शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
5
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
6
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
7
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
8
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
9
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
10
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
11
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
12
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
13
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
14
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
15
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
16
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
17
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
18
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
19
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
20
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा

कानबाईचे आज आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क प्रसाद धर्माधिकारी नशिराबाद : खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १५ ऑगस्ट रविवारी साजरा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

प्रसाद धर्माधिकारी

नशिराबाद : खान्देशवासीयांचे कुलआराध्य दैवत असलेला ‘कानबाई उत्सव’ अर्थात ‘रोट’ १५ ऑगस्ट रविवारी साजरा होत आहे. नागपंचमीनंतर येणाऱ्या पहिल्या रविवारीच हा उत्सव साजरा होत आहे. बाहेरगावी असलेले भाऊबंद या व्रताला एकत्र येतात व हा उत्सव साजरा करतात. म्हणून या उत्सवाला ‘भावबंधनाचा महिमा’ वर्णन करणारा एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव असेही संबोधले जाते. कानबाई आणि रोट हे कौटुंबिक सामाजिक एकतेचे प्रतीक आहे.

खान्देशात कानबाई उत्सवाला अनन्य महत्त्व आहे. कानबाई ही श्रीफळ म्हणून मानल्या जाणाऱ्या नारळाच्या रूपाने घरोघरी स्थापना केली जाते. कुलपरंपरेनुसार घरपरत्वे उत्सव साजरा केला जातो. कुलाचाराप्रमाणे सकाळी आदित्य उगतभानु (सूर्यनारायण), सायंकाळी कानबाई रोट साजरे करतात.

रोटासाठी आदल्या दिवशीच गहू कुलाचाराप्रमाणे मोजून दळून घेतले जाते. या कणकेला, गव्हाच्या पिठास रोट असे म्हणतात. ईष्टदेवतांसह घरातील कुटुंबीय सदस्यांची संख्या अशी प्रत्येकाचे पाचमूठ गहू दळणासाठी घेतात. कुलाचाराप्रमाणे प्रत्येक ठिकाणी पद्धत निरनिराळी आहे. ही रोटाची कणीक देवीच्या कुळधर्मापूर्वी अर्थात् पौर्णिमेच्या आत संपवायची असते अशी प्रथा आहे.

कानबाईचे रोट करताना सव्वाशेर, अडीच शेर, सव्वा पायली या हिशेबाने गहू घेतले जातात. काही ठिकाणी गोठ्यातील पशुधनाच्या नावाने पाच-पाच मुठींचा वरताळा घेण्यात येतो. काही ठिकाणी सूर्योदयापूर्वी सर्व स्वयंपाक तयार करतात. उगवत्या सूर्याचे पूजन करून खीर-पुरीचे जेवण सारे घेतात

कानबाईना रोट या उत्सवासाठी कुठली तारीख किंवा तिथी ठरवलेली नसते. नागपंचमीनंतर येणारा पहिला रविवार हा कानबाईच्या रोटचा दिवस असतो. शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस हा सण साजरा करण्यात येतो. शनिवारी कानबाईचा रोट खऱ्या अर्थाने सुरू होतो. पहिल्या दिवशी ३ पिढ्यांचे कुटुंब एकत्र येते, सोबत गहू दळले जातात. रविवारी कानबाईची विधिवत स्थापना करतात

अशी होते स्थापना

केळीचा खांबाने मखर सुशोभित करून चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा (नाणे) टाकून व सजवून त्यावर पारंपरिक नारळ ठेवून देवीचा शृंगार केला जातो. अलंकारांनी सजवून देवीला प्रिय असलेली फुले अर्पण करतात. दुपारी विधिवत स्थापना करून सायंकाळी महानैवेद्य अर्पण करतात. रोट (पोळी), गंगाफळाची भाजी विनातिखटाची, खीर, असा नैवेद्य कानबाई अर्पण केला जातो. साखर फुटाणे, लाह्या, काकडीच्या प्रसादाला महत्त्व आहे. महाआरती करून सायंकाळी भाऊबंद एकत्र प्रसाद ग्रहण करतात. रात्री झिम्मा, फुगड्या, जागरण, गीतभजनाचे कार्यक्रम होतात.

सोमवारी विसर्जन

स्थापन पूजन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी नदीपर्यंत मिरवणुका काढून कानबाईचे विसर्जन केले जाईल.