शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कानळदा रस्त्याचे काम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर ...

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गायब झाली. डिसेंबरमध्ये थंडीची लाट काही दिवस कायम राहिली, मात्र त्यानंतर नवीन वर्षात थंडी पुन्हा गायब झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत कायम होते.

कानळदा रस्त्याचे काम जोरात

जळगाव : शहरातून जाणाऱ्या कानळदा रस्त्याच्या नवीन कामाला वेग आला असून, अनेक वर्षांपासून खराब झालेल्या केसी पार्क परिसरातील रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. हा रस्ता जळगाव तालुक्यातील १७ गावांना जोडणारा रस्ता आहे. काही वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. चोपडा ते जळगावपर्यंतच्या रस्त्यांचे हे काम होत असून, जळगाव ते किनोदपर्यंतच्या रस्त्याचे काम आतापर्यंत झाले आहे.

४६ कोटींच्या रस्त्यांसाठी मार्च उजाळणार

जळगाव : शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपा फंडातून ४६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच महासभेनेदेखील या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरी देऊन आता तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही मनपाकडून अद्यापही निविदाप्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, अमृतचे काम संपल्यानंतर रस्त्यांचे कामे घेण्यात येऊ नये, असे काही नगरसेवकांचे मत आहे. तसेच प्रशासनदेखील अमृतनंतरच कामाला सुरुवात करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसाठी मार्च महिना उजळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वॉटरग्रेसबाबत विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याप्रकरणी मनपाकडून तपास सुरू आहे. युनियन बँकेने आपल्याकडे करारनामा नसल्याचा खुलासा मनपाकडे सादर केला होता. तसेच दुसऱ्या खुलास्यात सफाईच्या ठेक्याच्या खात्याचे सर्व अधिकार सुनील झंवर यांच्याकडे असल्याची माहिती बँकेने दिली होती. याबाबत मनपाने विधी तज्ज्ञांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र, आठवडा होऊन विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.

सुप्रीम कॉलनीत पाण्याची समस्या

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी व लागून असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून या भागात पाणी येत नसून, जे पाणी येते तेदेखील कमी दाबाने येत असल्याने या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या भागात नेहमीचीच समस्या कायम आहे. अनेकवेळा मनपा प्रशासनाकडे व महापौरांकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. भर हिवाळ्यात ही समस्या असल्याने उन्हाळ्यात तर समस्या बिकट होईल अशी व्यथा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.