शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाला 4200 ते 4400 भाव

By admin | Updated: October 13, 2015 23:10 IST

कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

नंदुरबार : कापसाचा हंगाम सुरू झाल्यानंतर घटस्थापनेच्या मुहूर्तावर कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. पहिल्या दिवशी विविध सात वाहनांद्वारे सुमारे 100 क्विंटल कापसाची आवक झाली. यात 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे शेतक:याला भाव मिळाला.

कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत घुली-पळाशी शिवारात कापूस खरेदी केंद्रात परवानाधारक व्यापा:यांनी कापूस खरेदीस सुरुवात केली.

कापसाचा लिलाव होण्याआधी बैलगाडय़ा, टेम्पो, मिनीट्रक, माल वाहतूक करणारी रिक्षा अशा एकूण सात वाहनांद्वारे कापूस विक्रीसाठी शेतक:यांनी आणला होता. वाहनांची नोंदणी झाल्यानंतर बाजार समितीने नियुक्त केलेल्या परवानाधारक व्यापा:यांनी संपूर्ण कापसाची लिलावाद्वारे खरेदी केली. नंदुरबारसह वरूळ, पळाशी, धमडाई गावासह परिसरातील शेतक:यांनी आज पहिल्या दिवशी कापूस विक्रीसाठी आणला होता.

याआधी कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य अशासकीय प्रशासक व्यंकटराव भगा पाटील यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी उपमुख्य प्रशासक हरिभाई पाटील, सचिव योगेश अमृतकर, जूनमोहिदा येथील सरपंच नरेंद्र पाटील, खरेदीदार अशोक चौधरी, प्रकाश अग्रवाल, शिरीष अग्रवाल यांच्यासह शेतकरी, तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

पहिला मान

दरम्यान, बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्या खरेदीचा मान नंदुरबार येथील शरद तांबोळी या शेतक:याला मिळाला. या शेतक:याच्या कापसाला 4400 रुपये प्रती क्विंटलप्रमाणे भाव मिळाला.

बाजार समितीच्या या यार्डालगत व परिसरात अर्धा डझन जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी आहेत. शेतक:यांकडील माल परवानाधारक खरेदीदाराने खरेदी केल्यानंतर जवळील जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरीत लागलीच प्रक्रिया करून त्याच्या गठाणी तयार केल्या जातात. कापसाच्या मोजणीपासून तर गठाणी तयार करणे, तसेच वाहनचालक, मजूर अशा जवळपास तीनशेवर नागरिकांना यानिमित्ताने रोजगार मिळाला आहे.

गेल्या वर्षी बाजार समितीच्या यार्डात भारतीय कपास निगम अर्थात सीसीआयआयमार्फत एक लाख 90 हजार क्विंटल, तर बाजार समिती नियुक्त खरेदीदारांनी 22 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली होती. तथापि, यंदा तब्बल 40 दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर आलेला पाऊसही कापूस पिकासाठी नुकसानदायक ठरला आहे. परिणामी यंदा बाजार समिती यार्डात विक्रीसाठी किती माल येतो हे लवकरच समजेल. गतवर्षी सीसीआयने कापसाला चार हजार ते 4100 रुपये प्रती क्विंटलर्पयत भाव दिला होता. परंतु बाजार समिती नियुक्त खरेदीदारांकडून आजच्या स्थितीत 4200 ते 4400 रुपये प्रती क्विंटलने भाव मिळत आहे. सीसीआयची कापूस खरेदी दस:यानंतर सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

घुली-पळाशी येथे बाजार समितीच्या यार्डात कापूस आल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेसाठी सात वर्षापूर्वी पावणेतीन कोटी रुपये खर्च करून अद्ययावतीकरण करण्यात आले आहे. पाच एकर क्षेत्रातील यार्डात काँक्रिटीकरणाचा प्लॅटफॉर्म उभारण्यात आला आहे. कापसाला काडीकचरा लागू नये, काही नुकसान होऊ नये यासाठी पुरेपूर दक्षता घेण्यात आली आहे.

- योगेश अमृतकर,

सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नंदुरबार