शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

जे.के.पार्कच्या अल्टिमेटमची मुदतही संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगत असलेली व जे.के..डेव्हलपर्सला भाडेतत्वावर दिलेली मनपाची १८१ चौमी जागा खाली करण्याचे आदेश मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिले होते. तसेच सात दिवसांचा आत ही जागा सोडून, ही जागा मनपाच्या ताब्यात देण्याचा अल्टीमेटम मनपा प्रशासनाने जे.के.डेव्हलपर्सला दिला होता. मात्र, नोटीस व अल्टीमेटम देवून सात दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र, मनपा प्रशासनाने अद्यापही ही जागा ताब्यात घेतलेली नाही. विशेष म्हणजे जे.के.डेव्हलपर्सने मनपाला पत्र लिहून चार दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे, आणि मनपानेही मुदतवाढ दिल्याची माहिती मनपाच्या सुत्रांनी दिली आहे.

शिवाजी उद्यानालगत असलेल्या जे.के.पार्कची जागा १९८९ मध्ये जे.के.डेव्हलपर्सला ३० वर्ष करारातंर्गत देण्यात आली होती. याची मुदत २५ डिसेंबर २०१९ मध्ये संपली होती. याबाबत संबधित भाडेकरूला मनपाने जानेवारी २०२० मध्ये ८१ ब ची नोटीस बजावून ही जागा सोडण्याचा सूचना दिल्या होत्या. मात्र, नोटीस बजाविल्यानंतर मनपाने केवळ अल्टीमेटम देण्याचेच काम सुरु केले. नोटीस देवूनही जे.के.डेव्हलपर्सने ही जागा सोडली नाही आणि मनपाने देखील ही जागा ताब्यात घेतली नाही. या जागेची आजचे बाजारमुल्य २० कोटींपर्यंत आहे. मात्र, मनपा प्रशासन आपल्या मालकी जागेबाबत देखील गंभीर नाही. वर्षभर कारवाई केली नाही, याबाबत ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपाने जे.के.डेव्हलपर्सला पुन्हा दुसऱ्यांदा नोटीस बजावली व सात दिवसांचा अल्टीमेटम दिला. आता ही मुदत देखील संपली असून, तरीही मनपाने कारवाई केलेली नाही.

अल्टीमेटमचा खेळ, कारवाई मात्र शुन्य

मनपाकडून अनेक प्रकरणी केवळ नोटीसांचा धाक दाखवून एखादा विषयावर माती टाकण्याचे काम केले जाते. गाळे प्रश्न, बेसमेंट, भंगार बाजार, ट्रान्सपोर्ट नगरची जागा असो वा आताची जे.के.पार्कची जागा सर्व प्रकरणात मनपाची बाजू भक्कम आहे. तसेच या जागांमधून मनपाला मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र, तरीही मनपा प्रशासन या प्रकरणांकडे दुर्लक्ष करते. एकीकडे निधी नसल्याचे सांगत नागरिकांना मुलभुत सुविधांपासून वंचित ठेवले जाते आणि दुसरीकडे कोट्यवधींच्या मालमत्ताकडे दुर्लक्ष केले जाते. उदासीन मनपा प्रशासनामुळेच शहरातील नागरिकांना आजचे दिवस आले असेच म्हणावे लागेल.