास तीनशेवर नागरिकांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आहे.

गेल्या वर्षी बाजार समितीच्या यार्डात भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयआयमार्फत एक लाख 90 हजार क्विंटल, तर बाजार समिती नियुक्त खरेदीदारांनी 22 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. तथापि, यंदा तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर आलेला पाऊसही कापूस पिकासाठी नुकसानदायक ठरला आहे. परिणामी यंदा बाजार समिती यार्डात विक्रीसाठी किती माल येतो हे लवकरच समजेल. गतवर्षी सीसीआयने कापसाला चार हजार ते 4100 रुपये प्रती क्विंटलर्पयत भाव दिला होता. परंतु बाजार समिती नियुक्त खरेदीदारांकडून आजच्या स्थितीत 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदी दस:यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

घुली-पळाशी येथे बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी सात वर्षापूर्वी पावणेतीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. पाच एकर क्षेत्रातील यार्डात काँक्रिटीकरणाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. कापसाला काडीकचरा लागू नये, काही नुकसान होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.

- योगेश अमृतकर,

सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार