शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

शासकीय खरेदी केंद्रांची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : रब्बी पिकांचा हंगाम काढून आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : रब्बी पिकांचा हंगाम काढून आता दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. मात्र, शासनाकडून अद्यापही शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाहीत. नोंदणी करून पंधरा दिवसांचा कालावधी झाला असून, अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जर शासकीय खरेदी करायचीच नाही तर नोंदणीचे ढोंग कशासाठी असा संतप्त सवाल आता शेतकरी उपस्थित करत आहेत.

खाजगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्राधान्य हे शासकीय खरेदी केंद्रावरच आपले धान्य विक्री वर असते. मात्र दरवर्षी शासनाच्या चुकीच्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खरीप हंगाम असो वा रब्बी हंगाम, पिके काढून घेतल्यानंतर महिनाभराच्या आत शासकीय खरेदी केंद्र सुरु होणे अपेक्षित असते. मात्र दरवर्षी पिक काढून घेतल्यानंतर देखील दोन - दोन महिने शासकीय खरेदी केंद्र सुरू होत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांना कमी भावात आपला माल व्यापाऱ्यांना विक्री करावा लागत आहे. आधीच मजुरीचा वाढलेला खर्च, बियाणे, खतांची भाववाढ यामुळे शेतकऱ्यांना शेती परवडत नाही. त्यातच शासनाकडून देखील शेतकऱ्यांची अशा प्रकारे थट्टा केली जात असेल तर शेतकऱ्यांनी करावे तरी काय असा प्रश्न आता शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे.

नोंदणीचे ढोंग कशाला ?

शेतकऱ्यांचा माल खरेदी करायचा नसेल तर कमीत कमी नोंदणी करणे, हमी भाव जाहीर करणे अशी ढोंग तरी करू नये अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून दिली जात आहे. गेल्या वर्षी देखील २० हजार शेतकऱ्यांनी मका विक्री साठी नोंदणी केली होती. मात्र, केवळ ४ हजार शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आला. तर तब्बल १६ हजार शेतकऱ्यांना आपला माल कमी भावात व्यापाऱ्यांना विक्री करावा लागला होता. या वर्षी देखील मका, दादर विक्री साठी १२ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, महिना होऊन देखील अजूनही शासकीय खरेदी केंद्र सुरू झालेले नाहीत.

शासकीय खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, मुख्यमत्र्यांना पत्र

शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा मका, गहू आणि ज्वारी हे धान्य घरात येऊन दोन महिने झाले आहेत आता मे महिना उजाडलेला आहे शेतकऱ्यांना शेतीची कामं करावी लागतात नागरटी ,वखरणी , बांध बंदिस्त सेंद्रिय खते टाकने शेणखत टाकने अशा अनेक गोष्टी तयार करून शेतकऱ्यांना जुन पूर्व हंगामासाठी शेतीची मशागत करावी लागते. पुढील पेरणी साठी शेती तयार करावी लागते. त्यासाठी शेतकऱ्या जवळ भांडवल नसते शेतकऱ्यांनी उत्पादन केलेला माल घरात पडलेला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी खूप अडचणीत सापडलेला आहे. शासकीय खरेदी केंद्र सुरू करावी अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक संजय मुरलीधर पवार यांनी केली आहे.

कोट.

शासनाकडून खरेदी केंद्र सुरू करण्याबाबत कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. संपूर्ण राज्यात अजुन कोणत्याही ठिकाणी खरेदी केंद्र सुरू झालेले नाही. त्यामुळे आदेश प्राप्त झाले की खरेदी सुरू होईल.

- जी. एन. मगर, पुरवठा अधिकारी.