शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

विद्यार्थिनीने घेतली इमारतीवरुन उडी

By admin | Updated: December 4, 2015 01:00 IST

एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या तिस:या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला.

जळगाव : प्रेमप्रकरणाबाबत मित्र व मैत्रीण यांच्याकडून होत असल्याच्या छळाला कंटाळून अॅड.सीताराम (बबनभाऊ) आनंदरामजी बाहेती महाविद्यालयातील बारावीतील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने गुरुवारी सकाळी दहा वाजता महाविद्यालयाच्या तिस:या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रय} केला. त्यात तिच्या पायाला दुखापत झाली. रुग्णालयात उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर आहे.

दप्तर व चप्पल बाजूला ठेवून गॅलरीतून घेतली उडी

मृण्मयी (विद्यार्थिनीचे नाव बदलले आहे) ही बाहेती महाविद्यालयात बारावी (शास्त्र शाखेचे) शिक्षण घेत आहे. गुरुवारी ती सकाळीच महाविद्यालयात आली. तेथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदवीच्या परीक्षा सुरू होत्या. वर्गात विद्यार्थी पेपर लिहीत असताना मृण्मयी ही तिस:या मजल्यावर गेली. तेथे तिने दीड पानाची आत्महत्यापूर्व चिठ्ठी लिहिली. त्यानंतर दप्तर व चप्पल बाजूला ठेवून गॅलरीतून उडी घेतली.

रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले

कोणीतरी इमारतीवरून पडल्याचे लक्षात येताच प्रचंड धावपळ उडाली. विद्यार्थी, प्राचार्य अनिल लोहार, प्रा.एस.एन.गुप्ता, अभिजीत रंधे यांनी तातडीने तिला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात हलविले.

पाय फ्रॅर

घटना समजताच मृण्मयीचे वडील व आई यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथून तिला तत्काळ खासगी रुग्णालयात हलविले. या अपघातात तिचा पाय फ्रॅर झाला असून शरीराच्या इतर भागांनाही मुका मार बसला आहे. गंभीर दुखापत असली तरी तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. तिचे वडिल मनपा कर्मचारी आहेत.

घटनास्थळावर आढळली आत्महत्यापूर्व चिठ्ठी व मोबाईल

घटनास्थळावर मृण्मयीचा मोबाईल व आत्महत्यापूर्व चिठ्ठी आढळून आली. ती व मोबाईल हा प्राचार्यानी ताब्यात घेतला आहे. तसेच वरच्या मजल्यावर तिची बॅग, ओळखपत्र, पर्स व चप्पल पडून होते. प्रारंभी वरच्या मजल्यावर बसली असताना पाय घसरुन ती खाली पडल्याची चर्चा होती. आत्महत्यापूर्व चिठ्ठीवरून आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला.

पालक म्हणतात मृण्मयीला आजार

मृण्मयी हिला आजार होता व त्यामुळे तिच्यावर दवाखान्यात उपचार सुरू होते असे तिच्या पालकांनी प्राचार्याना सांगितले. कोणाशी काही वाद होता का? यावरही त्यांनी माहिती नसल्याचेच सांगितल्याचे प्राचार्य लोहार यांनी स्पष्ट केले. तिने लिहिलेली आत्महत्यापूर्व चिठ्ठी प्राचार्य यांनी नंतर जिल्हा पेठ पोलिसांच्या ताब्यात दिली. पालकांनीदेखील पोलीस ठाण्यात जाऊन चिठ्ठीची माहिती घेतली. रात्री उशीरार्पयत या घटनेसंबंधी पोलिसात कुठलीही नोंद झालेली नव्हती, अशी माहिती मिळाली.