शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
3
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
6
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
7
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
8
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
11
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
12
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
13
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
14
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
15
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
16
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
17
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
18
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
19
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
20
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त

जे.के.पार्कच्या अल्टिमेटमची मुदतही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिले होते. तसेच सात दिवसांचा आत ही जागा सोडून, ही जागा मनपाच्या ताब्यात देण्याचा अल्टीमेटम मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिला होता. मात्र, नोटीस व अल्टीमेटम देवून सात दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने अद्यापही ही जागा ताब्यात घेतलेली नाही. विशेष म्हणजे जे.के.डेव्हलपर्सने मनपाला पत्र लिहून चार दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, आणि मनपानेही मुदतवाढ दिल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.

शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे.के.पार्कची जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला ३० वर्ष करारातंर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ मध्ये संपली होती. याबाबत संबधित भाडेकरूला मनपाने जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावून ही जागा सोडण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, नोटीस बजाविल्यानंतर मनपाने केवळ अल्टीमेटम देण्याचेच काम सुरु केले. नोटीस देवूनही जे.के.डेव्हलपर्सने ही जागा सोडली नाही आणि मनपाने देखील ही जागा ताब्यात घेतली नाही. या जागेची आजचे बाजारमुल्य २० कोटींपर्यंत आहे. मात्र, मनपा प्रशासन आपल्या मालकी जागेबाबत देखील गंभीर नाही. वर्षभर कारवाई केली नाही, याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपाने जे.के.डेव्हलपर्सला पुन्हा दुसऱ्यांदा नोटीस बजावली व सात दिवसांचा अल्टीमेटम दिला. आता ही मुदत देखील संपली असून, तरीही मनपाने कारवाई केलेली नाही.

अल्टीमेटमचा खेळ, कारवाई मात्र शुन्य

मनपाकडून अनेक प्रकरणी केवळ नोटीसांचा धाक दाखवून एखादा विषयावर माती टाकण्याचे काम केले जाते. गाळे प्रश्न, बेसमेंट, भंगार बाजार, ट्रान्सपोर्ट नगरची जागा असो वा आताची जे.के.पार्कची जागा सर्व प्रकरणात मनपाची बाजू भक्कम आहे. तसेच या जागांमधून मनपाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, तरीही मनपा प्रशासन या प्रकरणांकडे दुर्लक्ष करते. एकीकडे निधी नसल्याचे सांगत नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचित ठेवले जाते आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या मालमत्ताकडे दुर्लक्ष केले जाते. उदासीन मनपा प्रशासनामुळेच शहरातील नागरिकांना आजचे दिवस आले असेच म्हणावे लागेल.