शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

मनपा कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाचा नुसताच फुगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. हा आयोग लागू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपा कर्मचाऱ्यांना तब्बल चार वर्षांनंतर सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. हा आयोग लागू झाल्याचे पत्र मनपाकडे ७ जून रोजी प्राप्त झाल्यानंतर अनेक वर्षांपासून या आयोगाची प्रतीक्षा पाहत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांनी फटाके फोडून शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले होते. तर भाजप व शिवसेनेच्या पदाधिकारी हा आयोग लागू करण्यासाठी आपणच पाठपुरावा केला यासाठी श्रेय घेण्यासाठी पुढे आले होते. मात्र, आयोग लागू होण्यासाठी शासनाने घातलेल्या अटी व शर्थींमुळे हा आयोग जळगाव मनपाला सध्या तरी लागू होणे कठीणच असल्याचे समोर येत आहे. यासाठी नेमलेल्या समितीच्या प्राथमिक तपासणीत तरी हीच बाब समोर येत आहे.

राज्याच्या महानगरपालिकांसाठी सातवा वेतन आयोग हा २०१६ मध्ये लागूच झाला होता. मात्र, जळगाव महापालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी हा आयोग लागूच झाला नव्हता. चार वर्षांच्या कालावधीनंतर शासनाने हा आयोग मनपासाठी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अटी-शर्थींच्या फेऱ्यांमुळे हा निर्णय केवळ फुगाच असल्याचे समोर येत आहे. मनपा कर्मचाऱ्यांनी कितीही प्रयत्न केले तरी अजून काही वर्षे तरी या निकषांची पूर्तता जळगाव महापालिकेला करणे कठीण असल्याने महिनाभरातच मनपा कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. आता मनपाला अटी-शर्थी पूर्ण करण्याशिवाय पर्याय नसल्याचेही मनपा प्रशासनाने मान्य केल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.

वसुली आवश्यक ९० टक्के, होते मात्र ५५ टक्केच

१. अटी व शर्थींची पूर्तता होईल की नाही, यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना व तयारी यासाठीचा आढावा घेण्यासाठी मनपा आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विद्या गायकवाड, उपायुक्त संतोष वाहुळे, मुख्य लेखाधिकारी कपिल पवार या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. समितीकडून मनपा मालमत्ता कराची वसुली १०० टक्के करण्यासाठी सर्व प्रभाग समिती अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात येणार होती. तसेच भविष्यात येणाऱ्या उत्पन्नाची स्थितीदेखील तपासली जाणार आहे.

२. मनपातील सर्व विभागप्रमुखांकडून त्या-त्या विभागांवर होणाऱ्या खर्चाची माहितीदेखील घेतली जाणार आहे. समिती स्थापन होऊन महिना पूर्ण झाला आहे. प्राथमिक स्तरावर समितीने काम सुरू केले असले तरी पुढील आव्हाने खडतर असल्याचेच समितीच्या प्राथमिक तपासणीत दिसून येत आहे. कारण मनपाची मालमत्ता कराची वसुली ९० टक्के असणे गरजेचे असताना, मनपाची वसुली केवळ ५५ ते ६० टक्के इतकीच होते. यासह इतर निकषांची पूर्ततादेखील करणे कठीणच आहे.

वाढलेला अस्थापना खर्च ठरणार डोकेदुखी

शासनाने घालून दिलेल्या प्रमुख अटी व शर्थींमध्ये मालमत्ता कराची वसुली १०० टक्के करण्याबरोबरच मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्के इतका असणे गरजेचे आहे. मात्र, सद्यस्थितीत मनपा आस्थापना खर्च हा ५१ टक्के असल्याने हा खर्च कमी करण्यासाठी मनपा प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. मनपाचा आस्थापना खर्च शासनाने निश्चित करून दिलेल्या खर्चापेक्षा अधिक आहे. यावर मनपा प्रशासनाकडून आता पुढे काय निर्णय घेण्यात येतो याकडे मनपा कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही पाठपुरावा केला म्हणून, अनेक पदाधिकारी पुढे आले होते. मात्र, आता हा लागू होणे कठीण झाल्यावर राजकीय पदाधिकारीदेखील गायब झाले आहेत.