शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कामतवाडी गाव कागदोपत्री अमळनेरात

By admin | Updated: May 30, 2017 13:35 IST

अमळनेर : राज्यपालांनी अहवाल मागितला

 ऑनलाईन लोकमत/ संजय पाटील

अमळनेर, दि.30 - भौगोलिकदृटय़ा   धरणगाव तालुक्याच्या हद्दीत असलेले मात्र शासनाच्या दप्तरी अमळनेर तालुक्यात असलेल्या कामतवाडी गावाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी 17  वर्षांपासून अडचणी सहन कराव्या लागत आहे. हे गाव धरणगाव मध्ये समविष्ट करण्यासाठी गावाने राज्यपालांकडे केलेल्या मागणीची दखल घेऊन जिल्हाधिका:यांकडे अहवाल मागवण्यात आला आहे
26 जून 1999 ला धरणगाव तालुक्याची निर्मिती झाली. तेव्हा अमळनेर तालुक्याची काही गावे धरणगाव तालुक्याला जोडण्यात आली होती. त्यात कामतवाडी या गावाचाही समावेश होता. सुमारे एक  वर्ष धरणगाव तालुक्यात राहिल्यानंतर गावाच्या मागणीनुसार राजकीय दबावात हे गाव पुन्हा 16 ऑक्टोबर 2000 मध्ये अमळनेर तालुक्यात आले.  मात्र त्यावेळी नांदेड, नारणे ही गावे धरणगाव तालुक्यातच राहिली. परिणामी कामतवाडीचे चहू बाजूचे शिवार धरणगाव तालुक्यात आहे. म्हणजे गावचे क्षेत्र धरणगावात मात्र गाव अमळनेर तालुक्यात अशी स्थिती झाली. कदाचित हे महाराष्ट्रातील एकमेव गाव असावे.  अमळनेर पासून 35 किलामीटरवर हे गाव आहे.तर धरणगावपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. दळणवळण, शैक्षणिक ,बाजारपेठसाठी त्यांना धरणगाव सोयीस्कर आहे. बँक देखील धरणगावची जवळ ,शेती धरणगाव हद्दीत आणि पशु वैद्यकीय दवाखाना ही नांदेड चा फक्त चार  किलोमीटर आहे. गावाची  गैरसोय दूर करण्यासाठी सरपंच अल्काबाई भगवान पाटील यांनी 15 ऑगस्ट 2016 रोजी ग्रामसभेत कामतवाडी   गावाचा समावेश पुन्हा धरणगाव तालुक्यात  करण्यासाठी ठराव करून राज्यपालांकडे व मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली होती. राज्यपालचे कक्ष अधिकारी नि.ग.सोनखासकर यांनी दखल घेऊन जिल्हाधिका:यांना अहवाल पाठविण्याची सूचना केली आहे. जिल्हाधिका:यांनी तालुका पातळीवर माहिती मागवली आहे
विशेष म्हणजे तालुक्याचा योग्य असा नकाशा पंचायत समिती अथवा तहसीलदार यांच्याकडे उपलब्ध नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नकाशात गाव नेमके धरण गावच्या हद्दीत असल्याचं स्पष्ट दिसते. इतर नकाशांमध्ये  तालुका सलग दाखविला आहे