शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाचा नुसताच फुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. हा आयोग लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. हा आयोग लागू झाल्याचे पत्र मनपाकडे ७ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर अनेक वर्षांपासून या आयोगाची प्रतीक्षा पाहत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तर भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी हा आयोग लागू करण्यासाठी आपणच पाठपुरावा केला यासाठी श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते. मात्र, आयोग लागू होण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी व शर्थींमुळे हा आयोग जळगाव मनपाला सध्या तरी लागू होणे कठीणच असल्याचे समोर येत आहे. यासाठी नेमलेल्या समितीच्या प्राथमिक तपासणीत तरी हीच बाब समोर येत आहे.

राज्याच्या महानगरपालिकांसाठी सातवा वेतन आयोग हा २०१६ मध्ये लागूच झाला होता. मात्र, जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी हा आयोग लागूच झाला नव्हता. चार वर्षांच्या कालावधीनंतर शासनाने हा आयोग मनपासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अटी-शर्थींच्या फेऱ्यांमुळे हा निर्णय केवळ फुगाच असल्याचे समोर येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी अजून काही वर्षे तरी या निकषांची पूर्तता जळगाव महापालिकेला करणे कठीण असल्याने महिनाभरातच मनपा कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता मनपाला अटी-शर्थी पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही मनपा प्रशासनाने मान्य केल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

वसुली आवश्यक ९० टक्के, होते मात्र ५५ टक्केच

१. अटी व शर्थींची पूर्तता होईल की नाही, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व तयारी यासाठीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. समितीकडून मनपा मालमत्ता कराची वसुली १०० टक्के करण्यासाठी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार होती. तसेच भविष्यात येणाऱ्या उत्पन्नाची स्थितीदेखील तपासली जाणार आहे.

२. मनपातील सर्व विभागप्रमुखांकडून त्या-त्या विभागांवर होणाऱ्या खर्चाची माहितीदेखील घेतली जाणार आहे. समिती स्थापन होऊन महिना पूर्ण झाला आहे. प्राथमिक स्तरावर समितीने काम सुरू केले असले तरी पुढील आव्हाने खडतर असल्याचेच समितीच्या प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. कारण मनपाची मालमत्ता कराची वसुली ९० टक्के असणे गरजेचे असताना, मनपाची वसुली केवळ ५५ ते ६० टक्के इतकीच होते. यासह इतर निकषांची पूर्ततादेखील करणे कठीणच आहे.

वाढलेला अस्थापना खर्च ठरणार डोकेदुखी

शासनाने घालून दिलेल्या प्रमुख अटी व शर्थींमध्ये मालमत्ता कराची वसुली १०० टक्के करण्याबरोबरच मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्के इतका असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत मनपा आस्थापना खर्च हा ५१ टक्के असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपाचा आस्थापना खर्च शासनाने निश्चित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक आहे. यावर मनपा प्रशासनाकडून आता पुढे काय निर्णय घेण्यात येतो याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही पाठपुरावा केला म्हणून, अनेक पदाधिकारी पुढे आले होते. मात्र, आता हा लागू होणे कठीण झाल्यावर राजकीय पदाधिकारीदेखील गायब झाले आहेत.