शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण

By admin | Updated: September 11, 2015 21:37 IST

गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गो:हे, दूध, गोमूत्र, शेण मिळते. गाय ही शेतक:यांचे श्रद्धास्थान आहे.

देशातील शेतीला साडेदहा हजार वर्षाचा इतिहास आहे. शेतीचे अभ्यासक, जुने जाणते व संशोधक यांच्यानुसार पूर्वीची शेती ही स्थलांतरित होती. म्हणजेच एका ठिकाणी दोन ते तीन वर्षे शेती केली जायची. जमिनीची ताकद कमी झाली की नंतर जंगल कापून दुस:या ठिकाणावर शेती करायला समूहाने लोक जायचे. अजूनही हिमालय आणि सह्याद्रीत अशा पद्धतीची शेती करतात. पूर्वी शेणखताशिवाय शेती कुणी करीत नसते. खंडीभर गायी (20 गायी) पाळण्याचा प्रघातच होता. शेतात शेणखताचा वापर करणारा भगवान श्रीकृष्ण पहिला व्यक्ती होता, असेही तज्ज्ञांच्या भाषणात, लिखाणात येते. गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गो:हे, दूध, गोमूत्र, शेण मिळते. गाय ही शेतक:यांचे श्रद्धास्थान आहे. राज्यात खान्देशात निमाली, मराठवाडय़ात लाल कंधारी, विदर्भात गवळाऊ, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, तसेच कांकरेज, गीर आदी जातीच्या गायी आहेत. तर देशात गायींच्या 36 जाती आहेत. विश्वासराव पाटील, जगन्नाथ धनसिंग पाटील यांच्यासारखे अनेक शेतकरी विविध जातींच्या गायींचे जतन करीत आहेत. सणासुदीला गायीची आवजरून दारासमोर पूजा केली जाते, तिला गोडधोड खाऊ घातले जाते. परंतु पुरातन शेती ही आज संयुक्तिक आहे का, हा प्रश्न पडतो. कारण गायींची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. यामागे शेतमजुरी महागणे, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळणारे भाव, शेती करण्याबाबतची युवक, महिलांमधील अनास्था अशी अनेक कारणे आहेत. पण आजही पुरातन शेती करण्याचे धाडस काही शेतकरी करतात. काही शेतकरी आवजरून शेतात दरवर्षी एकरी 30, 40 ते 50 बैलगाडय़ा गायीचे शेणखत टाकतात. यात दरवर्षी एकरी 18 बैलगाडय़ा गायीचे शेणखत म्हणजेच नऊ टन शेणखत टाकले तर पिकांबाबत अपेक्षित स्थिती निर्माण होते, असा अनुभव शेतकरी सांगतात. नैसर्गिक शेतीच्या प्रणेत्यानुसार एकरी नऊ टन शेणखत टाकायचे असले तर प्रत्येक शेतक:याकडे 10 देशी गायी असायला हव्यात, असा सरळ हिशोब लावता येईल. देशात 45 कोटी एकर शेती आहे म्हणजेच शेणखत मिळून पिके जोमात यावीत, शेतक:यांना अपेक्षित यश मिळावे यासाठी 450 कोटी देशी गायी देशात असणे आवश्यक आहे. परंतु देशात आजघडीला फक्त आठ कोटी देशी व इतर गायी आहेत. अनेक शेतकरी देशी काय, इतर गायींचे शेणखत दरवर्षी घेऊ शकत नाहीत. आज देशी गायींचे शेणखत मुबलक प्रमाणात मिळत नसले तरी देशी गायींच्या माध्यमातून मिळणारे गोमूत्र, शेण याद्वारे नैसर्गिक शेती करता येते. ङिारो बजेट शेती म्हणूनही ही शेती आता परिचित झाली आहे. देशी गायीच्या एक गॅ्रम शेणात 300 ग्रॅम जिवाणू असतात हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. बेलोर ता.नांदगाव जि.अमरावती येथे नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर एका गायीच्या माध्यमातून 30 एकर बागायती शेती करतात. एक हजार किलो गायीचे शेण ते महिन्याला एक एकर शेतात टाकतात, तर पंधरवडय़ात किंवा गरजेनुसार 200 लीटर पाण्यात 10 किलो गायीचे शेण, 10 किलो गोमूत्र, एक किलो गूळ, एक किलो बेसन आणि प्रमाण लक्षात घेऊन बांधावरची माती टाकून ते मिश्रण तयार करतात. ते 48 तास आंबवतात. या मिश्रणास जीवामृत असे नाव देण्यात आले आहे. ते थेट झाडांना टाकले जाते. शेतात एक दाणाही रासायनिक खत न टाकता बागायती, फळबागांची शेती यशस्वी करण्याची किमया पाळेकरांसह जिल्ह्यात सतीश काटे, विलास सनेर, ईश्वर जाधव आदी शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे जेवढे उत्पादन रासायनिक शेती देते, तेवढेच उत्पादन नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मिळते. शिवाय या शेतीतून मिळणारा शेतमाल हा विष किंवा रसायनमुक्त राहत असल्याने त्याला बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. या शेतमालास भावही अधिक मिळतो. याचा अर्थ आपल्या कृषी संस्कृतीत गायीचे जेवढे महत्त्व आहे तेवढे इतर घटकांचे नाही हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. -चंद्रकांत जाधव, जळगाव