शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

कानळदा रस्त्याचे काम जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:14 IST

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर ...

जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गायब झाली. डिसेंबरमध्ये थंडीची लाट काही दिवस कायम राहिली, मात्र त्यानंतर नवीन वर्षात थंडी पुन्हा गायब झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत कायम होते.

कानळदा रस्त्याचे काम जोरात

जळगाव : शहरातून जाणाऱ्या कानळदा रस्त्याच्या नवीन कामाला वेग आला असून, अनेक वर्षांपासून खराब झालेल्या केसी पार्क परिसरातील रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. हा रस्ता जळगाव तालुक्यातील १७ गावांना जोडणारा रस्ता आहे. काही वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. चोपडा ते जळगावपर्यंतच्या रस्त्यांचे हे काम होत असून, जळगाव ते किनोदपर्यंतच्या रस्त्याचे काम आतापर्यंत झाले आहे.

४६ कोटींच्या रस्त्यांसाठी मार्च उजाळणार

जळगाव : शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपा फंडातून ४६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच महासभेनेदेखील या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरी देऊन आता तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही मनपाकडून अद्यापही निविदाप्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, अमृतचे काम संपल्यानंतर रस्त्यांचे कामे घेण्यात येऊ नये, असे काही नगरसेवकांचे मत आहे. तसेच प्रशासनदेखील अमृतनंतरच कामाला सुरुवात करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसाठी मार्च महिना उजळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

वॉटरग्रेसबाबत विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा

जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याप्रकरणी मनपाकडून तपास सुरू आहे. युनियन बँकेने आपल्याकडे करारनामा नसल्याचा खुलासा मनपाकडे सादर केला होता. तसेच दुसऱ्या खुलास्यात सफाईच्या ठेक्याच्या खात्याचे सर्व अधिकार सुनील झंवर यांच्याकडे असल्याची माहिती बँकेने दिली होती. याबाबत मनपाने विधी तज्ज्ञांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र, आठवडा होऊन विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.

सुप्रीम कॉलनीत पाण्याची समस्या

जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी व लागून असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून या भागात पाणी येत नसून, जे पाणी येते तेदेखील कमी दाबाने येत असल्याने या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या भागात नेहमीचीच समस्या कायम आहे. अनेकवेळा मनपा प्रशासनाकडे व महापौरांकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. भर हिवाळ्यात ही समस्या असल्याने उन्हाळ्यात तर समस्या बिकट होईल अशी व्यथा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.