शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

जे.के.पार्कच्या अल्टिमेटमची मुदतही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिले होते. तसेच सात दिवसांचा आत ही जागा सोडून, ही जागा मनपाच्या ताब्यात देण्याचा अल्टीमेटम मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिला होता. मात्र, नोटीस व अल्टीमेटम देवून सात दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने अद्यापही ही जागा ताब्यात घेतलेली नाही. विशेष म्हणजे जे.के.डेव्हलपर्सने मनपाला पत्र लिहून चार दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, आणि मनपानेही मुदतवाढ दिल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.

शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे.के.पार्कची जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला ३० वर्ष करारातंर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ मध्ये संपली होती. याबाबत संबधित भाडेकरूला मनपाने जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावून ही जागा सोडण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, नोटीस बजाविल्यानंतर मनपाने केवळ अल्टीमेटम देण्याचेच काम सुरु केले. नोटीस देवूनही जे.के.डेव्हलपर्सने ही जागा सोडली नाही आणि मनपाने देखील ही जागा ताब्यात घेतली नाही. या जागेची आजचे बाजारमुल्य २० कोटींपर्यंत आहे. मात्र, मनपा प्रशासन आपल्या मालकी जागेबाबत देखील गंभीर नाही. वर्षभर कारवाई केली नाही, याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपाने जे.के.डेव्हलपर्सला पुन्हा दुसऱ्यांदा नोटीस बजावली व सात दिवसांचा अल्टीमेटम दिला. आता ही मुदत देखील संपली असून, तरीही मनपाने कारवाई केलेली नाही.

अल्टीमेटमचा खेळ, कारवाई मात्र शुन्य

मनपाकडून अनेक प्रकरणी केवळ नोटीसांचा धाक दाखवून एखादा विषयावर माती टाकण्याचे काम केले जाते. गाळे प्रश्न, बेसमेंट, भंगार बाजार, ट्रान्सपोर्ट नगरची जागा असो वा आताची जे.के.पार्कची जागा सर्व प्रकरणात मनपाची बाजू भक्कम आहे. तसेच या जागांमधून मनपाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, तरीही मनपा प्रशासन या प्रकरणांकडे दुर्लक्ष करते. एकीकडे निधी नसल्याचे सांगत नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचित ठेवले जाते आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या मालमत्ताकडे दुर्लक्ष केले जाते. उदासीन मनपा प्रशासनामुळेच शहरातील नागरिकांना आजचे दिवस आले असेच म्हणावे लागेल.