शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कानळदा रस्त्याचे काम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर ...

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गायब झाली. डिसेंबरमध्ये थंडीची लाट काही दिवस कायम राहिली, मात्र त्यानंतर नवीन वर्षात थंडी पुन्हा गायब झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत कायम होते.

कानळदा रस्त्याचे काम जोरात

जळगाव : शहरातून जाणाऱ्या कानळदा रस्त्याच्या नवीन कामाला वेग आला असून, अनेक वर्षांपासून खराब झालेल्या केसी पार्क परिसरातील रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. हा रस्ता जळगाव तालुक्यातील १७ गावांना जोडणारा रस्ता आहे. काही वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. चोपडा ते जळगावपर्यंतच्या रस्त्यांचे हे काम होत असून, जळगाव ते किनोदपर्यंतच्या रस्त्याचे काम आतापर्यंत झाले आहे.

४६ कोटींच्या रस्त्यांसाठी मार्च उजाळणार

जळगाव : शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपा फंडातून ४६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच महासभेनेदेखील या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरी देऊन आता तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही मनपाकडून अद्यापही निविदाप्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, अमृतचे काम संपल्यानंतर रस्त्यांचे कामे घेण्यात येऊ नये, असे काही नगरसेवकांचे मत आहे. तसेच प्रशासनदेखील अमृतनंतरच कामाला सुरुवात करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसाठी मार्च महिना उजळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वॉटरग्रेसबाबत विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याप्रकरणी मनपाकडून तपास सुरू आहे. युनियन बँकेने आपल्याकडे करारनामा नसल्याचा खुलासा मनपाकडे सादर केला होता. तसेच दुसऱ्या खुलास्यात सफाईच्या ठेक्याच्या खात्याचे सर्व अधिकार सुनील झंवर यांच्याकडे असल्याची माहिती बँकेने दिली होती. याबाबत मनपाने विधी तज्ज्ञांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र, आठवडा होऊन विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.

सुप्रीम कॉलनीत पाण्याची समस्या

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी व लागून असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून या भागात पाणी येत नसून, जे पाणी येते तेदेखील कमी दाबाने येत असल्याने या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या भागात नेहमीचीच समस्या कायम आहे. अनेकवेळा मनपा प्रशासनाकडे व महापौरांकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. भर हिवाळ्यात ही समस्या असल्याने उन्हाळ्यात तर समस्या बिकट होईल अशी व्यथा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.